शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

ठाणे जिल्ह्यात तरुणाईला लसीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असे असले तरी दुसरीकडे अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरणाची चिंता वाढत आहे. त्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षीय वयोगटातील तरुणाईसह नागरिकांची लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर १५ दिवसांत ४० हजार ७१० जणांचे लसीकरण झाले होते. मात्र, अपुऱ्या लसींचा फटका या वयोगटातील लाभार्थ्यांना बसला असून त्यांचे लसीकरण थांबविण्याची वेळ आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील कमालीची वाढ झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यात यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले. अवघ्या १५ ते २० दिवसात सुरुवातीच्या काळातील नव्याने आढळणाऱ्या व मृतांच्या संख्येचा नवा उच्चांक गाठला. मृत्यूंच्या संख्येत दररोज होणारी वाढही आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी ठरत आहे. अशातच नागरिकांचे झपाट्याने लसीकरण होणे, तितकेच गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे अनेकदा लसीकरण थांबविण्याची वेळ ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य विभागावर आली. त्यामुळे लसीकरणाबाबतदेखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जानेवारी महिन्यात फ्रंट लाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स यांची लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरणास प्रारंभ केला. ही लसीकरण मोहीम राबविताना लसींच्या अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्येत दररोज होणारी चढ-उतार लक्षात घेता लसीकरण संथगतीने होत असल्याचे दिसून येत होते. अशातच शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीमदेखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अवघ्या ४० हजार ७१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, नंतर लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे ती राबवायची कशी, असा प्रश्न आरोग्य यंत्रणांपुढे उभा ठाकला आहे.