शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तुम्ही खड्ड्यांतूनच करा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:55 IST

एमएमआरडीएची इच्छा : लोकनगरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वाहनचालक झाले त्रस्त

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील पाच रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी या रस्त्याचे हस्तांतरण एमएमआरडीएकडे करण्यात आले आहे. मात्र, काम सुरू करणे तर दूरच, ते रस्ते वाहतुकीसाठी योग्य करण्यासाठीही एमएमआरडीए पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने हा रस्ता हस्तांतरित केल्याचे कारण पुढे करून रस्तादुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीए रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गंभीर नसल्याने वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी या रस्त्याची दुरुस्ती रखडलेली आहे.

सरकारच्या दोन विभागांतील समन्वयाचा अभाव असल्यावर काय परिस्थिती निर्माण होते, याची प्रचीती लोकनगरी रस्त्यावर अनुभवता येत आहे. वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी ग्राउंडपर्यंतचा रस्ता हा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून आनंदनगर औद्योगिक वसाहतीत शेकडो कामगार वाहने घेऊन जात असतात. त्यामुळे नागरिकांसह कामगारांनाही खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनगरी रस्त्यामुळे संपूर्ण पूर्व भाग जोडला गेला आहे. त्यामुळे हा रस्ता सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण हे एप्रिल महिन्यातच मंजूर झाले आहे. मात्र, अजूनही एमएमआरडीएने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदाराकडून आहे तो रस्ता किमान दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र, चार महिन्यांत एकदाही एमएमआरडीएने या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पालिकेचा असला, तरी कामासाठी एमएमआरडीएकडे असल्याने पालिकाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. नागरिकांनाही याच खराब रस्त्यातून मार्ग काढत जावे लागत आहे.

अंबरनाथ नगरपालिकेने तीन वर्षे देखभाल दुरुस्तीच्या नावाने हा रस्ता कंत्राटदाराला काम करण्यासाठी दिला होता. मात्र, या रस्त्याला पाच वर्षे झाली असून त्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात येत आहे. तीन वर्षे देखभाल दुरुस्ती केल्यावर कंत्राटदाराची जबाबदारी संपलेली असतानाही पालिका प्रशासन नव्या प्रस्तावाला मंजुरी देत नव्हते. त्यातच, एमएमआरडीएकडे हा रस्ता गेल्यावर पालिकेने संपूर्ण अंग काढून घेतल्याने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होईल, याची शक्यता नाही.नेमकी तक्रार कुणाकडे करावीएमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कंत्राटदारामार्फत या रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता किमान वाहतुकीसाठी योग्य करणे गरजेचे होते. मात्र, ते कामही केले जात नसल्याने नेमकी तक्रार करावी कुणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधित यंत्रणांनी त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाthaneठाणेbhiwandiभिवंडी