शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

१०२२ शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये अडले

By admin | Updated: July 1, 2015 02:32 IST

शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन संच देण्यात येत असल्याने आर्वी विभागातील १०२२ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.

कृषी विभागाची दिरंगाई : ठिबक सिंचनाचे अनुदान श्यामकांत उमक खरांगणा(मो.)शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन संच देण्यात येत असल्याने आर्वी विभागातील १०२२ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. याला वर्षाचा कालावधी लोटत असला तरी या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनुदानापोटी त्यांचे २.८२ कोटी रुपये अडले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशात तर त्यांना या अनुदानाची रक्कम मिळाली तर त्यांना सोईचे झाले असते, अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शिल्लक असलेल्या रकमेचा विचार केल्यास एका शेतकऱ्याच्या वाट्याला सरासरी २७ हजार रुपये येत आहेत. ही रक्कम अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकरिता मोलाची ठरणार आहे. यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.शासनाच्या निर्देशानुसार आर्वी उपविभागांतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. यात आज ना उद्या अनुदान मिळलेच या आशेवर १ हजार २२ शेतकऱ्यांनी रोख रक्कम भरून संच घेत शेतीच्या कामी लावले. याला एका वर्षाचा कालावधी होत असला तरी त्याला अद्यापही अनुदान प्राप्त झाले नाही. या संदर्भात शेतकरी बांधवांना आर्वी कृषी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे, पण प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविले आहे. व पाठपुरावा सुरू आहे, हेच नेहमीचे उत्तर शेतकऱ्यांना ऐकावे लागते. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. अशात जर शासनाकडून येणार असलेले हे अनुदान मिळाल्यास थोडा आधार होईल, अशी प्रतिक्रीया शेतकरी देत आहे. जवळचा पैसा योजनेचा लाभ घेण्यात खर्च झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटखरांगणा (मो.)- मोसमी वाऱ्याच्या गत पंधरवड्यात मृगाच्या शेवटी सर्वत्र पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. बियाणेही अंकुरले; परंतु पावसाने पाच साहा दिवसांपासून उघडीप दिल्याने पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याचे संकेत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार प्रारंभीच दमदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून पेरणी केली. पेरण्या आटोपल्या काही प्रमाणात अनेक शेतकऱ्यांना मोडही आली. बियाणे अंकुरले, काही पिके दोन पाणी, चार पाणी झाले; परंतु गत आठवड्यापासून अचानक पाऊस गायब झाल्याने पिके (रोपटी) सुकू लागली आहे. शेतकऱ्यांचे डांळे आभाळाकडे लागले आहे. अशात जर दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर दुबारपेरणीचे संकट शेतकऱ्यावर येणे पक्के आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी असलेल्या पाण्याच्या आधारावर ओलीत करणे सुरू केले आहे. मात्र पावसाशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.