शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रवासाला जायचं आणि आजारी पडून यायचं.. कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 12:52 IST

प्रवासादरम्यान ही काळजी घ्या आणि ठेवा स्वत:ला फिट!

ठळक मुद्देप्रवासादरम्यान जितकं जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव्ह राहाता येईल तितकं चांगलं. प्रवास संपल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी हलका व्यायाम अवश्य केला पाहिजे. उन्हाच्या तडाख्यानं आणि सातत्यानं पावसात भिजल्यानं आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो. त्याचा अगोदरच बंदोबस्त करा.प्रवासाच्या आधी आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं.प्रवासाच्या आधी आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं.

- मयूर पठाडेप्रवासाला जायचं म्हणजे त्यासाठी अगदी देशाबाहेर किंवा खूप लांबच गेलं पाहिजे असं नाही. बºयाचदा आपल्या कामासाठीही अनेकदा आपला प्रवास होत असतो. काही जण तर नोकरीनिमित्तानं रोज अपडाऊन करीत असतात.प्रवास कुठलाही असो, काही गोष्टींची नियमित काळजी घेतली गेली पाहिजे, नाहीतर आपल्याआरोग्यासाठी ते महागात पडू शकतं. कारण प्रवासादरम्यान इन्फेक्शन होण्याचं आणि आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं असतं.प्रवासात काय काळजी घ्याल?१- प्रवासात आपल्या खाण्याकडे नेहमीच व्यवस्थित लक्ष द्या, कारण दुषित अन्नपदार्थांमुळे आपल्या आरोग्याची वाट लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते. पोटदुखी, डायरिया, गॅसेस.. यासारखे आजार नेहमीच प्रवासाची देण असते.२- प्रवासाच्या दरम्यान एक काळजी आवर्जुन घेता येईल, ती म्हणजे सातत्यानं आपले हात स्वच्छ धुणं. इन्फेक्शनची शक्यता त्यामुळे बरीच कमी होते.३- प्रवासाच आपलं घरचं स्वच्छ पाणी कायम आपल्या बरोबर असावं. किमान घरातून निघताना तरी जेवढं पाणी आपल्याला आपल्यासोबत कॅरी करणं शक्य आहे, तेवढं नक्कीच घ्यावं. नंतर मिनरल वॉटर बोटल्सचा वापर करता येईल, पण कुठल्याही परिस्थितीत हॉटेल किंवा इतर ठिकाणंच पाणी पिण्याचा मोह टाळावा. पैसे जातील, पण आरोग्यासाठी शेवटी तेच उपयुक्त ठरेल.४- प्रवासादरम्यान आपण नेहमी आळसावलेले असतो. प्रवासानं अंगदेखील आंबलेलं असतं. अशावेळी जितकं जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव्ह राहाता येईल तितकं चांगलं. प्रवास संपल्यानंतर जिथे कुठे आपला मुक्काम असेल, त्या ठिकाणी किमान हलका व्यायामही अवश्य केला पाहिजे.५- प्रवासात उन्हाची आणि पावसाची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाच्या तडाख्यानं आणि सातत्यानं पावसात भिजल्यानं आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो.६- आपला प्रवास जर मोठा असेल, विशेषत: परदेशात जायचं असेल तेव्हा तर आपल्या डॉक्टरांकडून आवश्यक ते व्हॅक्सिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.