शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

१० लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात

By admin | Updated: January 13, 2015 23:03 IST

शासनाकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव व शासकीय खरेदीस झालेला विलंब जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्याच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण कापूस संकलन केंद्रावरून

शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ : जिल्ह्यात १३.३२ लाख क्विंटल कापसाची खरेदीरूपेश खैरी - वर्धाशासनाकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव व शासकीय खरेदीस झालेला विलंब जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्याच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण कापूस संकलन केंद्रावरून १३ लाख ३२ हजार ६१४ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यातील ९ लाख ६९ हजार ५२३ क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. ही खरेदी शासकीय खरेदीच्या तिप्पट आहे. सीसीआयच्या एकूण केंद्रांवरून केवळ ३ लाख ६० हजार ९५० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाने दगा दिल्याने पिकांची हमी राहिली नाही. यामुळे निघालेल्या उत्पन्नाला शासनाकडून बरा भाव मिळेल, ही शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली. कापसाला शासनाकडून हमीभाव म्हणून ४ हजार ५० रुपये दर जाहीर करण्यात आला. या दरात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारा नसतानाही आर्थिक अडचण असल्याने त्यांना नाईलाजास्तव तो विकावा लागला. शासनाने दर जाहीर केला तरी त्यांच्याकडून कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेत जिल्ह्यातील विविध बाजार समितीतून खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. त्यावेळी चार हजार रुपयांचा दर दिला. याच काळात निधीच्या अभावामुळे कमकुवत ठरत असलेल्या पणन महासंघाची शासनाची दुसरी एजन्सी म्हणून ओळख असलेल्या सीसीआयशी युती झाली़ पणन महासंघाला बाजारात सीसीआयचा सबएजन्ट म्हणून काम करावे लागले. ज्या ठिेकाणी सीसीआयचे संकलन केंद्र नाही, तेथे पणन महासंघाचे केंद्र सुरू करण्याची अट ठेवण्यात आली. जिल्ह्यात पणन महासंघाचे केवळ तीन केंद्र सुरू झाले. केंद्रांवरून केवळ २ हजार १४१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआय व पणन महासंघाची युती झाली असताना सीसीआयकडून कापसाचा दर्जा ठरवित हमीभावापेक्षा कमी दर देण्यात आला. त्यातही पैशाकरिता प्रतीक्षा करावी लागली. यामुळेच की काय शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात असलेल्या जिनींग मालकांनी शेतकऱ्यांना हमीदरापेक्षा १०० रुपये अधिक देत खरेदी केली. शिवाय त्यांना रोख रक्कम देणे सुरू केले. याच कारणाने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीला पाठ दाखवित व्यापाऱ्यांना साथ दिली.