शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

वन्यप्राण्यांनी १,७०८ शेतकऱ्यांचे केले नुकसान

By admin | Updated: May 1, 2017 00:38 IST

जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

चार महिन्यांत चार इसमांसह ५४ जनावरे केले जखमी वर्धा : जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. गत चार महिन्यांत वन्यप्राण्यांनी चक्क १ हजार ७०८ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. तर चार इसमांसह ५४ जनावरांना जखमी केल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. जखमीच्या कुटुंबियांना व नुकसानग्रस्त बहुतांश पशुपालक तसेच शेतकऱ्यांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याचदा वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात जनावरे दगावत असून अनेकदा जनावरे जखमीही होतात. वन्यप्राण्यांकडून शेतपिकाचे होणारे नुकसान, जनावरे जखमी केल्यास तसेच जनावरे मारली गेल्यास संबंधीतांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत दिली जाते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी वनपरिक्षेत्रात २५७ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, आष्टी(श.) वनपरिक्षेत्रात १९३, कारंजा(घा.)त ७१०, समुद्रपूर १६३, हिंगणी १९१, तळेगाव ५०७, खरांगणा १३६ व वर्धा वनपरिक्षेत्रातील ११५५ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. सदर शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत एकूण १ कोटी ९० लाख ८३ हजार ४८७ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत वन्यप्राण्यांनी ३२ मनुष्यांना जखमी केले. सदर जखमींच्या कुटुंबियांना एकूण १९ लाख २५ हजार ७९१ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दिवसेंदिवस वन्यप्राणी शेतशिवारांमध्ये येत धुमाकुळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने योग्य पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी) हिंगणी क्षेत्रात जनावरांवर सर्वाधिक हल्ले एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी १८, आष्टी(श.) ४, कारंजा(घा.) १७, समुद्रपूर ७, हिंगणी ४७, तळेगाव १४, खरांगणा २० व वर्धा वनपरिक्षेत्रात ३ जनांवरांना वन्यप्राण्यांनी जखमी केले. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना मार्च अखेरपर्यंत ७ लाख ९५ हजार ९०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.