शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कोरोनाची भीती,  ती आता कधी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:16 IST

भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल.

ठळक मुद्देरडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस

कोरोनाच्या सारख्या बातम्या वाचून अजूनही मला सतत भीती वाटते. घराबाहेर पडता येत नाही, आईबाबा बाहेर जाऊन आले की लगेच अंघोळ करतात, आणलेल्या वस्तू एक तर बाहेर ठेवतात किंवा साबणाने धुवून घेतात. हे असं किती दिवस चालणार? माझी भीती कधी जाणार?- मनोज शिंदे, कोल्हापूर

मनोज, तुला वाटणारी भीती अगदीच बरोबर आहे. अशी भीती आपल्यापैकी अनेकांना वाटतेय. कारण कोरोना ह्या आजाराचं स्वरूप. त्यामुळे पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागायला आपल्याला वेळच लागेल. इतकं झटकन सगळं रुटीनला येणार नाहीये. आईबाबा जी काळजी घेताहेत ती आवश्यक आहे. पण त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. तुला बाहेर जाऊ देत नाहीत, कारण त्यांना तुझी काळजी आहे. बाहेर कशामुळे संसर्ग होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे काळजी वाटते आणि म्हणून आईबाबा बाहेर पडायला नको म्हणतात. त्यामुळे तुला कंटाळा आला तर वैतागून जाऊ नकोस आणि घाबरू ही नकोस. लवकरच परिस्थिती बदलेल आणि आपण रुटीन आयुष्याला नक्की सुरुवात करू. तुलाही लवकरच बाहेर खेळायला जाता येईल. खरंतर तुला तसं जाता यावं याचसाठी आता काळजी घ्यायची आहे. 

भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल. रडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस. या काळात आपल्या भावनांना वाट करून देणं खूप गरजेचं असतं. तू रडलास किंवा घाबरलास, तरी  काहीही हरकत नाही. कुणीही तुला काहीही म्हणणार नाही.