शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

तारुण्याच्या रसरशीत ऊर्जेसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:32 IST

निसर्गाच्या कुशीत शिरा आणि करा ‘काया’पालट..

ठळक मुद्देएनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.रोजच्या व्यापातून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल.. निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल..

- मयूर पठाडेका येतो आपल्याला ताण? का येतो कधीकधी पच्रंड वैताग? चिडचिड होते, एखाद्यावर ओरडावंसं वाटतं, काही प्रसंगी तर त्याला बुकलून काढावंसं वाटतं..कशामुळे होतं हे सारं?..त्यातली प्राथमिक आणि आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात जर पुरेशी एनर्जी नसली, कामाच्या ओझ्यानं किंवा इतर काही गोष्टींनी आपला पेशन्स संपलेला असला, काही करण्याचा उत्साहच आपल्यात नसला तर आपली चिडचिड व्हायला लागते. टेन्शन येण्यामागे एनर्जी नसणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे.मग कशी वाढवायची ही एनर्जी? कुठून आणायचा उत्साह?बºयाचदा ही एनर्जी आणि उत्साह खाण्यापिण्यातून आणि एनर्जी ड्रिंक्समधून मिळत नाहीच. त्यासाठी त्या वातावरणातून बाहेर पडायला हवं असतं. आपल्या कामातून आपण आता ब्रेक घ्यायला हवा, काहीतरी वेगळं करायला हवं हे आपल्याला सांगणारा तो संकेतच असतो. शरीराचा, मनाचा हा संकेत आपण पाळायला हवा.त्यासाठी कामातून ब्रेक घेणं म्हणजेच काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणं.. यासारखा दुसरा रामबाण इलाज नाही. आहे त्या गोष्टी तर आपल्याला सोडता येत नाहीत, पण थोड्या काळासाठी त्यापासून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.आपली गेलेली एनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.किती गोष्टींनी आपण रोज त्रस्त असतो?.. कारणं वेगवेगळी असतील, पण हाच अनुभव आपण वेगवेगळ्या वेळी घेत असतो की नाही?.. भीती, चिंता, संताप, टेन्शन्स, प्रॉब्लेम्स, वादविवाद, कामांचे डोंगर..कोणालाच ते चुकत नाहीत.. पण एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तर बघा.. तुम्हाला काय काय मिळतं ते..निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल.. तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल, एवढंच नाही, संशोधकांनी तर सिद्धच केलंय, तुम्ही जर वारंवार निसर्गाच्या सान्निध्यात जात असाल तर तुमची कांतीही तजेलदार होईल, तुम्ही अधिक तरुण तर व्हालच, वार्धक्य तुमच्या जवळ येण्यालाही कचरेल..