शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील तरण तलावातील तुटलेल्या टाईल्समुळे युवक जखमी

By अनिकेत घमंडी | Updated: June 17, 2024 20:12 IST

एकप्रकारे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

डोंबिवली: महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका ​डोंबिवलीतील युवा तरणपटुना बसला. येथील संत सावळाराम महाराज क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तन्मय कांबळे या (१३)वर्षीय युवकाच्या हाताला तरण तलावातील तुटलेल्या टाईल्समुळे दुखापत झाल्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी घडला.

मात्र त्या ठिकाणी प्रथमेाचार बॉक्समधील औषधे चालू स्थितीत नसल्याचे डयुटीवर असलेल्या पालिकेच्या कर्मचा-यांच्या निदर्शनास आणूनही त्यांनी दखल घेतली नाही. प्रथमोपचार न मिळाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त करीत पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारीत धारेवर धरले. डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारे तन्मय कांबळे आणि शार्दूल हंकारे हे दोघे युवक ​रविवारी सांयकाळच्या बॅचमध्ये डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेले होते.

तरण तलावात पोहोत असतानाच तरण तलावातील तुटलेल्या टाईल्सचा एक भाग तन्मयच्या डाव्या हाताला लागू तो चिरला गेला. हाताला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच  दोघांनीही तरण तलावातून बाहेर येत तेथील डयुटीवर असलेले कर्मचारी आणि इतर कर्मचा-यांच्या निदर्शनास आणल्याचे सांगण्यात आले. मात्र कर्मचा-यांनी तत्परतेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप तन्मयने केला. तेथील फर्स्ट एड बॉक्समध्ये पुरेसे औषधे नसल्याचा आरोप युवकांनी केला. त्यामुळे त्या ठिकाणी प्राथमिक कोणतेही उपचार न झाल्याने ते  दोघेही रिक्षाने आपल्या गोग्रासवाडी येथील घरी आले, रविवार असल्याने डॉक्टर उपलब्ध नव्हते.

सदर प्रकार तन्मयने पालकांना सांगितल्यानंतर, त्याच्या पालकांनी तरण तलाव येथे धाव घेऊन पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारला. पालिकेच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला. जखमी झालेल्या तन्मयावर महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार करण्यात आले.  पालिकेच्या तरण तलावात वारंवार तरूणांना अशा दुखापतींना तरूणांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे एकप्रकारे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार केाण ? असा संतप्त सवाल पालकांनी केला.  तलावाची डागडुज्जी करण्याची पालिकेची जबाबदारी आहे. तरूणांना दुखापत झाली तर त्यावर उपचार करण्याची तेथील कर्मचा-यांची जबाबदारी आहे. मात्र पालिकेच्या कर्मचा-यांचे कोणतेही लक्ष नसते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.  

टॅग्स :dombivaliडोंबिवली