शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वारसा जपण्यासाठी तरूणांचा हेरिटेज वॉक; शिवगर्जना प्रतिष्ठानचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:33 IST

मंदिरे, किल्ले, तोफा यांच्या इतिहासाची दिली जाते माहिती

- स्नेहा पावसकर ठाणे : शहराला व येथील अनेक वास्तूंना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यातील अनेक वास्तूंची कालौघात पडझड झाली असली तरी त्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि ही माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आता ठाण्यातील तरूणाईने पुढाकार घेतला आहे. शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे महिन्यातून एकदा ठाणे हेरिटेज वॉक असतो, त्यातून ठाण्यातील प्राचीन इतिहास असलेल्या वास्तूंची अभ्यासपूर्ण माहिती ठाणेकरांनी दिली जाते.ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून प्रसिद्धआहे. शिलाहार घराण्याची राजधानी म्हणूनही ठाणे शहर ज्ञात आहे. शिलाहारांच्या राजवटीपासून ते अगदी मराठा राजवटीपर्यंतचे वैभव प्राप्त झालेल्या ठाणे शहरात मंदिरे, किल्ले, तोफा, काही ब्रिटिशकालीन कार्यालये अशा विविध पुरातन वास्तू आहेत. या सर्व वास्तूंची माहिती अनेक पुस्तकातून, कार्यक्रमातून आपण ऐकली असेल. पण ही माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्या वास्तूंची सद्यस्थिती स्वत: पाहावी यासाठी ठाण्याच्या शिवगर्जना प्रतिष्ठानच्या तरूण वर्गाने ‘हेरिटेज वॉक’ नामक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी होणाऱ्यांसोबत महिन्यातून एखाद्या रविवारी दोन तास ठरलेल्या ठिकाणी फिरवून दोन ते तीन वास्तूंचा सखोल इतिहास सांगितला जातो. तसेच त्या वास्तूंचे जतन करण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील यावर चर्चा केली जाते. आतापर्यंत प्रतिष्ठानच्यावतीने चार हेरिटेज वॉक झालेले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आयोजकांना विशेषत: युवकांचा प्रतिसाद अपेक्षित आहे. नवीन वर्षातला पहिला हेरिटेज वॉक हा रविवारी होणार आहे.नाशिक, पुणे या शहरात अशाप्रकारचे हेरिटेज वॉक आयोजित केले जातात आणि त्याला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ठाण्यातही यापूर्वी इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी अशाच प्रकारचा उपक्रम राबवला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता आम्ही तरूणांनी पुन्हा नव्याने ठाण्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.- प्रणय शेलार,अध्यक्ष, शिवगर्जना प्रतिष्ठान