शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला ओळखायचं असेल तर प्रवासासारखं उत्तम साधन नाही!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 14:58 IST

प्रवासातून मिळणारं संचित आपल्याला आयुष्यभर पुरतं.

ठळक मुद्देस्वत:ची ओळख प्रवासानं येते.प्रवासात भेटलेल्या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते.आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.भाषेचा व्यासंग सुधारण्यासही प्रवासामुळे मदत होते.

- मयूर पठाडेकोणकोणत्या गोष्टींपासून आपल्याला फार फायदा होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यासंदर्भातली एक आर्याही खूप प्रसिद्ध आहे..केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचारशास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फारम्हणजे काय, तर परदेश प्रवास, पंडितांशी मैत्री, वेगवेगळ्या सभांमधील नामांकित वक्त्यांचे विचार ऐकणं आणि ग्रंथांचं वाचन यामुळे आपल्यात फार चातुर्य, शहाणपण येतं या अर्थाची ही आर्या आहे.यात देशाटन म्हणजेच परदेश प्रवासाचा उल्लेख केला आहे. अर्थात फक्त परदेश प्रवास केल्यानंच तुमच्यात चातुर्य, शहाणपण येतं असं नाही, कुठल्याही प्रवासानं, जग पाहिल्यानं आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्यामुळेच नियमितपणे आणि डोळे उघडे ठेऊन प्रवास केला तर ते आपल्या फारच फायद्याचं आहे असा या आर्याचा साधारण आशय..प्रवासाच्या फायद्यांची यादी केली तर ती फारच मोठी होईल. त्यातील काही मोजक्या फायद्यांचा विचार आपण करू. 

प्रवासाचे काय फायदे आहेत?१- प्रवासामुळे आपल्याला ‘दृष्टी’ येते. अनेक गोष्टी आपल्याला लख्खपणे कळतात.२- मुख्य म्हणजे प्रवासात इतक्या गोष्टी आणि इतकी माणसं पाहिल्यामुळे आपण नेमकं कोण आहोत, किती पाण्यात आहोत, आपण काय केलं पाहिजे याची समजही येते. म्हणजेच स्वत:ची ओळख प्रवासानं येते.३- प्रवासात जी निरनिराळी माणसं आपल्याला भेटतात, त्यांच्याशी जर संवाद साधला तर अनेक आश्चर्यकारक आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात. या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरीही आपल्याला आयुष्यभर पुरते.४- प्रवासामुळे आपल्यातही आपोआपच सुधारणा होत जाते. अनेक गोष्टी आपल्याला स्वत: कराव्या लागतात. ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतात. अडचणींतून मार्ग काढावा लागतो. काही वेळा संयमाचीही परीक्षा होते. आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.५- तुम्ही कुठेही जा, पण संस्कृती आणि भाषेतलं वैविध्य तुम्हाला जाणवतंच. अगदी मराठी मुलखातच जरी तुम्ही गेलेला असलात, तरी तिथली बोली भाषा, काही शब्द, बोलण्याचा हेल इत्यादि अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे भाषेचा व्यासंग सुधारण्यासही मदत होते.६- प्रवास हा खरं म्हणजे एक प्रकारचं अ‍ॅडव्हेन्चरच असतं. अशा अ‍ॅडव्हेन्चरची तुम्हाला प्रवासामुळे सवय होते.प्रवासानं अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्याला त्या समृद्ध करतात. त्याविषयी पुढच्या भागात..