शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात निसर्गसौंदर्यानं चिंब व्हायचंय मग पावसाळी भटकंती कराच. खूप लांब जावू नका या दहापैकी एखादं ठिकाण निवडा!

By admin | Updated: June 14, 2017 18:33 IST

पावसाळ्यातल्या भटकंतीसाठी फार लांब जायचीही गरज नाही. पावसाचा रोमांचक अनुभव देतील अशी अनेक ठिकाणं महाराष्ट्रातच आहेत.

 

- अमृता कदम

मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घ्यायला प्रत्येकचजणच उत्सुक झाला आहे. पण घरात बसून गॅलरीतून किंवा खिडकीत बसून धो धो कोसळणारा पाऊस बघणं म्हणजे पावसाचा आनंद घेणं नव्हे. पावसाचा खरा आनंद मिळतो तो पावसाळ्यातल्या भटकंतीनंच. पावसासोबत शरीर आणि मन ओलं करून निसर्गाचा आनंद घेत केलेली भटकंती करणं म्हणजे पावसाचा खरा आनंद घेणं होय. म्हणूनच पावसाळ्यातली एखादी मस्त ट्रीप आताच प्लॅन करा. पावसाळ्यातल्या भटकंतीसाठी फार लांब जायचीही गरज नाही. पावसाचा रोमांचक अनुभव देतील अशी अनेक ठिकाणं महाराष्ट्रातच आहेत.

पावसाळ्यातली भटकंती

 

 

1.माथेरान

मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या हिलस्टेशनला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. पण पावसाळ्यातला माथेरानचा नजारा काही औरच आहे. इथल्या गर्द झाडीतून धो-धो कोसळणाऱ्या पावसात लाल मातीच्या वाटा तुडवायच्या...मध्येच थांबून वाफाळता चहाचा कप किंवा गरमागरम मक्याचं कणीस मिळाल्यावर तर अजून काय हवं? तुमच्याकडे गाडी असेल तर ठीकच, पण जर नसेल तर मुंबईपासून नेरळपर्यंत लोकल आहे. तिथून तुम्हाला माथेरानला जायला गाडी मिळू शकते. हॉटेलसोबत माथेरानला होमस्टेच्याही सुविधा उपलब्ध आहेत.

2.भंडारदरा

गेल्या काही वर्षांत मान्सून ट्रीपसाठी भंडारदरा हे तरु णाईचं आवडतं ठिकाण आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या या ठिकाणी ट्रेकिंगसाठी योग्य अशी अनेक ठिकाणं आहेत. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारदऱ्यात धबधबे, भंडारदरा तलाव, रतनगड, हरिश्चंद्रगड सारखी ठिकाणं आहेत.

3.कास-तापोळा

पुष्पपठारामुळे कास आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. इथे साधारण सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात फुलणारी फुलं पहायला तर पर्यटक गर्दी करतातच, पण पावसाळ्यातही कासचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. कासला जोडूनच तुम्ही पुढे तापोळ्यालाही जाऊ शकता. डोंगरराजीनं वेढलेलं तापोळा पावसाळ्यात ढगांची चादर लपेटतं. तापोळ्यात तुम्ही बोटिंग आणि राफ्टींगचाही आनंद घेऊ शकता.

4.भीमाशंकर

भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण तितकंच ते प्रसिद्ध आहे इथल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि अभयारण्यासाठी. हिरवळ आणि पावसाळ्यात फुटणारे अनेक झरे भीमाशंकरच्या सौंदर्यात भर टाकतात. पुण्यापासून भीमाशंकर 127 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून भीमाशंकरला जायला एसटीही आहेत.

 

         

5.माळशेज घाट

पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणांहून माळशेज घाट जवळ आहे. त्यामुळेच इथल्या धबधब्यांखाली ऐन पावसात भिजायला नेहमीच गर्दी होत असते.

6.दिवे-आगर-हरिहरेश्वर

पावसाळ्यात उधाणलेला समुद्र पहायचा असेल तर कोकणात जायलाच हवं. दिवे आगर आणि हरिहरेश्वरचे समुद्रकिनारे हे स्वच्छ, शांत, निवांत आहेत. इथे पर्यटकांची फारशी वर्दळही नसते. इथे होम स्टेची सुविधा तर उपलब्ध आहेच. शिवाय घरगुती पद्धतीनं बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशांवरही मस्त ताव मारता येतो. अर्थात पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर आपल्या हौसेला थोडी मर्यादाही घालून घ्यायला हवी. तरच प्रवासाचा आनंद सुरक्षितपणे घेता येतो.

7.कळसूबाई

महाराष्ट्रातलं हे सर्वोच्च शिखर.साहसाची हौस असेल तर ऐन पावसाळ्यात कळसूबाईचा ट्रेक करायला हरकत नाही. पण पावसाळ्यात जोरात वाहणारे वारे तुम्हाला वर चढताना चांगलाच त्रास देतात. शिवाय इथल्या शिड्या आणि वाटाही निसरड्या झालेल्या असू शकतात. त्यामुळेच जर तुम्ही कसलेले ट्रेकर असाल तरच पावसाळ्यात या ट्रेकच्या फंदात पडा.

8.ठोसेघरचा धबधबा

सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण अजूनही पुरेसं एक्सप्लोअर केलं गेलेलं नाहीये. पण ज्यांना शांत, निवांत आणि निसर्गानं ओतप्रोत भरलेल्या ठिकाणी जावंसं वाटतं त्यांच्यासाठी ठोसेघर अगदीच उत्तर पर्याय आहे. पुण्यापासून फक्त तीन तासांच्या अंतरावर ठोसघर आहे. ठोसेघरचा धबधबा पाहाणाऱ्याला वेड लावतो.

   

 

 

 

9) लोणावळा

लोणावळा हे पर्यटनस्थळ म्हणून खूपच परिचित झालेलं आहे. पण तरीही इथला टायगर पॉइंट पावसाळ्यात अवश्य पाहावा असाच आहे. निसर्गातल्या सौंदर्याची पावसाळी जादू तिथे नक्की अनुभवायला मिळते.

10. कोलाड

रिव्हर राफ्टिंगचा परवडणारा अनुभव घ्यायचा असेल तर मग कोकणातल्या कोलाडला जायलाच हवं. कुंडलिका नदी, आजूबाजूच्या जंगलामुळे पसरलेली हिरवळ यामुळे निसर्गप्रेमी पावसाळ्यात कोलाडला गेले की निसर्गसुखाच्या आनंदानं चिंब होतात. पावसाळ्यात कोलाडमध्ये घालवलेला एक दिवस तुमची पावसाळी ट्रिप नक्की सार्थकी लावते.