शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

१०० किलो प्लॉस्टीक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:44 IST

प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देसेलू नगरपंचायतीची कार्यवाही : दुकान मालकांना ठोठावला दंड

ऑनलाईन लोकमतवर्धा : प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल १०० किलो प्लास्टिक जप्त करीत दंडाची वसुली केली आहे.येत्या गुढीपाडव्यापर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचे शासनाने ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाप्रमाणे नगर पंचायत क्षेत्रातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक जप्तीची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ५० व्यावसायिक प्रतिष्ठान व दुकानदार टाकलेल्या धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक जप्त करून प्रति व्यावसायिक १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.सेलू नगर पंचायतीचे कार्यालय अधीक्षक दिनेश बुधे, प्रशांत रहांगले, नारायण दांडेकर, प्रभाकर करनाके, अक्षय निमजे, सुधाकर भलावी, आशिष ढोबळे, रामाजी मुळे या प्लास्टीक जप्ती पथकाने आतापर्यंत चहा ग्लास, प्लास्टीक वाटी, पाण्याचे ग्लास, प्लास्टीक पिशव्या अशा प्रकारचे साहित्य जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली.हिंगणघाटात जप्ती मोहीमऑनलाईन लोकमतहिंगणघाट : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविल्या जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. नगर पालिकेच्या चमूने केवळ दोनच दिवसात ३४ दुकानातून ५० किलो. कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक दंडासह जप्त केले.शहरात नगर परिषदेच्यावतीने कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक पिशव्या जप्तीची कारवाई सुरू असून विविध व्यावसायिकांकडून २० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून दंडही वसूल करण्यात आला.सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ हिंगणघाट सुंदर हिंगणघाट या मोहिमेला गती देण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई आता सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळेला करीत आहे. कधी कधी तिसऱ्यांना अर्थात दुपारीही केल्या जात असून स्वच्छतेकडे अधिक लक्ष घातल्या जात आहे. ओल्या आणि सुका कचऱ्यांकरिता चौकाचौकात कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार नगर परिषदेनेही मोहीम आखली असून शाळा शाळातून अशा जागृती मोहिमेवर बळ दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांची रॅली, मेळावे काढून सक्रीय होण्यासाठी पालिका प्रयत्नशिल असून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. स्वच्छ शहराकरिता प्लास्टीक निर्मूलनाची गरज असून मोठ्या प्रमाणात हाच कचरा जास्त धोक्याचा असल्याचे दिसून आले आहे.