शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांनी १,७०८ शेतकऱ्यांचे केले नुकसान

By admin | Updated: May 1, 2017 00:38 IST

जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

चार महिन्यांत चार इसमांसह ५४ जनावरे केले जखमी वर्धा : जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. गत चार महिन्यांत वन्यप्राण्यांनी चक्क १ हजार ७०८ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. तर चार इसमांसह ५४ जनावरांना जखमी केल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. जखमीच्या कुटुंबियांना व नुकसानग्रस्त बहुतांश पशुपालक तसेच शेतकऱ्यांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याचदा वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात जनावरे दगावत असून अनेकदा जनावरे जखमीही होतात. वन्यप्राण्यांकडून शेतपिकाचे होणारे नुकसान, जनावरे जखमी केल्यास तसेच जनावरे मारली गेल्यास संबंधीतांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत दिली जाते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी वनपरिक्षेत्रात २५७ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, आष्टी(श.) वनपरिक्षेत्रात १९३, कारंजा(घा.)त ७१०, समुद्रपूर १६३, हिंगणी १९१, तळेगाव ५०७, खरांगणा १३६ व वर्धा वनपरिक्षेत्रातील ११५५ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. सदर शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत एकूण १ कोटी ९० लाख ८३ हजार ४८७ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत वन्यप्राण्यांनी ३२ मनुष्यांना जखमी केले. सदर जखमींच्या कुटुंबियांना एकूण १९ लाख २५ हजार ७९१ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दिवसेंदिवस वन्यप्राणी शेतशिवारांमध्ये येत धुमाकुळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने योग्य पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी) हिंगणी क्षेत्रात जनावरांवर सर्वाधिक हल्ले एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी १८, आष्टी(श.) ४, कारंजा(घा.) १७, समुद्रपूर ७, हिंगणी ४७, तळेगाव १४, खरांगणा २० व वर्धा वनपरिक्षेत्रात ३ जनांवरांना वन्यप्राण्यांनी जखमी केले. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना मार्च अखेरपर्यंत ७ लाख ९५ हजार ९०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.