शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

अशेरी गडाची केली युवकांनी सफाई

By admin | Updated: November 16, 2016 04:07 IST

तालुक्यातील शिवतेज ग्रुप आणि विक्र ांत युवा मित्र मंडळ ओंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील एैतिहासिक अशा आशेरी

संजय नेवे/ विक्रमगडतालुक्यातील शिवतेज ग्रुप आणि विक्र ांत युवा मित्र मंडळ ओंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील एैतिहासिक अशा आशेरी गडावर चढाई करून तेथील अशेरीदेवीच्या मंदिर परीसराची सफाई केली. तसेच किल्ल्याच्या अवतीभावती पडलेला कचरा-प्लास्टिक गोळा करून तो नष्ट केला. तसेच पुरातन अशा दोन तलावां भोवती वाढलेले गवत काढून टाकले. किल्ल्यावर मद्यपान करून ज्या बाटल्या अवास्तव टाकल्या होत्या त्याही गोळा केल्या. तसेच किल्ल्यावर असलेल्या तीन पंचधातूच्या तोफा या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्या नीट रचून किल्ले संवर्धनाचा संदेश दिला. आता येथे येणाऱ्या पर्यटकांनी ही स्वच्छता कायम राखावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. किल्ल्याची दुरावस्था : मात्र या एैतिहासिक किल्ल्याची दुरावस्था झाली असून त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या किल्ल्याचे बुरु ज-भिंती पूर्णपणे कोसळल्या आहेत. या किल्ल्यावर आजही अखंड दगडामध्ये कोरलेली ४ ते ६ पाण्याची कुंडे असून किल्ल्याच्या मध्यभागी मोठी दोन तळी व कोरलेल्या पायऱ्या, कोरीव काम आजही अस्तित्वात आहे. गडाचे कोरीव प्रवेशद्वार भग्न अवस्थेत असूनही आजही येणाऱ्या शिवप्रेमींचे स्वागत करीत आहे. अशेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून येथे आजही 3 पंचधातुच्या तोफा असून त्या इतरत्र पडलेल्या आहेत. कधीही त्या चोरून नेण्याचा धोका आहे. तसेच किल्ल्याची पूर्णपणे पडझड झाली आहे. या तोफांच्या तसेच किल्ल्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तसेच पुरातन विभागाने याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच प्रमाणे दुर्लक्षित अशा दोन किल्ल्याची आम्ही दरवर्षी साफसफाई करुन शासनाने याकडे लक्ष देण्यासाठी निवेदने देऊन पाठपुरावा करणार आहोत. -अमोल सांबरे, सदस्य-शिवतेज ग्रुपभोज राजाच्या कारकीर्दीत बांधलेल्या या किल्ल्याची खूपच दयनिय अवस्था झाली आहे. तसेच पुरातन भिंती, बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहेत. पुरातन विभागाने तसेच शासनाने या किल्ल्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.- अतुल पाटील, शिवप्रेमी, शिव इतिहास अभ्यासक