शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मिष्ठान्न खरेदी करताय? जरा जपून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:56 IST

नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देभेसळयुक्त पदार्थांची विक्री : गोदामात अस्वच्छतेत तयार होतात अनेक खाद्यपदार्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सण-समारंभात मिठाई व तत्सम पदार्थांना मोठी मागणी असते. हे ओळखून खवय्यांकडून भेसळयुक्त मिठाई, खाद्यपदार्थ तयार केले जातात. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, मिठाई सेवनामुळे गंभीर आजारांना सामारे जावे लागू शकते. याकरिता ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.शहरात शेकडोवर परप्रांतातील खवय्यांनी स्वीट मार्टची दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडून येथेच मिष्टान्न व इतर खाद्यपदार्थ तयार केले जातात. यात खोव्यापासूनही मिष्टान्न तयार केले जाते. वर्ध्यात खोव्याचे फारसे उत्पादन होत नसताना मिष्ठान्न वापरासाठी खोवा येतो कोठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे. फरसाण तयार करताना भेसळयुक्त तेल, शिवाय एकाच तेलात अनेक प्रकारचे पदार्थ तळले जात असल्याने गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होतो.शहरातच अनेक विक्रेत्यांची खाद्यपदार्थ तयार करण्याची गोदामे आहेत. येथेही कमालीची अस्वच्छता असते, असे एका पाहणीत आढळून आले आहे.खाद्यपदार्थ, मिष्ठान्न तयार करणाऱ्यांचा पोषाख अतिशय घाणेरडा असतो. खाद्यपदार्थ तयार करणाºयाची नियमित आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, मिठाई विक्रेत्यांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचाही कानाडोळा होत आहे.वाटाण्यापासून तयार होते बेसणशहरातील अनेक उपाहारगृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चण्याच्या डाळीऐवजी वाटाण्यापासून निर्मित भेसळयुतक्त बेसणाचा वापर होतो. मागील अनेक दिवसांपासून विक्रेत्यांचा हा गोरखधंदा सुरू असून ग्राहकांच्या डोळ्यात धूळ झोकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थांची धडक तपासणी मोहीम राबविणार असून याअंतर्गत परवाना नूतनीकरण, नोंदणी आदी बाबी पडताळण्यासोबतच खाद्यपदार्थांचे देखील नमुने घेतले जाणार आहेत. व्यावसायिकांनी ऑनलाईन नोंदणी करीत परवाने प्राप्त करावे.- रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वर्धा.