शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

१०८ जणांनी मुंडण करून अर्पण केली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:56 IST

गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देसाहूर परिसरात शोककळा : रमेश वरकडे यांचा दशक्रिया विधी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रत्येकाला आपले अश्रू अनावर झाले होते.रमेश वरकड हे मितभाषी व सर्वांना घेऊन चालणारे होते. आंतरजातीय विवाहाला त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिले. स्वत: जीवनसाथी निवडताना बौद्ध समाजातील मुलीला पसंती दर्शविली. त्यांच्या मुलीचा विवाह ख्रिश्चन धर्माच्या मुलाशी लावून दिला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणून आज सर्वांतून अचानक ५८ व्या वर्षी निघून गेल्याने साहुर गावकरी जणू हवालदिल झाले आहेत. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणा देणाराच आहे. रमेश वरकड यांचे कुटुंब यवतमाळ येथे वास्तव्यास आहे; पण त्यांनी आपले जीवन साहुर गावाला समर्पित केले होते. १५ वर्ष सरपंच, १० वर्ष जि.प. सदस्य, पं.स. उपसभापती अशा पदांची जबाबदारी सांभाळून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटविला होता. गेल्या ८ वेळा म्हणजे ४० वर्षे त्यांनी ग्रा.पं.वर एकहाती सत्ता मिळविली. सरपंच कोणीही असो; पण काम रमेश वरकड यांची संमती असेलच तरच होणार आणि तेही फक्त लोकाभिमुख असेच चित्र येथे बघावयास मिळत होते. कुणाच्या सांगण्याने व विश्वास ठेवून त्यांनी कधीही राजकारणात डाव मांडला नाही. मध्यंतरी महिला आरक्षण निघाल्याने त्यांच्या सुनेला तिकीट देवून जि.प. सदस्य बनविले. मात्र, राजकारणाची सुत्र रमेश वरकड यांच्याकडे ठेवण्यात यावी असाच कुटुंबाचाही आग्रह त्यांनी पूर्ण केला. साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राला जागतिक स्तरावर पुरस्कार प्राप्त करून देण्यात रमेश वरकड यांचा मोठा हात भार होता. कारण सुमारे एक कोटी रुपये एवढा मोठा निधी जि.प. मधून क्रमाक्रमाने आणत संबंध विकासकामे पूर्ण केली. मशीनयंत्र सुविधा, आरोग्य सुविधा यामध्ये त्यांनी मोठ्या शिताफीने तत्परता ठेवली होती. ग्रा.पं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रमेश वरकडे हे भोवळ येऊन पडले. तेथे २२ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. रुग्णालयात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. साहुर येथील मंजुळा नदीच्या पात्रातील उत्तरवाहिनीमध्ये मानव जोडो संगठनचे प्रणेते रमेश सरोदे यांच्यावतीने ग्रामगीता वाचन करण्यात आले. त्यानंतर १०८ जणांनी मुंडण करून दशक्रिया विधी पार पाडला.