शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाला शून्य प्रतिसाद, कचराकोंडीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:20 IST

ठाणे शहरात तीन ठिकाणी प्रत्येकी १०० मेट्रिक टन कचऱ्यावर ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना निविदाकारांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला असल्यामुळे या निविदेस मुदतवाढ देण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे.

- नारायण जाधवठाणे : ठाणे शहरात तीन ठिकाणी प्रत्येकी १०० मेट्रिक टन कचऱ्यावर ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना निविदाकारांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला असल्यामुळे या निविदेस मुदतवाढ देण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे.दैनंदिन कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली नाही, तर अनुदान बंद करण्यात येईल, असा इशारा नगरविकास विभागाने राज्यातील ३८४ स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. त्यानंतर, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचरा विल्हेवाटीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे महापालिकेने प्रयत्न करूनही शहरातील मोठ्या सोसायट्या आणि हॉटेलसह मॉलने त्यांच्या कचºयावर प्रक्रिया करण्यास फारसा प्रतिसाद दिलेला नाही. हे कमी म्हणून की काय, आता याअंतर्गत महापालिकेने तीन ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने १०० मेट्रिक टन क्षमतेच्या कचºयावर प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. इच्छुक संस्थांना जागाही महापालिकाच देणार आहे. १५ वर्षांच्या मुदतीकरिता परिचालन, देखभाल, दुरुस्ती या अटींवर हे प्रकल्प महापालिका चालवण्यास देणार आहे. मात्र, यासाठीच्या निविदांना एकाही संस्थेने प्रतिसाद दिलेला नाही, यामुळे आता फेरनिविदा मागवण्याचा व योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे शहरात घनकचºयाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनत चालला आहे. महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद करणे बंधनकारक आहे. रहिवाशांकडूनही कचरा प्रक्रियेला सहकार्य केले जात नाही. आता तर महापालिकेच्या प्रक्रिया योजनेला कंपन्यांचा प्रतिसाद नाही. यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.ठाणे महापालिकेनेही ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ पाच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे किंवा रोज १००० किलोहून कचरा निर्माण करणाºया सोसायट्या, मॉलचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सोसायट्यांकडून यास तीव्र विरोध झाल्याने अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून महापालिकांशी चर्चा केली आणि या निर्णयास एक महिन्याची मुदतवाढ दिली. ती आता संपली आहे. यामुळे महापालिका कचरा संकलन, विघटनाची कार्यवाही अधिक तीव्र करण्याच्या विचारात आहे.काय आहे प्लाझ्मा तंत्रज्ञान?प्लाझ्मा तंत्रज्ञानांतर्गत शहरात जमा होणाºया सर्व प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण न करता तो एक मशीन टाकून अतिउच्च तापमानात जाळला जातो. यामुळे निर्माण होणाºया राखसदृश पदार्थापासून विटा किंवा तत्सम वस्तू तयार करून त्यांचा वापर करता येऊ शकतो.प्रतिसाद न मिळण्याची कारणे कोणती?प्लाझ्मा तंत्रज्ञानांतर्गत कचरा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यामुळे प्रकल्प राबवणाºयांचा खर्च वाढतो. तसेच सर्वात गंभीर बाब म्हणजे यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे कचरा जाळून तो नष्ट करण्याचे हे तंत्रज्ञान म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे आहे. त्याला देशात कुठेही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक ठिकाणी त्याचे केवळ प्रयोग सुरू आहेत.

टॅग्स :thaneठाणे