शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

प्रवासाला जाताय, की दुसरीकडे कायमचं राहायला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:24 IST

मग इतकं सामान आणि महत्त्वाच्या गोष्टी सोबत कशासाठी?

ठळक मुद्देपरदेश प्रवासाला जाता आहात, पासपोर्ट घेतला, तेवढं पुरेसं आहे की! आता आणखी आपलं बर्थ सर्टिफिकेट, तेही ओरिजिनल कशासाठी सोबत पाहिजे?तुमच्याकडे बरेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत. मग त्यातलं एखादंच सोबत घ्या.आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करीत राहा. कोणतीही संशयास्पद नोंद त्यावर आढळली तर लगेच ते कार्ड ब्लॉक करा.

- मयूर पठाडे

कुठेही जायचं म्हटलं, प्रवास करायचा म्हटलं की दोन पद्धतीचे लोक हमखास आपल्या नजरेला पडतात. काही जण अगदी काहीही तयारी न करता, इतक्या ऐनवेळी जायचं ठरवतात, की बºयाच महत्त्वाच्या गोष्टी करायच्या एकतर राहून तरी जातात नाहीतर ते विसरून तरी जातात. काही जण इतकी तयारी करतात, इतकं सामान, इतक्या गोष्टी आपल्यासोबत घेतात, की जणू काही ते तिथे कायमचं राहायला जाताहेत!या दोन्हीही गोष्टींचा अतिरेक नको. पण काही गोष्टींची काळजी मात्र घेतलीच पाहिजे. ऐनवेळी उपयोगी पडेल म्हणून अनेक जण नको असलेल्या गोष्टीही आपल्या सोबत घेतात. त्यांचं अनावश्यक ओझं तर आपल्याला होतंच, पण काही वेळा त्यातील एखादी जरी महत्त्वाची गोष्ट गहाळ झाली, चोरीला गेली तर नंतर पस्तावा करण्याची पाळी येते. कारण प्रवासात आपलं बॅगेज गहाळ होण्यापासून, ते चोरी जाण्यापर्यंत आणि काही वेळा घाईत आपणच ते कुठे तरी विसरण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवासात कोणत्याही अनावश्यक गोष्टींचं ओझं आपण टाळलंच पाहिजे.समजा तुम्ही परदेश प्रवासाला जाता आहात, पासपोर्ट घेतला, तेवढं पुरेसं आहे की! आता आणखी आपलं बर्थ सर्टिफिकेट, तेही ओरिजिनल कशासाठी सोबत पाहिजे? पण काही जण अशा चुका करतात.समजा तुमच्याकडे बरेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत. मग त्यातलं एखादंच घ्या की. सगळेच्या सगळे सोबत घेऊन काय उपयोग? पुन्हा ते सांभाळायची कटकट.समजा तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी घेतल्याच असतील सोबत, तर त्याची एक व्यवस्थित लिस्ट तयार करा.आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करीत राहा. कोणतीही संशयास्पद नोंद त्यावर आढळली तर लगेच ते कार्ड ब्लॉक करा.घरातून बाहेर पडताना आपल्या घराचीही पुरेशी सुरक्षा तुम्ही घेतली आहे का, याचीही खात्री करून घ्या.आणखी एक, पण अतिशय महत्त्वाचं..आपल्या घराच्या बाहेर, आपल्या बिल्डिंगच्या खाली आपली जी पत्रपेटी लावलेली आहे, ती भरून, ओसंडून वाहणार नाही याची अवश्य काळजी घ्या. आपली पत्रपेटी ओसंडून वाहतेय, म्हणजे आपण घरी नाहीत, हे अगदी सहजपणे समजण्याची ती पहिली ओळख आहे. त्यामुळे आपण बाहेरगावी, प्रवासाला जाणार असल्यास आपली पत्रपेटी तुंबणार नाही, याची काळजी अवश्य घ्या. शेजारच्यांनाही आपली पत्रं ताब्यात घ्यायला सांगता येईल.