शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

आयुष्यभर ऊर्जा देणारं प्रवासातलं संचित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:25 IST

ते जपून ठेवायलाच हवं..

ठळक मुद्देप्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच.केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, कला, खाद्यसंस्कृती.. या गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.

- मयूर पठाडेमौजमजा करण्यासाठी, आपले सारे ताणतणाव विसरण्यासाठी आपण प्रवासाला निघतो, पण खरंच किती जणांना हे पथ्य पाळता येतं. बाहेर पडले तरी आॅफिसमध्ये आता काय असेल, सारी कामं व्यवस्थित होत असतील की नाही, माझ्या घराकडे कोण बघेल.. असंख्य चिंता आणि काळज्यांचं गाठोडं आपण सोबतच बाळगलेलं असतं.त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, एकदा बाहेर पडल्यानंतर नसत्या काळज्यांनी स्वत:चा जीव पोखरून घेऊ नये. त्यापेक्षा आपली ही ट्रिप संस्मरणीय कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण प्रवासातल्या अनेक गोष्टी आपल्याला नव्या ऊर्जा देऊन जातात आणि आयुष्यभर पुरेल असं संचितही त्या आपल्याला पुरवतात.प्रवास संस्मरणीय होण्यासाठी..प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच, पण केवळ एखाद्याच गोष्टीवरुन आपलं पूर्ण मतही बनवायला नको.एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील साºया महत्त्वाच्या गोष्टी तर पाहायलाच हव्यात, पण केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणची कला, खाद्यसंस्कृती.. या साºयाच गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपण हमखास तिथल्या खाद्यपदार्थांची चव घेतोच, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. त्या जेवणाची, त्या पदार्थाची लज्जत आणखीच वाढेल आणि नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.बॅगपॅक करून जगप्रवासाला निघालेली किंवा कायम वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट देणारे भटके कायम याच ट्रिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.निसर्ग आणि तिथली प्रसिद्ध ठिकाणं आपण जशी पाहतो, तशीच त्या ठिकाणची वेगवेगळी माणसंही आपण आवर्जुन पाहिली पाहिजेत. ही माणसं कदाचित तुम्हाला इतकं काही देऊन जातील की नंतर ती तुमच्या आयुष्याचाच एक भाग होऊन जातील.. पुढच्या पिढीतही तो वारसा अधिक बळकट होईल..