शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गट, गणांकरिता जिल्ह्यात १००० अर्ज

By admin | Updated: February 2, 2017 00:42 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्यास २७ जानेवारीपासून प्रारंभ झाला.

अखेरच्या दिवशी गर्दी : गटांकरिता २५५ तर गणांकरिता ४५१ नामांकन वर्धा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्यास २७ जानेवारीपासून प्रारंभ झाला. बुधवारी शेवटच्या दिवशी इच्छुकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात गट आणि गणांकरिता १००० नामांकन दाखल करण्यात आले. यात वर्धा तालुक्यात एकूण २९४ नामांकन दाखल झाले असून गट व गणांची विभागणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. उर्वरित तालुक्यात जि.प. गटासाठी २५५ तर पं.स. गणांकरिता ४५१ नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात ५२ गट आणि १०४ गणांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता; पण वाठोडा गट व त्या अंतर्गत चार गणांच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे ५० गट आणि १०० गणांकरिता निवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता. मंगळवारी सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना आॅनलाईन माहिती सादर करताना व प्रिंट काढताना अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, रात्र जागून काढत अर्ज ‘फुलफिल’ करावा लागला. मंगळवारी रात्री बहुतांश राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही संगणक केंद्रांमध्ये ताटकळत असल्याचे दिसून आले. आज अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुकांची गर्दी उसळल्याने सकाळपासून संगणक केंद्रांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांत गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. वर्धा तालुक्यात जिल्हा परिषदेकरिता बुधवारपर्यंत २९४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यात १४ गटांकरिता आणि २८ गणांकरिता किती नामांकन दाखल झाले, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक गट वर्धा तालुक्यात असल्याने आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी केल्याने प्रशानाकडून रात्री उशीरापर्यंत अर्जांची विभागणी करण्यात येत आहे. एकूण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणसंग्रामाकरिता जिल्ह्यातील १००० उमेदवारांनी शड्डू ठोकून मैदानात उडी घेतली आहे. गुरूवारी नामांकन अर्जांची छाणणी करून यादी प्रसिद्ध केली जाणार असून ७ फेबु्रवारीपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी) अपुऱ्या वेळेमुळे सर्वांची गोची २७ जानेवारीपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी ३१ जानेवारीपर्यंत बहुतांश उमेदवारांनी नामांकनच दाखल केले नव्हते. शिवाय राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार वेळेवर जाहीर केले. यामुळे बुधवारीच नामांकनासाठी गर्दी झाली. यात वेळ कमी पडल्याने प्रशासन तसेच उमेदवारांचीही धावपळ झाली. म्हसाळा गणात काँग्रेस रिंगणातून बाहेर बुधवार हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंतच प्रशासनाकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. यात म्हसाळा गणासाठी काँगे्रसतर्फे पंकज काचोळे हे दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी अर्ज दाखल करण्यास गेले असता निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी अर्ज घेण्यास नकार दिला. यानंतर शेखर शेंडे यांनी अर्ज घेण्यासाठी आग्रह केला; पण त्यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला.