शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खरंच !! आनंद बरणीत भरून, साठवून ठेवता येतो ! पटकन आणा तुमची बरणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:48 IST

घरचे तुम्हाला पिसाळून सोडतायत ना, चला, आज बनवा आनंदाची बरणी!

ठळक मुद्देकाही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला. 

- गौरी पटवर्धन 

सध्याचा सगळ्यात मोठा वैताग काय आहे? तर काहीच आपल्या मनासारखं होत नाहीये. काहीच चांगलं होत नाहीये. बाहेर जाता येत नाही. मित्रंना घरी बोलवू शकत नाही. हवं ते खाता येत नाही. आईवडील सारखे घरात असतात त्यामुळे त्यांचं सारखं आपल्यावर लक्ष असतं आणि ते सारख्या आपल्याला सूचना देऊन पिसाळून सोडतायत. कधीही बोअर होतंय म्हंटलं की   ‘‘अभ्यास कर / पुस्तकं वाच / आधी तो फोन खाली ठेव’’ असलं काहीतरी सांगतायत. किंवा  ‘आमच्या लहानपणी’ ची कॅसेट वाजवतायत. आजीआजोबांना बाहेर फिरता येत नाही म्हणून ते चिडचिडे झालेत आणि सगळ्यांना राग काढायला आपण एकटेच सापडतोय!पण हे सगळं आपल्याला वाटतंय तितकं खरंच वाईट आहे का? का यातपण थोडं थोडं चांगलं काहीतरी होतंय आणि आपण त्याच्याकडे बघत नाही आहोत? ते ठरवायचं कसं? तर हॅपिनेस जार मधून! म्हणजे अक्षरश: आनंदाची बरणी!काय करायचं, तर आईकडून एक छोटी बरणी मिळवायची. ती तुम्हाला कोणीच काचेची देणार नाही त्यामुळे ती प्लॅस्टिकची पण चालेल. त्याच्या झाकणाला एक छोटी फट तयार करायची. पिगी बँकला असते तशी. मग घरातले सगळे रंगीत कागद गोळा करायचे. घरात रंगीत कागद नसतील तर वॉटर कलर्सनी रंग देऊन, त्यावर डिझाईन काढून आपण ते कागद तयार करायचे. आणि मग, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं होईल ते एका चिट्ठीवर लिहायचं. त्याची घडी करायची आणि त्या बरणीत टाकून द्यायची.

या चिठ्ठयांमध्ये काय काय असू शकेल? तर 1. बाल्कनीत ठेवलेल्या पाण्यात चिमण्या येऊन अंघोळ करून गेल्या.2. रस्त्यावर राहणा?्या कुत्र्याला पोळी घातल्यामुळे त्याची तुमची दोस्ती झाली.3. आज छान चित्र काढता आलं.4. आज मी पहिल्यांदाच पोळी केली.असलं काहीही छान घडलेलं तुम्ही त्या चिट्ठीवर लिहू शकता. आता या बरणीचं काय करायचं? तर ती सांभाळून ठेवायची. तिच्याकडे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला सगळंच काही वाईट घडत नाहीये. काही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला.