शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१० दिवस लोटून ‘त्या’ चिमुकल्यांचा व्हिसेरा तहसील कार्यालयातच

By admin | Updated: May 17, 2015 02:26 IST

तालुक्यातील धवसा येथील दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण पुढे येण्याकरिता काढलेला व्हिसेरा

अरुण फाळके कारंजा (घाडगे)तालुक्यातील धवसा येथील दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण पुढे येण्याकरिता काढलेला व्हिसेरा तपासणीकरिता न पाठविता १० दिवसांपासून येथील तहसील कार्यालयातच कुलूपबंद असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. यामुळे या दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत तालुका प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तत्काळ तो व्हिसेरा तपासणीकरिता पाठविणे अनिवार्य आहे. येथे मात्र तहसील कार्यालयाकडूनच या नियमांना तिलांजली देण्यात आली. त्या चिमुकल्यांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या बाबीला दहा दिवस लोटूनही तो व्हिसेरा तहसील कार्यालयातच कुलूपबंद आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र आल्याशिवाय तो पाठवू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविका, तसे पत्र वेळीच देण्यात येते. तसे न झाल्यास तहसील कार्यालयाने ते मागविणे गरजेचे आहे. असे असताना त्या दोन्ही चिमुकल्यांचा व्हिसेरा तहसील कार्यालयात असणे हे न उलगडणारे कोडे आहे.मोरेश्वर वझरकर (१२ व शैलेश करणके (१५) दोन्ही रा. धवसा या दोघांचा चार महिन्यांपूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून नाही, तर अन्य कारणाने झाल्याचा आरोप त्या मृत बालकांच्या पालकांनी केला होता. यावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. याला दहा दिवसांचा कालावधी झाला आहे. तरीही व्हिसेरा तहसील कार्यालयातच पडून आहे. यामुळे तालुका प्रशासन या दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूचा खेळ करीत असल्याचा आरोप गावातून होत आहे. व्हिसेरा पाठविण्यात उशीर का होत आहे, याबद्दल शंका कुशंका व्यक्त होत आहे.