शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

एका कृषी सहायकाला १० हेक्टरचे ‘टार्गेट’

By admin | Updated: May 19, 2017 02:11 IST

मातीत जन्मला, तिथेच मोठा झाला, वडिलांच्या आधाराने उपजत गुणातून शेती केली, आणि शासनाच्या

शेतकऱ्यांना करणार प्रशिक्षित : सोयाबीन तूर कपाशीला प्राधान्य; प्रयोगानंतर मिळणार अनुदान रूपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मातीत जन्मला, तिथेच मोठा झाला, वडिलांच्या आधाराने उपजत गुणातून शेती केली, आणि शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अखेर त्याच मातीत मिटणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने आता प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याकरिता कृषी विभागाच्यावतीने एका कृषी सहायकाला त्याच्या कार्यक्षेत्रातील १० हेक्टर शेतीचे टार्गेट देण्यात आले आहे. शेतकरी शेती करताना पारंपरिक पद्धतीने करीत असल्याने उत्पन्नात घट होते, यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना कृषी सहायकाला शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका गटात २५ शेतकरी राहणार आहेत. प्रत्येक गावात असे गट तयार करण्यात येणार आहे. या अभियानात कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्र शिकविण्यात येणार असल्याची माहिती आहे. यातही सोयाबीन जिल्हाभर तुरीचे प्रशिक्षण समुद्रपूर, आर्वी आणि कारंजा या भागात देण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना वर्धा, सेलू, देवळी या भागातील कृषी विभागाच्या नर्सरीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतात दिवसरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत उत्पन्न घेण्याची कला अवगत आहे. त्याला गरज आहे ती केवळ त्याच्या शेतमालाला दर देण्याची. याचा विचार कोणतीही योजना राबविताना शासनाच्यावतीने करण्याची गरज शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. महाबीजकडून मिळणार बियाणे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजकडून मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहे. गतवर्षी महाबीजचे बरेच बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचा निपटारा अद्याप झाला नाही. मग पुन्हा महाबीजच्या बियाण्यांवर शेतकरी कसा विश्वास ठेवणार, हा प्रश्नच आहे. खत आणि औषधांचा खर्च शेतकऱ्यांवरच या अभियानात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने बियाणे मिळणार आहे. मात्र बियाणे अंकुरल्यानंतर त्यांना देण्यात येणारे खत आणि किडीच्या प्रादुर्भावानंतर त्यावर प्रतिबंध लावण्याकरिता लागणाऱ्या औषधांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. सोबतच मजुरीचा खर्चही त्यांच्याच माथ्यावर येणार आहे. हा सर्व खर्च प्रयोगानंतर शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. जर हा प्रयोग अयशस्वी ठरला तर शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाकरिता नेहमीप्रमाणे चकरा मारण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. रोहिणी नक्षत्रापासून शुभारंभ या अभियानाचा कृषी विभागाच्यावतीने रोहिणी नक्षत्रापासून शुभारंभ होणार आहे. याकरिता कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना माहिती देणे सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांकडून याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शेतकरी शेतीत करतात. त्याची त्यांना माहिती आहे, यात दुमत नाही; मात्र शेती करताना त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. यात उत्पन्न कमी होत आहे. यामुळे शासनाच्यावतीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. उर्वरीत खर्च प्रयोगानंतर अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.