शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बदनामीचा हेतू नसेल तर ती बदनामी नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2023 05:23 IST

हायकोर्टाने निकालात जवाहरलाल दर्डा विरुद्ध मनोहर कापसीकर खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने टीव्ही टुडे नेटवर्क लि.चे अध्यक्ष आणि संचालक अरुण पुरी व इतर यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला नुकताच रद्द केला. आज तक / इंडिया टुडेच्या २०१७ च्या लेखाशी संबंधित हा खटला लखनौचे माजी जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सिंह यांनी दाखल केला होता. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मंत्री गायत्री प्रजापती यांना अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात नोव्हेंबर २०१७ मध्ये जामीन मंजूर करणे हा राजेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ न्यायाधीशांच्या कटाचा भाग होता, अशी बातमी त्यांनी प्रकाशित केली होती.

मानहानीच्या तक्रारीला पुरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. आज तकचा युक्तिवाद होता की, ही बातमी प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही मानहानीचा हेतू नव्हता. ती केवळ सद्भावनेने प्रकाशित केली होती.

बातमी हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाला ३ मे २०१७ रोजी पाठविलेल्या पत्रावर आधारित होती. या पत्रात तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी प्रजापतीचा जामीन आणि त्यात न्यायाधीशांच्या सहभागाबाबत गुप्त चौकशी करण्यात आल्याचा उल्लेख होता. कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्ट कॉलेजियमला अहवालही सादर केला. या आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाने राजेंद्र सिंह यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश करण्याची आपली पूर्वीची शिफारस मागे घेतली. 

हायकोर्टाचे निरीक्षण 

हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त ज्या पत्रव्यवहारावर बातमी होती, ती तक्रारदाराने नाकारलेली नाही. कोणत्याही सार्वजनिक प्रश्नाला स्पर्श करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या वागणुकीबद्दल सद्भावनेने, कोणतेही मत व्यक्त करणे बदनामी नाही.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले होते?

हायकोर्टाने निकालात जवाहरलाल दर्डा विरुद्ध मनोहर कापसीकर खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, बदनामी करण्याचा हेतू नसेल व सद्भावनेने सत्य असल्याचे समजून प्रसिद्ध केलेली बातमी बदनामी ठरत नाही.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय