शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

कोरोनाची भीती,  ती आता कधी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:16 IST

भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल.

ठळक मुद्देरडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस

कोरोनाच्या सारख्या बातम्या वाचून अजूनही मला सतत भीती वाटते. घराबाहेर पडता येत नाही, आईबाबा बाहेर जाऊन आले की लगेच अंघोळ करतात, आणलेल्या वस्तू एक तर बाहेर ठेवतात किंवा साबणाने धुवून घेतात. हे असं किती दिवस चालणार? माझी भीती कधी जाणार?- मनोज शिंदे, कोल्हापूर

मनोज, तुला वाटणारी भीती अगदीच बरोबर आहे. अशी भीती आपल्यापैकी अनेकांना वाटतेय. कारण कोरोना ह्या आजाराचं स्वरूप. त्यामुळे पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागायला आपल्याला वेळच लागेल. इतकं झटकन सगळं रुटीनला येणार नाहीये. आईबाबा जी काळजी घेताहेत ती आवश्यक आहे. पण त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. तुला बाहेर जाऊ देत नाहीत, कारण त्यांना तुझी काळजी आहे. बाहेर कशामुळे संसर्ग होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे काळजी वाटते आणि म्हणून आईबाबा बाहेर पडायला नको म्हणतात. त्यामुळे तुला कंटाळा आला तर वैतागून जाऊ नकोस आणि घाबरू ही नकोस. लवकरच परिस्थिती बदलेल आणि आपण रुटीन आयुष्याला नक्की सुरुवात करू. तुलाही लवकरच बाहेर खेळायला जाता येईल. खरंतर तुला तसं जाता यावं याचसाठी आता काळजी घ्यायची आहे. 

भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल. रडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस. या काळात आपल्या भावनांना वाट करून देणं खूप गरजेचं असतं. तू रडलास किंवा घाबरलास, तरी  काहीही हरकत नाही. कुणीही तुला काहीही म्हणणार नाही.