शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली परिवहनच्या बसमध्ये धुळधाण : प्रवासी हैराण

By अनिकेत घमंडी | Updated: February 6, 2018 16:25 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडुंब गर्दीमुळे आधीच पिचलेल्या प्रवाशांना पर्याय नसल्याने ते केडीएमटीच्या बसने प्रवास करत आहेत. आधीच केडीएमटी उत्पन्नामध्ये तोट्यात असतांना आता कमालीच्या अस्वच्छतेमुळे प्रवासी या सुविधेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे स्वच्छतेच्या सर्व्हेक्षणाची एैशीतैशी परिवहनच उत्पन्न घटले

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडुंब गर्दीमुळे आधीच पिचलेल्या प्रवाशांना पर्याय नसल्याने ते केडीएमटीच्या बसने प्रवास करत आहेत. आधीच केडीएमटी उत्पन्नामध्ये तोट्यात असतांना आता कमालीच्या अस्वच्छतेमुळे प्रवासी या सुविधेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.परिवहनच्या माध्यमातून प्रवास करतांना अनेकदा बे्रक जाम होणे, आईल- डिझेल, टायरची समस्या असणे यासह असंख्य समस्यांना प्रवााशांना सामोरे जावे लागते. असुविधांचे माहेरघर अशी परिवहन विभागाची ख्याती असतांना ती सुधारण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये ही सुविधा असून नसल्यासारखी आहे. प्रचंड अस्वच्छता, घाण यामुळे प्रवास करायचा तरी कसा असा सवाल नित्याचे प्रवासी भुपेंद्र चौधरी यांनी केला. भुपेंद्र हे परिवहनच्या सेवेने डोंबिवली ते वाशी-सानपाडा असा प्रवास करतात. गेले अनेक महिने ते अस्वच्छतेमुळे हैराण असून त्यांना धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचा त्रास झाला. ‘लोकमत’ने आढावा घेतला असता केवळ त्याच मार्गावर नव्हे तर निवासी विभाग, लोढा, मलंग, कल्याण शहरातील अनेक मार्गावर अशीच धुळीने माखलेल्या बसेस धावत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. आधीच या महापालिकेचा बकाल शहरांमध्ये अव्वल क्रमांक आलेला असून आता महापालिकेची परिवहन सुविधेतील बकालीमुळे अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.ते उत्पन्न गेले तरी कुठे?'' परिवहनचे माजी सभापती शिवसेनेचे दिंडोरी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरींनी परिवहनच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता ते जेव्हा सभापती होते तेव्हा प्रतीदिन ६.५ ते ७ लाखांची उलाढालीपर्यंत लक्ष्य गाठले होते, पण सुमारे आठ महिन्यांपासून जेमतेम ५ ते ५.५ लाखांची उलाढाल होत असल्याची माहिती चौधरींना मिळाली. त्यामुळे प्रतीदिन दीड-दोन लाखांची तूट परिवहनला भरुन तरी कशी काढणार? त्यामुळे प्रवाशांना सुखद-सुरक्षित आणि संरक्षित तसेच स्वच्छ प्रवास मिळत नसेल तर ते या सुविधेकडे पाठ फिरवणारच अशी नाराजीची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त झाली. हे उत्पन्न नेमके गेले कुठे यासंदर्भात सत्ताधा-यांसह विरोधी पक्ष आळीमिळी गुपचिळीचे धोरण स्विकारत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.'''' मिडि बसमुळे प्रवासी संख्या घटली, त्याचा परिणाम निश्चितच उलाढालीवर झाला. पण तरी आता नव्या १५ बस लवकरच सेवेत दाखल करत आहोत. अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून आगामी तीन दिवसात त्यासंदर्भात वॉशिंग मशिनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वच्छ प्रवास मिळेल - संजय पावशे, परिवहन सभापती.'''' उत्पन्न खरे किती आहे ते दाखवा यावर किती वेळा भाष्य करायचे? जिथे शिवसेनेची सत्ता आहे तिथल्या सार्वजनिक सुविधांची बोंबच असल्याचे दिसून आले आहे. त्यापेक्षा इथली परिवहन सेवा बरखास्त करा आणि नवी मुंबई, ठाण्याच्या ताब्यात द्या. पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे - राजेश कदम, माजी परिवहन सभापती, मनसे''

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरे