शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

देशरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे - अनुराधा गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:19 IST

वाचन मंदिर संस्थेच्या १५७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरे यांच्या व्याख्यानाचे टिळक मंदिर सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले

भिवंडी : सैन्यदलात जवळपास दोन लाख जागा रिक्त आहेत. भारतासारख्या देशाला ही बाब भूषणावह नाही, तरु णवर्ग सैन्यात भरती व्हायला तयार नाही, त्याला पालकही तेवढेच जबाबदार आहेत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो, आम्हाला सुरक्षितता हवी असते; पण देशाच्या सुरक्षिततेचा विचार आम्ही कधी करायचा? यासाठी तरु ण पिढीचे योगदान काय, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.

वाचन मंदिर संस्थेच्या १५७ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरे यांच्या व्याख्यानाचे टिळक मंदिर सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘भारतीय जवानांच्या शौर्यकथा’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे होते.गोरे म्हणाल्या की, १९४७ साली देश स्वतंत्र झाला. मात्र, ते समाधान फार काळ टिकले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवनवीन युद्धमालिका सुरू झाल्या. या युद्धांमध्ये लढताना भारतीय जवानांनी जे सोसले आहे ते फारच भयंकर आहे. प्रत्येक जवानांची एकेक खडतर जीवनाची कथा म्हणजेच भारतीय जवानांची शौर्यगाथा आहे. या वेळी गोरे यांनी गिलिगट, स्क्रूडचा किल्ला युद्ध, कारगिल युद्ध, सिकोनची कथा, झोजीला खिंडीत झालेले युद्ध, डोमेल लष्करी ठाणे अशा युद्धांत भारतीय जवान ब्रिगेडियर राजिंदर सिंग, मेजर जनरल थीमय्या , मे.जे.कुलवंत सिंग, मेजर थापा, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला, सॅम माणेकशॉ यांच्या कथा सांगितल्या, तर मेजर सौरभ कालिया यांना हाल करून कसे मारण्यात आले, ब्रिगेडियर जिगेंद्रसिंग, योगीन्द्रसिंग, मेजर परमेश्वरन यांच्या साहसी कथा सांगून, भारतीय सैनिकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले स्वातंत्र्य जपले आहे.