शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

भरपावसात निसर्गसौंदर्यानं चिंब व्हायचंय मग पावसाळी भटकंती कराच. खूप लांब जावू नका या दहापैकी एखादं ठिकाण निवडा!

By admin | Updated: June 14, 2017 18:33 IST

पावसाळ्यातल्या भटकंतीसाठी फार लांब जायचीही गरज नाही. पावसाचा रोमांचक अनुभव देतील अशी अनेक ठिकाणं महाराष्ट्रातच आहेत.

 

- अमृता कदम

मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घ्यायला प्रत्येकचजणच उत्सुक झाला आहे. पण घरात बसून गॅलरीतून किंवा खिडकीत बसून धो धो कोसळणारा पाऊस बघणं म्हणजे पावसाचा आनंद घेणं नव्हे. पावसाचा खरा आनंद मिळतो तो पावसाळ्यातल्या भटकंतीनंच. पावसासोबत शरीर आणि मन ओलं करून निसर्गाचा आनंद घेत केलेली भटकंती करणं म्हणजे पावसाचा खरा आनंद घेणं होय. म्हणूनच पावसाळ्यातली एखादी मस्त ट्रीप आताच प्लॅन करा. पावसाळ्यातल्या भटकंतीसाठी फार लांब जायचीही गरज नाही. पावसाचा रोमांचक अनुभव देतील अशी अनेक ठिकाणं महाराष्ट्रातच आहेत.

पावसाळ्यातली भटकंती

 

 

1.माथेरान

मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या हिलस्टेशनला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. पण पावसाळ्यातला माथेरानचा नजारा काही औरच आहे. इथल्या गर्द झाडीतून धो-धो कोसळणाऱ्या पावसात लाल मातीच्या वाटा तुडवायच्या...मध्येच थांबून वाफाळता चहाचा कप किंवा गरमागरम मक्याचं कणीस मिळाल्यावर तर अजून काय हवं? तुमच्याकडे गाडी असेल तर ठीकच, पण जर नसेल तर मुंबईपासून नेरळपर्यंत लोकल आहे. तिथून तुम्हाला माथेरानला जायला गाडी मिळू शकते. हॉटेलसोबत माथेरानला होमस्टेच्याही सुविधा उपलब्ध आहेत.

2.भंडारदरा

गेल्या काही वर्षांत मान्सून ट्रीपसाठी भंडारदरा हे तरु णाईचं आवडतं ठिकाण आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या या ठिकाणी ट्रेकिंगसाठी योग्य अशी अनेक ठिकाणं आहेत. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारदऱ्यात धबधबे, भंडारदरा तलाव, रतनगड, हरिश्चंद्रगड सारखी ठिकाणं आहेत.

3.कास-तापोळा

पुष्पपठारामुळे कास आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. इथे साधारण सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात फुलणारी फुलं पहायला तर पर्यटक गर्दी करतातच, पण पावसाळ्यातही कासचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. कासला जोडूनच तुम्ही पुढे तापोळ्यालाही जाऊ शकता. डोंगरराजीनं वेढलेलं तापोळा पावसाळ्यात ढगांची चादर लपेटतं. तापोळ्यात तुम्ही बोटिंग आणि राफ्टींगचाही आनंद घेऊ शकता.

4.भीमाशंकर

भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण तितकंच ते प्रसिद्ध आहे इथल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि अभयारण्यासाठी. हिरवळ आणि पावसाळ्यात फुटणारे अनेक झरे भीमाशंकरच्या सौंदर्यात भर टाकतात. पुण्यापासून भीमाशंकर 127 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून भीमाशंकरला जायला एसटीही आहेत.

 

         

5.माळशेज घाट

पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणांहून माळशेज घाट जवळ आहे. त्यामुळेच इथल्या धबधब्यांखाली ऐन पावसात भिजायला नेहमीच गर्दी होत असते.

6.दिवे-आगर-हरिहरेश्वर

पावसाळ्यात उधाणलेला समुद्र पहायचा असेल तर कोकणात जायलाच हवं. दिवे आगर आणि हरिहरेश्वरचे समुद्रकिनारे हे स्वच्छ, शांत, निवांत आहेत. इथे पर्यटकांची फारशी वर्दळही नसते. इथे होम स्टेची सुविधा तर उपलब्ध आहेच. शिवाय घरगुती पद्धतीनं बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशांवरही मस्त ताव मारता येतो. अर्थात पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर आपल्या हौसेला थोडी मर्यादाही घालून घ्यायला हवी. तरच प्रवासाचा आनंद सुरक्षितपणे घेता येतो.

7.कळसूबाई

महाराष्ट्रातलं हे सर्वोच्च शिखर.साहसाची हौस असेल तर ऐन पावसाळ्यात कळसूबाईचा ट्रेक करायला हरकत नाही. पण पावसाळ्यात जोरात वाहणारे वारे तुम्हाला वर चढताना चांगलाच त्रास देतात. शिवाय इथल्या शिड्या आणि वाटाही निसरड्या झालेल्या असू शकतात. त्यामुळेच जर तुम्ही कसलेले ट्रेकर असाल तरच पावसाळ्यात या ट्रेकच्या फंदात पडा.

8.ठोसेघरचा धबधबा

सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण अजूनही पुरेसं एक्सप्लोअर केलं गेलेलं नाहीये. पण ज्यांना शांत, निवांत आणि निसर्गानं ओतप्रोत भरलेल्या ठिकाणी जावंसं वाटतं त्यांच्यासाठी ठोसेघर अगदीच उत्तर पर्याय आहे. पुण्यापासून फक्त तीन तासांच्या अंतरावर ठोसघर आहे. ठोसेघरचा धबधबा पाहाणाऱ्याला वेड लावतो.

   

 

 

 

9) लोणावळा

लोणावळा हे पर्यटनस्थळ म्हणून खूपच परिचित झालेलं आहे. पण तरीही इथला टायगर पॉइंट पावसाळ्यात अवश्य पाहावा असाच आहे. निसर्गातल्या सौंदर्याची पावसाळी जादू तिथे नक्की अनुभवायला मिळते.

10. कोलाड

रिव्हर राफ्टिंगचा परवडणारा अनुभव घ्यायचा असेल तर मग कोकणातल्या कोलाडला जायलाच हवं. कुंडलिका नदी, आजूबाजूच्या जंगलामुळे पसरलेली हिरवळ यामुळे निसर्गप्रेमी पावसाळ्यात कोलाडला गेले की निसर्गसुखाच्या आनंदानं चिंब होतात. पावसाळ्यात कोलाडमध्ये घालवलेला एक दिवस तुमची पावसाळी ट्रिप नक्की सार्थकी लावते.