शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

देशरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे - अनुराधा गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:19 IST

वाचन मंदिर संस्थेच्या १५७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरे यांच्या व्याख्यानाचे टिळक मंदिर सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले

भिवंडी : सैन्यदलात जवळपास दोन लाख जागा रिक्त आहेत. भारतासारख्या देशाला ही बाब भूषणावह नाही, तरु णवर्ग सैन्यात भरती व्हायला तयार नाही, त्याला पालकही तेवढेच जबाबदार आहेत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो, आम्हाला सुरक्षितता हवी असते; पण देशाच्या सुरक्षिततेचा विचार आम्ही कधी करायचा? यासाठी तरु ण पिढीचे योगदान काय, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.

वाचन मंदिर संस्थेच्या १५७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरे यांच्या व्याख्यानाचे टिळक मंदिर सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘भारतीय जवानांच्या शौर्यकथा’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे होते.गोरे म्हणाल्या की, १९४७ साली देश स्वतंत्र झाला. मात्र, ते समाधान फार काळ टिकले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवनवीन युद्धमालिका सुरू झाल्या. या युद्धांमध्ये लढताना भारतीय जवानांनी जे सोसले आहे ते फारच भयंकर आहे. प्रत्येक जवानांची एकेक खडतर जीवनाची कथा म्हणजेच भारतीय जवानांची शौर्यगाथा आहे. या वेळी गोरे यांनी गिलिगट, स्क्रूडचा किल्ला युद्ध, कारगिल युद्ध, सिकोनची कथा, झोजीला खिंडीत झालेले युद्ध, डोमेल लष्करी ठाणे अशा युद्धांत भारतीय जवान ब्रिगेडियर राजिंदर सिंग, मेजर जनरल थीमय्या , मे.जे.कुलवंत सिंग, मेजर थापा, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला, सॅम माणेकशॉ यांच्या कथा सांगितल्या, तर मेजर सौरभ कालिया यांना हाल करून कसे मारण्यात आले, ब्रिगेडियर जिगेंद्रसिंग, योगीन्द्रसिंग, मेजर परमेश्वरन यांच्या साहसी कथा सांगून, भारतीय सैनिकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले स्वातंत्र्य जपले आहे.