शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आयुष्यभर ऊर्जा देणारं प्रवासातलं संचित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:25 IST

ते जपून ठेवायलाच हवं..

ठळक मुद्देप्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच.केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, कला, खाद्यसंस्कृती.. या गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.

- मयूर पठाडेमौजमजा करण्यासाठी, आपले सारे ताणतणाव विसरण्यासाठी आपण प्रवासाला निघतो, पण खरंच किती जणांना हे पथ्य पाळता येतं. बाहेर पडले तरी आॅफिसमध्ये आता काय असेल, सारी कामं व्यवस्थित होत असतील की नाही, माझ्या घराकडे कोण बघेल.. असंख्य चिंता आणि काळज्यांचं गाठोडं आपण सोबतच बाळगलेलं असतं.त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, एकदा बाहेर पडल्यानंतर नसत्या काळज्यांनी स्वत:चा जीव पोखरून घेऊ नये. त्यापेक्षा आपली ही ट्रिप संस्मरणीय कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण प्रवासातल्या अनेक गोष्टी आपल्याला नव्या ऊर्जा देऊन जातात आणि आयुष्यभर पुरेल असं संचितही त्या आपल्याला पुरवतात.प्रवास संस्मरणीय होण्यासाठी..प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच, पण केवळ एखाद्याच गोष्टीवरुन आपलं पूर्ण मतही बनवायला नको.एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील साºया महत्त्वाच्या गोष्टी तर पाहायलाच हव्यात, पण केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणची कला, खाद्यसंस्कृती.. या साºयाच गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपण हमखास तिथल्या खाद्यपदार्थांची चव घेतोच, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. त्या जेवणाची, त्या पदार्थाची लज्जत आणखीच वाढेल आणि नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.बॅगपॅक करून जगप्रवासाला निघालेली किंवा कायम वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट देणारे भटके कायम याच ट्रिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.निसर्ग आणि तिथली प्रसिद्ध ठिकाणं आपण जशी पाहतो, तशीच त्या ठिकाणची वेगवेगळी माणसंही आपण आवर्जुन पाहिली पाहिजेत. ही माणसं कदाचित तुम्हाला इतकं काही देऊन जातील की नंतर ती तुमच्या आयुष्याचाच एक भाग होऊन जातील.. पुढच्या पिढीतही तो वारसा अधिक बळकट होईल..