शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:52 IST

संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषाच करू शकते. हिंदी ही राष्ट्रभाषा असून आतापर्यंत राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विविध परीक्षेत १ कोटी ८० लाख विद्यार्थी सहभागी झालेत. २०१८ हे वर्ष बा बापू १५० जयंती वर्ष आहे.

ठळक मुद्देअनंतराम त्रिपाठी : राष्ट्रभाषा प्रचारक संमेलनात ‘गांधी १५०’ वर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषाच करू शकते. हिंदी ही राष्ट्रभाषा असून आतापर्यंत राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विविध परीक्षेत १ कोटी ८० लाख विद्यार्थी सहभागी झालेत. २०१८ हे वर्ष बा बापू १५० जयंती वर्ष आहे. या दृष्टीकोणातून गांधीच्या जीवन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधान मंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी यांनी केले.राष्ट्रभाषा प्रचार समितीच्यावतीने आयोजित राष्ट्रभाषा प्रचारक संमेलन घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेमचंद्र वैद्य, वामन कामडी, प्रचार अधिकारी अशोक शुक्ला, परीक्षा मंत्री प्रकाश बाभळे आदींची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी अनंतराम त्रिपाठी होते. सर्व प्रथम राष्ट्रभाषा महाविद्यालय नागालँड येथील विद्यार्थ्यांनी एक हृदय हो भारत जननी हे गीत सादर केले. वामन कामडी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या स्थापने मागील उद्देश उपस्थितांना सांगून या समितीच्या बाबतची सविस्तर माहिती दिली. अशोक शुक्ला यांनी जगातील १२२ देशांमध्ये हिंदी शिकविली जाते. नवीन पिढींने तांत्रिक शिक्षण इंग्रजीत घेतले असले तरी लोक संपर्काची भाषा हिंदी अवगत करावी व तिचा वापरही करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अशोक शुक्ला यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.४ जुलै १९३६ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाची स्थापना केली. हिंदीचा प्रचार आणि प्रसार करणे हा त्या मागचा उद्देश होता. गांधी दक्षिण आॅफे्रकेतून भारतात आले. तेव्हा त्यांनी गोखले यांना भारत भ्रमणाचा सल्ला दिला.- डॉ. हेमचंद्र वैद्य, सहाय्यक मंत्री,राष्ट्रभाषा प्रचार समिती.