शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

गट, गणांकरिता जिल्ह्यात १००० अर्ज

By admin | Updated: February 2, 2017 00:42 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्यास २७ जानेवारीपासून प्रारंभ झाला.

अखेरच्या दिवशी गर्दी : गटांकरिता २५५ तर गणांकरिता ४५१ नामांकन वर्धा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्यास २७ जानेवारीपासून प्रारंभ झाला. बुधवारी शेवटच्या दिवशी इच्छुकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात गट आणि गणांकरिता १००० नामांकन दाखल करण्यात आले. यात वर्धा तालुक्यात एकूण २९४ नामांकन दाखल झाले असून गट व गणांची विभागणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. उर्वरित तालुक्यात जि.प. गटासाठी २५५ तर पं.स. गणांकरिता ४५१ नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात ५२ गट आणि १०४ गणांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता; पण वाठोडा गट व त्या अंतर्गत चार गणांच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे ५० गट आणि १०० गणांकरिता निवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता. मंगळवारी सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना आॅनलाईन माहिती सादर करताना व प्रिंट काढताना अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, रात्र जागून काढत अर्ज ‘फुलफिल’ करावा लागला. मंगळवारी रात्री बहुतांश राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही संगणक केंद्रांमध्ये ताटकळत असल्याचे दिसून आले. आज अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुकांची गर्दी उसळल्याने सकाळपासून संगणक केंद्रांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांत गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. वर्धा तालुक्यात जिल्हा परिषदेकरिता बुधवारपर्यंत २९४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यात १४ गटांकरिता आणि २८ गणांकरिता किती नामांकन दाखल झाले, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक गट वर्धा तालुक्यात असल्याने आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी केल्याने प्रशानाकडून रात्री उशीरापर्यंत अर्जांची विभागणी करण्यात येत आहे. एकूण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणसंग्रामाकरिता जिल्ह्यातील १००० उमेदवारांनी शड्डू ठोकून मैदानात उडी घेतली आहे. गुरूवारी नामांकन अर्जांची छाणणी करून यादी प्रसिद्ध केली जाणार असून ७ फेबु्रवारीपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी) अपुऱ्या वेळेमुळे सर्वांची गोची २७ जानेवारीपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी ३१ जानेवारीपर्यंत बहुतांश उमेदवारांनी नामांकनच दाखल केले नव्हते. शिवाय राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार वेळेवर जाहीर केले. यामुळे बुधवारीच नामांकनासाठी गर्दी झाली. यात वेळ कमी पडल्याने प्रशासन तसेच उमेदवारांचीही धावपळ झाली. म्हसाळा गणात काँग्रेस रिंगणातून बाहेर बुधवार हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंतच प्रशासनाकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. यात म्हसाळा गणासाठी काँगे्रसतर्फे पंकज काचोळे हे दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी अर्ज दाखल करण्यास गेले असता निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी अर्ज घेण्यास नकार दिला. यानंतर शेखर शेंडे यांनी अर्ज घेण्यासाठी आग्रह केला; पण त्यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला.