शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

स्वत:ला ओळखायचं असेल तर प्रवासासारखं उत्तम साधन नाही!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 14:58 IST

प्रवासातून मिळणारं संचित आपल्याला आयुष्यभर पुरतं.

ठळक मुद्देस्वत:ची ओळख प्रवासानं येते.प्रवासात भेटलेल्या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते.आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.भाषेचा व्यासंग सुधारण्यासही प्रवासामुळे मदत होते.

- मयूर पठाडेकोणकोणत्या गोष्टींपासून आपल्याला फार फायदा होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यासंदर्भातली एक आर्याही खूप प्रसिद्ध आहे..केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचारशास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फारम्हणजे काय, तर परदेश प्रवास, पंडितांशी मैत्री, वेगवेगळ्या सभांमधील नामांकित वक्त्यांचे विचार ऐकणं आणि ग्रंथांचं वाचन यामुळे आपल्यात फार चातुर्य, शहाणपण येतं या अर्थाची ही आर्या आहे.यात देशाटन म्हणजेच परदेश प्रवासाचा उल्लेख केला आहे. अर्थात फक्त परदेश प्रवास केल्यानंच तुमच्यात चातुर्य, शहाणपण येतं असं नाही, कुठल्याही प्रवासानं, जग पाहिल्यानं आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्यामुळेच नियमितपणे आणि डोळे उघडे ठेऊन प्रवास केला तर ते आपल्या फारच फायद्याचं आहे असा या आर्याचा साधारण आशय..प्रवासाच्या फायद्यांची यादी केली तर ती फारच मोठी होईल. त्यातील काही मोजक्या फायद्यांचा विचार आपण करू. 

प्रवासाचे काय फायदे आहेत?१- प्रवासामुळे आपल्याला ‘दृष्टी’ येते. अनेक गोष्टी आपल्याला लख्खपणे कळतात.२- मुख्य म्हणजे प्रवासात इतक्या गोष्टी आणि इतकी माणसं पाहिल्यामुळे आपण नेमकं कोण आहोत, किती पाण्यात आहोत, आपण काय केलं पाहिजे याची समजही येते. म्हणजेच स्वत:ची ओळख प्रवासानं येते.३- प्रवासात जी निरनिराळी माणसं आपल्याला भेटतात, त्यांच्याशी जर संवाद साधला तर अनेक आश्चर्यकारक आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात. या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरीही आपल्याला आयुष्यभर पुरते.४- प्रवासामुळे आपल्यातही आपोआपच सुधारणा होत जाते. अनेक गोष्टी आपल्याला स्वत: कराव्या लागतात. ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतात. अडचणींतून मार्ग काढावा लागतो. काही वेळा संयमाचीही परीक्षा होते. आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.५- तुम्ही कुठेही जा, पण संस्कृती आणि भाषेतलं वैविध्य तुम्हाला जाणवतंच. अगदी मराठी मुलखातच जरी तुम्ही गेलेला असलात, तरी तिथली बोली भाषा, काही शब्द, बोलण्याचा हेल इत्यादि अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे भाषेचा व्यासंग सुधारण्यासही मदत होते.६- प्रवास हा खरं म्हणजे एक प्रकारचं अ‍ॅडव्हेन्चरच असतं. अशा अ‍ॅडव्हेन्चरची तुम्हाला प्रवासामुळे सवय होते.प्रवासानं अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्याला त्या समृद्ध करतात. त्याविषयी पुढच्या भागात..