शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

भारत आणि श्रीलंका सीमेवरील 'या' ठिकाणी रात्री जाण्यास घाबरतात लोक, इथेच आहे रामसेतु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:02 IST

तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो.

तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो. एकेकाळी इथे लोकांची मोठी वस्ती होती. पण आता हे ठिकाण पूर्णपणे रिकामं झालं आहे.

धनुषकोडी येथे दिवसा खूप लोक भेट देतात. पण रात्र होताच लोक येथून निघून जातात. कारण इथे अंधारात फिरण्यावर बंदी आहे. लोक सांयकाळ होताच रामेश्वरमला परत जातात. कारण धनुषकोडीपासून रामेश्वरमचं अंतर १५ किलोमीटरचं आहे. आणि हा रस्ता फारच शांत आणि भीतीदायक आहे. अनेक लोक या ठिकाणाला भूताचं ठिकाण असंही म्हणतात.

(Image Credit : Social Media)

१९६४ मध्ये आलेल्या भयावह चक्रीवादळाआधी धनुषकोडी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तीर्थ स्थळ होतं. त्यावेळी इथे रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, चर्च, हॉटेल आणि पोस्ट ऑफिस अशा सगळ्याच सुविधा होत्या. मात्र, चक्रीवादळात सगळंच नष्ट झालं. असे म्हणतात की, त्यावेळी १०० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणारी रेल्वे समुद्रात बुडाली होती. त्यानंतर या ठिकाणी कुणी आलंच नाही.

(Image Credit : Social Media)

पौराणिक मान्यतांनुसार, धुनषकोडी हे तेच ठिकाण आहे, जिथे समुद्रावर रामसेतुचं निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हणतात की, या ठिकाणी भगवान रामाने हनुमानाला एका पुलाचं निर्माण करण्याचा आदेश दिला होता. ज्यावरून वानर सेना लंकेत गेली होती. या ठिकाणी भगवान रामाचं एक मंदिरही आहे.

(Image Credit : Social Media)

असे म्हणतात की, रावणाचा भाऊ विभीषण याच्या विनंतीवरून भगवान रामाने धनुष्याच्या एका टोकाने सेतु तोडला होता. त्यामुळेच या ठिकाणाचं नाव धनुषकोडी पडलं आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन