शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाच्या डिजिटल नियोजनात भारतीय प्रवासी लई भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:13 IST

केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.

ठळक मुद्दे* 2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे.* ‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.* भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास            करणा-याप्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.

-अमृता कदमआजकाल परदेशी प्रवास करणा-या भारतीय प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.

‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे. या यादीत चीननं दुसरं स्थान मिळवलं आहे. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती असलेला इंडोनेशिया या यादीत तिस-या क्र मांकावर आहे.19 देशांतल्या पर्यटकांच्या माहितीवर हे सर्वेक्षण आधारित आहे. प्रवासाचं नियोजन, तिकिट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि प्रवासातल्या इतर टप्प्यांवर पर्यटक डिजिटल पर्यायांचा अवलंब कसा करतात याचा संदर्भ घेत ही यादी केली आहे.

 

भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास करणा-या प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.भारतीय प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार करता स्मार्टफोन हे सर्वाधिक पसंतीचं डिजिटल डिव्हाइस असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 82टक्के भारतीय प्रवाशांच्या मते मोबाइल बोर्डिंग पास आणि          इ तिकिट ही जास्त सोयीची असतात.66 टक्के भारतीय वाय-फायसाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या हॉटेल्समध्ये बुकिंग करणं टाळतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लांबचे प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांना आपल्या कुटुंबियांशी तसंच मित्र-मैत्रिणींशी व्हर्च्युअली कनेक्टेड असण्याची आवश्यकता भासते. त्यामुळेच प्रवासाचं नियोजन करताना कनिक्टिव्हिटीचा विचारही केला जातो.

एकूणच आधुनिक तंत्राचा वापर करत आपल्या प्रवासाचं प्लॅनिंग करण्यात भारतीय प्रवाशांनी आघाडी घेतली आहे, हे नक्की.