शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

भारत आणि श्रीलंका सीमेवरील 'या' ठिकाणी रात्री जाण्यास घाबरतात लोक, इथेच आहे रामसेतु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:02 IST

तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो.

तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो. एकेकाळी इथे लोकांची मोठी वस्ती होती. पण आता हे ठिकाण पूर्णपणे रिकामं झालं आहे.

धनुषकोडी येथे दिवसा खूप लोक भेट देतात. पण रात्र होताच लोक येथून निघून जातात. कारण इथे अंधारात फिरण्यावर बंदी आहे. लोक सांयकाळ होताच रामेश्वरमला परत जातात. कारण धनुषकोडीपासून रामेश्वरमचं अंतर १५ किलोमीटरचं आहे. आणि हा रस्ता फारच शांत आणि भीतीदायक आहे. अनेक लोक या ठिकाणाला भूताचं ठिकाण असंही म्हणतात.

(Image Credit : Social Media)

१९६४ मध्ये आलेल्या भयावह चक्रीवादळाआधी धनुषकोडी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तीर्थ स्थळ होतं. त्यावेळी इथे रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, चर्च, हॉटेल आणि पोस्ट ऑफिस अशा सगळ्याच सुविधा होत्या. मात्र, चक्रीवादळात सगळंच नष्ट झालं. असे म्हणतात की, त्यावेळी १०० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणारी रेल्वे समुद्रात बुडाली होती. त्यानंतर या ठिकाणी कुणी आलंच नाही.

(Image Credit : Social Media)

पौराणिक मान्यतांनुसार, धुनषकोडी हे तेच ठिकाण आहे, जिथे समुद्रावर रामसेतुचं निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हणतात की, या ठिकाणी भगवान रामाने हनुमानाला एका पुलाचं निर्माण करण्याचा आदेश दिला होता. ज्यावरून वानर सेना लंकेत गेली होती. या ठिकाणी भगवान रामाचं एक मंदिरही आहे.

(Image Credit : Social Media)

असे म्हणतात की, रावणाचा भाऊ विभीषण याच्या विनंतीवरून भगवान रामाने धनुष्याच्या एका टोकाने सेतु तोडला होता. त्यामुळेच या ठिकाणाचं नाव धनुषकोडी पडलं आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन