शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१०२२ शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये अडले

By admin | Updated: July 1, 2015 02:32 IST

शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन संच देण्यात येत असल्याने आर्वी विभागातील १०२२ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.

कृषी विभागाची दिरंगाई : ठिबक सिंचनाचे अनुदान श्यामकांत उमक खरांगणा(मो.)शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन संच देण्यात येत असल्याने आर्वी विभागातील १०२२ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. याला वर्षाचा कालावधी लोटत असला तरी या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनुदानापोटी त्यांचे २.८२ कोटी रुपये अडले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशात तर त्यांना या अनुदानाची रक्कम मिळाली तर त्यांना सोईचे झाले असते, अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शिल्लक असलेल्या रकमेचा विचार केल्यास एका शेतकऱ्याच्या वाट्याला सरासरी २७ हजार रुपये येत आहेत. ही रक्कम अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकरिता मोलाची ठरणार आहे. यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.शासनाच्या निर्देशानुसार आर्वी उपविभागांतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. यात आज ना उद्या अनुदान मिळलेच या आशेवर १ हजार २२ शेतकऱ्यांनी रोख रक्कम भरून संच घेत शेतीच्या कामी लावले. याला एका वर्षाचा कालावधी होत असला तरी त्याला अद्यापही अनुदान प्राप्त झाले नाही. या संदर्भात शेतकरी बांधवांना आर्वी कृषी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे, पण प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविले आहे. व पाठपुरावा सुरू आहे, हेच नेहमीचे उत्तर शेतकऱ्यांना ऐकावे लागते. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. अशात जर शासनाकडून येणार असलेले हे अनुदान मिळाल्यास थोडा आधार होईल, अशी प्रतिक्रीया शेतकरी देत आहे. जवळचा पैसा योजनेचा लाभ घेण्यात खर्च झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटखरांगणा (मो.)- मोसमी वाऱ्याच्या गत पंधरवड्यात मृगाच्या शेवटी सर्वत्र पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. बियाणेही अंकुरले; परंतु पावसाने पाच साहा दिवसांपासून उघडीप दिल्याने पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याचे संकेत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार प्रारंभीच दमदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून पेरणी केली. पेरण्या आटोपल्या काही प्रमाणात अनेक शेतकऱ्यांना मोडही आली. बियाणे अंकुरले, काही पिके दोन पाणी, चार पाणी झाले; परंतु गत आठवड्यापासून अचानक पाऊस गायब झाल्याने पिके (रोपटी) सुकू लागली आहे. शेतकऱ्यांचे डांळे आभाळाकडे लागले आहे. अशात जर दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर दुबारपेरणीचे संकट शेतकऱ्यावर येणे पक्के आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी असलेल्या पाण्याच्या आधारावर ओलीत करणे सुरू केले आहे. मात्र पावसाशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.