शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सतत तुमची चिडचिड होत असेल, तर हे घ्या त्यावरचं उत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 13:03 IST

.. तरी बरं!

ठळक मुद्देपरिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का? 

तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की काहीच तुमच्या मनासारखं होत नाही? म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला होता, पण नेमकं परीक्षेच्या वेळी बरं नव्हतं म्हणून चांगले मार्क्‍स मिळाले नाहीत.. किंवा तुम्ही खरंच गृहपाठ केला होता, पण तुम्ही खरंच वही घरी विसरलात आणि मग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली.. किंवा तुम्ही लग्नाला जाण्यासाठी तुमच्या सगळ्यात आवडत्या नवीन ड्रेसला इस्त्री करायला घेतलीत आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आणि त्या गडबडीत नेमकं त्याचं वरचं नेट जळलं आणि आता तो घागरा तुम्ही घालू शकत नाही..जाऊदे. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत सारख्या घडत असतात आणि त्यामुळे आपली त्या त्या वेळी भयंकर चिडचिड पण झालेली असते. आणि सारखं सारखं असं व्हायला लागलं की आपल्याला वाटतं, की अश्या सगळ्या गोष्टी फक्त माङयाच बाबतीत होतात. इतर सगळ्यांचं सगळं छान होतं. मलाच फक्त हवं तसं काही होत नाही. आणि मग आपणही प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करायला लागतो. पण आपल्याला जरी असं वाटत असलं तरी ते काही खरं नसतं. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात हेही खरं नसतं आणि आपल्या बाबतीत सगळं वाईटच घडतं हेही खरं नसतं. पण ज्यावेळी काहीतरी असं मनाविरुद्ध घडतं तेव्हा ते हँडल कसं करायचं ते आपल्याला कळत नाही हा खरा प्रॉब्लेम असतो. आणि त्यावरचं उत्तर आहे, तरी बरं!प्रत्येक वेळी असं काही तरी झालं की त्याहून काय वाईट घडलं असतं त्याचा विचार करायचा आणि स्वत:ला सांगायचं की,  ‘तरी बरं, इतकं वाईट काही घडलं नाही!’म्हणजे सगळ्यात आवडता नवीन घागरा खराब झाला, तरी बरं, दुसरा एखादा ड्रेस घालायला होता. एकच ड्रेस असता तर मी लग्नात काय घातलं असतं? असा विचार करायचा, म्हणजे आपल्याला कमी त्रस होतो.परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, पण निदान आपला वैताग तरी कमी करू शकतो का?