शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

देशाची संस्कृती जतन करून ठेवणारा ग्वाल्हेर किल्ला, जाणून घ्या कधी जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:39 IST

किल्ले आणि महालं बघण्याची पसंती असेल तर राजस्थान आणि महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशात येऊनही तुम्ही भारताची संस्कृती आणि वैभव जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्वाल्हेर किल्ल्याची भव्यताही बघू शकता. 

किल्ले आणि महालं बघण्याची पसंती असेल तर राजस्थान आणि महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशात येऊनही तुम्ही भारताची संस्कृती आणि वैभव जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्वाल्हेर किल्ल्याची भव्यताही बघू शकता. 

गोपांचल पर्वतावर असलेला ग्वाल्हेर किल्ल्या लोकप्रिय आहे. सोबतच हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. ८व्या शतकात तयार करण्यात आलेला हा किल्ला येथील संस्कृती आणि वैभवाची ओळख आहे. यावर मुघलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी राज्य केलं. हा किल्ला दोन भागांमध्ये विभागला आहे. एक आहे मान मंदिर पॅलेस आणि दुसरा आङे गुजली पॅलेस. याला आता म्युझिअमचं रूप देण्यात आलं आहे. 

(Image Credit : India Tours)

किल्ल्याची बनावट

विशाल ग्लालियर किल्ला बलुआ दगडाच्या डोंगरावर उभारला आहे आणि १०० मीटर उंचीवर आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला ग्वाल्हेर गेट आणि दुसरा उरवाई गेट. किल्ल्याच्या भींती सरळ उंच असून बाहेरील भींती २ मीटर लांब आणि रूंदी १ किमी ते २०० मीटरपर्यंत आहे. डोंगरापर्यंत जाण्यासाठी तयार रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं. 

(Image Credit : TripAdvisor)

किल्ल्याचं मुख्य द्वार हत्ती फूल नावाने ओळखलं जातं. किल्ल्याच्या स्तंभावर ड्रॅगनची कलाकृतीही आहे. तसेच किल्ल्यावर गुरू गोविंद यांच्या स्मृतीत एक गुरूद्वाराही तयार केला आहे. सोबतच जुन्या शैलीमध्ये मानसिंग महालही उभा आहे. त्यासोबतच सहस्त्रबाहू मंदिर, चतुर्भुज मंदिर, तेली मंदिर १४ आणि १४व्या शतकातील गुहा सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. तसेच जहांगीर महाल, कर्ण महाल, विक्रम महाल आणि शाहजहां महालही सुंदर आहे. या किल्ल्याचं निर्माण ८व्या शतकात राजा मान सिंग तोमर यांनी केलं होतं. 

(Image Credit : (MP) Tourism)

कधी जाल?

हेरिटेज साइट असल्याकारणाने हा किल्ला बघण्यासाठी पर्यटकांनी नेहमीच मोठी गर्दी असते. पण नोव्हेंबर ते मार्च महिना हा कालावधी किल्ला फिरण्यासाठी बेस्ट कालावधी मानला जातो. कारण यादरम्यान फार थंडीही नसते आणि फार गरमी सुद्धा नसते. त्यामुळे तुम्ही आरामात किल्ल्याची सफर करू शकता. 

कसे जाल?

शहरापासून ८ किमी अंतरावर ग्वाल्हेर एअरपोर्ट आहे. इथे तुम्हाला सहजपणे टॅक्सी आणि बसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच दिल्ली, मुंबई, अजमेर, जबलपूर, भोपाळ, वाराणसी आणि बंगळुरूसारख्या शहरातून ग्वाल्हेर शहर रेल्वेने जोडलेलं आहे. तसेच तुम्ही रस्ते मार्गेही जाऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन