शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ठाणे जिल्ह्यात तरुणाईला लसीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असे असले तरी दुसरीकडे अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरणाची चिंता वाढत आहे. त्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षीय वयोगटातील तरुणाईसह नागरिकांची लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर १५ दिवसांत ४० हजार ७१० जणांचे लसीकरण झाले होते. मात्र, अपुऱ्या लसींचा फटका या वयोगटातील लाभार्थ्यांना बसला असून त्यांचे लसीकरण थांबविण्याची वेळ आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील कमालीची वाढ झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यात यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले. अवघ्या १५ ते २० दिवसात सुरुवातीच्या काळातील नव्याने आढळणाऱ्या व मृतांच्या संख्येचा नवा उच्चांक गाठला. मृत्यूंच्या संख्येत दररोज होणारी वाढही आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी ठरत आहे. अशातच नागरिकांचे झपाट्याने लसीकरण होणे, तितकेच गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे अनेकदा लसीकरण थांबविण्याची वेळ ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य विभागावर आली. त्यामुळे लसीकरणाबाबतदेखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जानेवारी महिन्यात फ्रंट लाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स यांची लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरणास प्रारंभ केला. ही लसीकरण मोहीम राबविताना लसींच्या अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्येत दररोज होणारी चढ-उतार लक्षात घेता लसीकरण संथगतीने होत असल्याचे दिसून येत होते. अशातच शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीमदेखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अवघ्या ४० हजार ७१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, नंतर लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे ती राबवायची कशी, असा प्रश्न आरोग्य यंत्रणांपुढे उभा ठाकला आहे.