शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मिष्ठान्न खरेदी करताय? जरा जपून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:56 IST

नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देभेसळयुक्त पदार्थांची विक्री : गोदामात अस्वच्छतेत तयार होतात अनेक खाद्यपदार्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सण-समारंभात मिठाई व तत्सम पदार्थांना मोठी मागणी असते. हे ओळखून खवय्यांकडून भेसळयुक्त मिठाई, खाद्यपदार्थ तयार केले जातात. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, मिठाई सेवनामुळे गंभीर आजारांना सामारे जावे लागू शकते. याकरिता ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.शहरात शेकडोवर परप्रांतातील खवय्यांनी स्वीट मार्टची दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडून येथेच मिष्टान्न व इतर खाद्यपदार्थ तयार केले जातात. यात खोव्यापासूनही मिष्टान्न तयार केले जाते. वर्ध्यात खोव्याचे फारसे उत्पादन होत नसताना मिष्ठान्न वापरासाठी खोवा येतो कोठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे. फरसाण तयार करताना भेसळयुक्त तेल, शिवाय एकाच तेलात अनेक प्रकारचे पदार्थ तळले जात असल्याने गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होतो.शहरातच अनेक विक्रेत्यांची खाद्यपदार्थ तयार करण्याची गोदामे आहेत. येथेही कमालीची अस्वच्छता असते, असे एका पाहणीत आढळून आले आहे.खाद्यपदार्थ, मिष्ठान्न तयार करणाऱ्यांचा पोषाख अतिशय घाणेरडा असतो. खाद्यपदार्थ तयार करणाºयाची नियमित आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, मिठाई विक्रेत्यांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचाही कानाडोळा होत आहे.वाटाण्यापासून तयार होते बेसणशहरातील अनेक उपाहारगृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चण्याच्या डाळीऐवजी वाटाण्यापासून निर्मित भेसळयुतक्त बेसणाचा वापर होतो. मागील अनेक दिवसांपासून विक्रेत्यांचा हा गोरखधंदा सुरू असून ग्राहकांच्या डोळ्यात धूळ झोकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थांची धडक तपासणी मोहीम राबविणार असून याअंतर्गत परवाना नूतनीकरण, नोंदणी आदी बाबी पडताळण्यासोबतच खाद्यपदार्थांचे देखील नमुने घेतले जाणार आहेत. व्यावसायिकांनी ऑनलाईन नोंदणी करीत परवाने प्राप्त करावे.- रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वर्धा.