शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

एका कृषी सहायकाला १० हेक्टरचे ‘टार्गेट’

By admin | Updated: May 19, 2017 02:11 IST

मातीत जन्मला, तिथेच मोठा झाला, वडिलांच्या आधाराने उपजत गुणातून शेती केली, आणि शासनाच्या

शेतकऱ्यांना करणार प्रशिक्षित : सोयाबीन तूर कपाशीला प्राधान्य; प्रयोगानंतर मिळणार अनुदान रूपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मातीत जन्मला, तिथेच मोठा झाला, वडिलांच्या आधाराने उपजत गुणातून शेती केली, आणि शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अखेर त्याच मातीत मिटणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने आता प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याकरिता कृषी विभागाच्यावतीने एका कृषी सहायकाला त्याच्या कार्यक्षेत्रातील १० हेक्टर शेतीचे टार्गेट देण्यात आले आहे. शेतकरी शेती करताना पारंपरिक पद्धतीने करीत असल्याने उत्पन्नात घट होते, यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना कृषी सहायकाला शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका गटात २५ शेतकरी राहणार आहेत. प्रत्येक गावात असे गट तयार करण्यात येणार आहे. या अभियानात कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्र शिकविण्यात येणार असल्याची माहिती आहे. यातही सोयाबीन जिल्हाभर तुरीचे प्रशिक्षण समुद्रपूर, आर्वी आणि कारंजा या भागात देण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना वर्धा, सेलू, देवळी या भागातील कृषी विभागाच्या नर्सरीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतात दिवसरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत उत्पन्न घेण्याची कला अवगत आहे. त्याला गरज आहे ती केवळ त्याच्या शेतमालाला दर देण्याची. याचा विचार कोणतीही योजना राबविताना शासनाच्यावतीने करण्याची गरज शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. महाबीजकडून मिळणार बियाणे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजकडून मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहे. गतवर्षी महाबीजचे बरेच बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचा निपटारा अद्याप झाला नाही. मग पुन्हा महाबीजच्या बियाण्यांवर शेतकरी कसा विश्वास ठेवणार, हा प्रश्नच आहे. खत आणि औषधांचा खर्च शेतकऱ्यांवरच या अभियानात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने बियाणे मिळणार आहे. मात्र बियाणे अंकुरल्यानंतर त्यांना देण्यात येणारे खत आणि किडीच्या प्रादुर्भावानंतर त्यावर प्रतिबंध लावण्याकरिता लागणाऱ्या औषधांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. सोबतच मजुरीचा खर्चही त्यांच्याच माथ्यावर येणार आहे. हा सर्व खर्च प्रयोगानंतर शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. जर हा प्रयोग अयशस्वी ठरला तर शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाकरिता नेहमीप्रमाणे चकरा मारण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. रोहिणी नक्षत्रापासून शुभारंभ या अभियानाचा कृषी विभागाच्यावतीने रोहिणी नक्षत्रापासून शुभारंभ होणार आहे. याकरिता कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना माहिती देणे सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांकडून याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शेतकरी शेतीत करतात. त्याची त्यांना माहिती आहे, यात दुमत नाही; मात्र शेती करताना त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. यात उत्पन्न कमी होत आहे. यामुळे शासनाच्यावतीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. उर्वरीत खर्च प्रयोगानंतर अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.