शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

प्रवासाच्या डिजिटल नियोजनात भारतीय प्रवासी लई भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:13 IST

केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.

ठळक मुद्दे* 2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे.* ‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.* भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास            करणा-याप्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.

-अमृता कदमआजकाल परदेशी प्रवास करणा-या भारतीय प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.

‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे. या यादीत चीननं दुसरं स्थान मिळवलं आहे. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती असलेला इंडोनेशिया या यादीत तिस-या क्र मांकावर आहे.19 देशांतल्या पर्यटकांच्या माहितीवर हे सर्वेक्षण आधारित आहे. प्रवासाचं नियोजन, तिकिट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि प्रवासातल्या इतर टप्प्यांवर पर्यटक डिजिटल पर्यायांचा अवलंब कसा करतात याचा संदर्भ घेत ही यादी केली आहे.

 

भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास करणा-या प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.भारतीय प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार करता स्मार्टफोन हे सर्वाधिक पसंतीचं डिजिटल डिव्हाइस असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 82टक्के भारतीय प्रवाशांच्या मते मोबाइल बोर्डिंग पास आणि          इ तिकिट ही जास्त सोयीची असतात.66 टक्के भारतीय वाय-फायसाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या हॉटेल्समध्ये बुकिंग करणं टाळतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लांबचे प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांना आपल्या कुटुंबियांशी तसंच मित्र-मैत्रिणींशी व्हर्च्युअली कनेक्टेड असण्याची आवश्यकता भासते. त्यामुळेच प्रवासाचं नियोजन करताना कनिक्टिव्हिटीचा विचारही केला जातो.

एकूणच आधुनिक तंत्राचा वापर करत आपल्या प्रवासाचं प्लॅनिंग करण्यात भारतीय प्रवाशांनी आघाडी घेतली आहे, हे नक्की.