शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

सीईओंविरोधात जिल्हा परिषदेचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 03:15 IST

पाणीपुरवठा अभियंत्यास टंचाई काळात अमेरिका दौरा करण्यास परवानगी का दिली, असा सवाल विचारणा-या जि.प. अध्यक्षांना अधिकाराची जाणीव करून देणारे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्याविरोधात सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बुधवारी सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव घेतल्याचे ठाणे जि.प च्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी सांगितले.

ठाणे : जिल्हाभरात मनमानी करणाऱ्या पाणीपुरवठा अभियंत्यास टंचाई काळात अमेरिका दौरा करण्यास परवानगी का दिली, असा सवाल विचारणा-या जि.प. अध्यक्षांना अधिकाराची जाणीव करून देणारे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्याविरोधात सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बुधवारी सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव घेतल्याचे ठाणे जि.प च्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी सांगितले.पाणीटंचाईच्या काळातील ५६ लाखांची बिले न मिळाल्यामुळे टँकरने होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. शिवाय अभियंता राऊत अमेरिका दौºयावर गेले. टंचाईच्या काळात गेल्याबाबत त्यांना जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विचारणा केल्यावर तो माझा अधिकार असल्याचे सीईओ यांनी सांगितले. या विषयी सर्वसाधारण सभेत सदस्यांनी सभागृहात एकच गोंधळ करून ठराव घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. आता राऊत यांना अमेरिकेला जाण्यासाठी रजा दिली आहे. सीईओ त्यांना का पाठीशी घालत असल्याची विचारणा सदस्यांकडून होत आहे. राऊत विरोधातील तक्र ारी सीईओ ऐकून घेत नाहीत, त्यामुळे सदस्यांनी ठराव घेऊन राग व्यक्त केला आहे, असे जाधव यांनी सांगितले .प्रशासनाकडून सदस्यांची कामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे त्रस्त सदस्यांनी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा अभियंत्यास अमेरिका दौºयावरून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अभियंत्याच्या थेट अमेरिका वारीवर सत्ताधाºयांनी संशय व्यक्त केला. त्याचे स्थायी समिती बैठकीत शुक्र वारी पडसाद उमटले. हा अधिकारी अमेरिकेत कसा गेला, त्याचा पासपोर्ट व बँकेचे पासबुक मागवा, अशी मागणी अध्यक्षा जाधव यांनी केली. मात्र, कर्मचाºयांच्या वैयक्तिक दौºयाची माहिती मागण्याचा अध्यक्षांना अधिकार नसल्याचे स्पष्ट करन भीमनवार यांनी विरोध केला. त्या सभेतही अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खडाजंगी झाली. प्रशासनातील अधिकारी सुचनांची अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप अध्यक्ष जाधव यांनी केल्यावर खळबळ उडाली. अध्यक्षांच्या आरोपाला अन्य सभापतींनीही अनुमोदन दिले. सांगितलेली कामे अधिकारी टाळत असल्याचा आरोप सभागृहात सभापतींनी केल्यामुळे सदस्यांनाही धक्का बसला.>प्रशासनावर हवे नियंत्रणसत्ताधाºयांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना ढिसाळ कारभाराचा त्रास सोसावा लागत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.जि.प.च्या कारभाराचा खेळखंडोबा असल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी केली.