शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

तारुण्याच्या रसरशीत ऊर्जेसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:32 IST

निसर्गाच्या कुशीत शिरा आणि करा ‘काया’पालट..

ठळक मुद्देएनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.रोजच्या व्यापातून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल.. निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल..

- मयूर पठाडेका येतो आपल्याला ताण? का येतो कधीकधी पच्रंड वैताग? चिडचिड होते, एखाद्यावर ओरडावंसं वाटतं, काही प्रसंगी तर त्याला बुकलून काढावंसं वाटतं..कशामुळे होतं हे सारं?..त्यातली प्राथमिक आणि आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात जर पुरेशी एनर्जी नसली, कामाच्या ओझ्यानं किंवा इतर काही गोष्टींनी आपला पेशन्स संपलेला असला, काही करण्याचा उत्साहच आपल्यात नसला तर आपली चिडचिड व्हायला लागते. टेन्शन येण्यामागे एनर्जी नसणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे.मग कशी वाढवायची ही एनर्जी? कुठून आणायचा उत्साह?बºयाचदा ही एनर्जी आणि उत्साह खाण्यापिण्यातून आणि एनर्जी ड्रिंक्समधून मिळत नाहीच. त्यासाठी त्या वातावरणातून बाहेर पडायला हवं असतं. आपल्या कामातून आपण आता ब्रेक घ्यायला हवा, काहीतरी वेगळं करायला हवं हे आपल्याला सांगणारा तो संकेतच असतो. शरीराचा, मनाचा हा संकेत आपण पाळायला हवा.त्यासाठी कामातून ब्रेक घेणं म्हणजेच काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणं.. यासारखा दुसरा रामबाण इलाज नाही. आहे त्या गोष्टी तर आपल्याला सोडता येत नाहीत, पण थोड्या काळासाठी त्यापासून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.आपली गेलेली एनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.किती गोष्टींनी आपण रोज त्रस्त असतो?.. कारणं वेगवेगळी असतील, पण हाच अनुभव आपण वेगवेगळ्या वेळी घेत असतो की नाही?.. भीती, चिंता, संताप, टेन्शन्स, प्रॉब्लेम्स, वादविवाद, कामांचे डोंगर..कोणालाच ते चुकत नाहीत.. पण एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तर बघा.. तुम्हाला काय काय मिळतं ते..निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल.. तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल, एवढंच नाही, संशोधकांनी तर सिद्धच केलंय, तुम्ही जर वारंवार निसर्गाच्या सान्निध्यात जात असाल तर तुमची कांतीही तजेलदार होईल, तुम्ही अधिक तरुण तर व्हालच, वार्धक्य तुमच्या जवळ येण्यालाही कचरेल..