शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जि.प. निवडणुकीबाबत आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:03 IST

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणरचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यातील गट आणि गणरचना ही पूर्णपणे सदोष पद्धतीने केली आहे.

आसनगाव : जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणरचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यातील गट आणि गणरचना ही पूर्णपणे सदोष पद्धतीने केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता केवळ लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून ही गट आणि गणरचना केल्याची तक्रार आगरी क्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.गट आणि गणरचना करताना भौगोलिकदृष्ट्या सलगता असली पाहिजे, या तत्त्वाची कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नसून दळणवळणाच्या सोयीसुविधा लक्षात घेतलेल्या नाहीत. अनेक ग्रुपग्रामपंचायती या वेगवेगळ्या गणांत विभागल्या गेल्या आहेत. तसेच वासिंद, कसारा यासारख्या ग्रामपंचायतीचे भविष्यात नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे. या ठिकाणच्या गट तसेच गणांची रचना करताना इतर गावांचा समावेश करणे चुकीचे आहे. नव्याने करण्यात आलेल्या गट आणि गणरचनेमध्ये शहापूर नगरपंचायत वगळून गट आणि गण कायम ठेवणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता, भौगोलिक सलगता हा निकष न लावता, केवळ शहापूर तालुक्याचा नकाशा समोर ठेवून ही रचना केल्याचा आरोप त्यांनी निवेदनामध्ये केला आहे.शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गणरचनेत राजकीय हस्तक्षेप झाला असून भौगोलिक सलगता आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीसुविधा लक्षात न घेता ही रचना केली असून याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे हरकत घेतली असून विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्याकडे सुनावणी होणार आहे तसेच याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील तक्र ार केली आहे. यामध्ये समाधानकारक निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहे.- शिवाजी अधिकारी (अध्यक्ष, आगरी क्र ांती सामाजिक संघटना)