शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'मदर मार्केट' इथे फक्त महिला राज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:54 IST

कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या मार्केटमध्ये हौसेनं खरेदीला जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या मदर मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही महिलाच आहेत.

ठळक मुद्दे* मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये ‘मदर मार्केट’ या नावानं हा बाजार भरतो. थोडीथोडक्या नाही तर तब्बल 500 वर्षांपासून हा बाजार भरत आहे. पूर्णपणे महिलांचं हे मार्केट कसं अस्तित्वात आलं याची कहाणीही रंजक आहे.* ‘मदर मार्केट’ हे आशियातल्या सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 5000 हून अधिक महिला एकाचवेळी बाजार भरवतात.* या मार्केटच्या माध्यमातून महिला दरमहा 50 हजारांपासून 2 लाख रूपयांची कमाई करत आहेत.

अमृता कदम 

महिलांना प्रवेशबंदी असलेल्या मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं-वाचलं आहे. त्याबद्दल ब-याच चर्चा, वाद-विवादही झालेले आहेत. पण भारतात एक जागा अशी आहे जिथे पुरूषांना प्रवेशबंदी आहे. इथे केवळ बायकांचेच राज्य चालते. पण हे मंदिर नाही तर मार्केट आहे. देशाच्या ईशान्येला वसलेल्या मणिपूरची राजधानी इम्फाळ इथे हे मार्केट आहे. खरंतर कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या माकेर्टमध्ये हौसेनं खरेदीला   जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या या मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही महिलाच आहेत.

 

500 वर्षांचा इतिहास

मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये ‘मदर मार्केट’ या नावानं हा बाजार भरतो. थोडीथोडक्या नाही तर तब्बल 500 वर्षांपासून हा बाजार भरत आहे. पूर्णपणे महिलांचं हे मार्केट कसं अस्तित्वात आलं याची कहाणीही रंजक आहे. म्हणजे पुरूषांना इथे येऊ द्यायचं असा काही ठराव झालेला नव्हता. पण मणिपूरमध्ये बहुतांश पुरु ष हे देशाच्या रक्षणासाठी लष्करात भरती झालेले आहेत. देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीश आणि त्याहीआधी राजेरजवाड्यांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी ही महिलांवरच येऊन पडली. मार्केटमध्ये सातत्यानं महिलांचं वर्चस्व ठसत गेलं. त्यातून पुढे मग ‘फक्त महिला’ हा या मार्केटचा नियमच तयार झाला

आशियातला मोठा बाजार

‘मदर मार्केट’ हे आशियातल्या सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 5000 हून अधिक महिला एकाचवेळी बाजार भरवतात. या बाजारात मासे, भाजी, बांबू आणि धातूपासून बनवलेली विविध शिल्प आणि अन्य वस्तूंची विक्री होते. या मार्केटच्या माध्यमातून महिला दरमहा 50 हजारांपासून 2 लाख रूपयांची कमाई करत आहेत. हा बाजार म्हणजे केवळ खरेदीविक्रीचं केंद्र नव्हे तर महिलांसाठीचे प्रशिक्षण केंद्रही आहे. या बाजाराच्या माध्यमातून अनेक महिला काम करायला शिकल्या आहेत.

एका महाकाय भूकंपानंतर2016 मध्ये इम्फाळमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला होता. या भूकंपात या मार्केटचं खूप मोठं नुकसान झालं. आजूबाजूच्या इमारती आणि घरांचं छप्पर या मार्केटवर कोसळलं होतं. या काळात तुटलेल्या रस्त्यांवरच दुकान लावून या महिलांनी आपली रोजीरोटी कमावली. पण हळूहळू या मार्केटची स्थिती पुन्हा सुधारत असून पुन्हा ते जुन्या रु पात सज्ज होताना दिसतंय.त्यामुळे कधी नॉर्थ इस्टच्या सफरीवर गेलात आणि मणिपूरमध्ये राहण्याचा योग आलाच तर या अनोख्या मार्केटला भेट देण्याची संधी तुम्हाला नक्की मिळेल. अर्थात स्त्री असाल तर... हे यामध्ये ओघानं आलंच.