शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

देशाची संस्कृती जतन करून ठेवणारा ग्वाल्हेर किल्ला, जाणून घ्या कधी जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:39 IST

किल्ले आणि महालं बघण्याची पसंती असेल तर राजस्थान आणि महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशात येऊनही तुम्ही भारताची संस्कृती आणि वैभव जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्वाल्हेर किल्ल्याची भव्यताही बघू शकता. 

किल्ले आणि महालं बघण्याची पसंती असेल तर राजस्थान आणि महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशात येऊनही तुम्ही भारताची संस्कृती आणि वैभव जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्वाल्हेर किल्ल्याची भव्यताही बघू शकता. 

गोपांचल पर्वतावर असलेला ग्वाल्हेर किल्ल्या लोकप्रिय आहे. सोबतच हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. ८व्या शतकात तयार करण्यात आलेला हा किल्ला येथील संस्कृती आणि वैभवाची ओळख आहे. यावर मुघलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी राज्य केलं. हा किल्ला दोन भागांमध्ये विभागला आहे. एक आहे मान मंदिर पॅलेस आणि दुसरा आङे गुजली पॅलेस. याला आता म्युझिअमचं रूप देण्यात आलं आहे. 

(Image Credit : India Tours)

किल्ल्याची बनावट

विशाल ग्लालियर किल्ला बलुआ दगडाच्या डोंगरावर उभारला आहे आणि १०० मीटर उंचीवर आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला ग्वाल्हेर गेट आणि दुसरा उरवाई गेट. किल्ल्याच्या भींती सरळ उंच असून बाहेरील भींती २ मीटर लांब आणि रूंदी १ किमी ते २०० मीटरपर्यंत आहे. डोंगरापर्यंत जाण्यासाठी तयार रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं. 

(Image Credit : TripAdvisor)

किल्ल्याचं मुख्य द्वार हत्ती फूल नावाने ओळखलं जातं. किल्ल्याच्या स्तंभावर ड्रॅगनची कलाकृतीही आहे. तसेच किल्ल्यावर गुरू गोविंद यांच्या स्मृतीत एक गुरूद्वाराही तयार केला आहे. सोबतच जुन्या शैलीमध्ये मानसिंग महालही उभा आहे. त्यासोबतच सहस्त्रबाहू मंदिर, चतुर्भुज मंदिर, तेली मंदिर १४ आणि १४व्या शतकातील गुहा सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. तसेच जहांगीर महाल, कर्ण महाल, विक्रम महाल आणि शाहजहां महालही सुंदर आहे. या किल्ल्याचं निर्माण ८व्या शतकात राजा मान सिंग तोमर यांनी केलं होतं. 

(Image Credit : (MP) Tourism)

कधी जाल?

हेरिटेज साइट असल्याकारणाने हा किल्ला बघण्यासाठी पर्यटकांनी नेहमीच मोठी गर्दी असते. पण नोव्हेंबर ते मार्च महिना हा कालावधी किल्ला फिरण्यासाठी बेस्ट कालावधी मानला जातो. कारण यादरम्यान फार थंडीही नसते आणि फार गरमी सुद्धा नसते. त्यामुळे तुम्ही आरामात किल्ल्याची सफर करू शकता. 

कसे जाल?

शहरापासून ८ किमी अंतरावर ग्वाल्हेर एअरपोर्ट आहे. इथे तुम्हाला सहजपणे टॅक्सी आणि बसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच दिल्ली, मुंबई, अजमेर, जबलपूर, भोपाळ, वाराणसी आणि बंगळुरूसारख्या शहरातून ग्वाल्हेर शहर रेल्वेने जोडलेलं आहे. तसेच तुम्ही रस्ते मार्गेही जाऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन