शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

त्याच त्या ठिकाणांना कंटाळले असाल, मनाला शांतता हवी असेल तर भेट द्या 'या' रोमांचक ठिकाणांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 11:14 IST

त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना ना शांतता मिळत ना त्यांचा स्ट्रेस दूर होत. पण आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत.

(Image Credit : roughguides.com)

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी अनेकजण कुठेतरी बाहेर जाऊन वेळ घालवण्याचा प्लॅन आखतात. पण त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना ना शांतता मिळत ना त्यांचा स्ट्रेस दूर होत. पण आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्हाला शांतताही मिळेल आणि आपण दुस-या जगात आलो की, काय असंही तुम्हाला वाटेल. 

(Image Credit : lostwithpurpose.com)

1) जर तुम्ही कधी स्वप्न पाहिलं असेल की, तुम्ही हिरव्यागार डोंगरातून चालत आहात. तुमच्याकडे त्रास द्यायला फोनही नाहीये. कारण तिथे सिग्नल नाहीये. तर ते ठिकाण नागालॅंडमधील झुकोवू व्हॅली असू शकतं. इथे सगळीकडेच हिरवीगार डोंगरं आहेत. त्यामुळे इथली सफर तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरु शकते. 

(Image Credit : walkingwanderer.com)

2) हिमाचल प्रदेशातील तोश हे गावही तुमच्यासाठी ड्रीम ट्रीप ठरु शकतं. कारण इथे तुम्हाला हवी असलेली शांतता नक्की मिळेल. हे ठिकाण नक्कीच तुम्हाला स्वप्नवत वाटणारंच असणार आहे. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही इथेही जाण्याचा प्लॅन करु शकता. 

(Image Credit : Social Media)

3) जर तुम्हाला निळ्या पाण्याच्या शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. हे ठिकाण आहे कर्नाटकातील गोकरणा. इथे तुम्हाला कधीही न पाहिला इतका स्वच्छ समुद्र बघायला मिळेत. 

4) जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणी जाण्याची आवड असेल आणि शांतता हवी असेल जर मध्यप्रदेशातील ओर्चा हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य ठरेल. इतिहासाची माहिती मिळण्यासोबतच इथे तुम्हाला वेगळीच शांतता अनुभवायला मिळणार आहे. 

(Image Credit : traveltriangle.com)

5) लक्षद्वीप या ठिकाणाला भेट देणा-यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे. त्यामुळे दुसरीकडे जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा या ठिकाणाला भेट दिलेली कधीही फायद्याची ठरेल.

(Image Credit : deccanherald.com)

6) सुंदर रस्ते, सुंदर घरं आणि सुंदर समुद्र यासाठी पुदूचेरी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नेहमीच्या कंटाळलेल्या ठिकाणांना स्किप करुन हे ठिकाण तुम्हाला वेगळा आनंद देऊ शकतं. 

(Image Credit : blog.hopbucket.com)

7) कर्नाटकातील हंपी या ठिकाणाला एकदा भेट दिल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा इथे याल. कारण इथे सुंदर मंदिरं, खळखळणारी नदी, हिरवीगार जंगलं तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यामुळे इथे न चुकता एकदा तरी भेट द्यायला हवी.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन