शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

बाऊन्सर नेमण्याचे आश्वासन हवेतच?

By admin | Updated: July 8, 2017 05:24 IST

शहरातील फेरीवाल्यांविरोधात वारंवार उपोषण, आंदोलने करून तसेच गुन्हे नोंदवूनही त्यांची समस्य कायम आहे. त्यांच्या मुजोरीची पाळमुळे

अनिकेत घमंडी / लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील फेरीवाल्यांविरोधात वारंवार उपोषण, आंदोलने करून तसेच गुन्हे नोंदवूनही त्यांची समस्य कायम आहे. त्यांच्या मुजोरीची पाळमुळे इतकी खोलवर असतील तर मग लोकशाही पद्धतीत नागरिकांनी केवळ कुंठत बसायचे का? फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने बाऊन्सर नेमण्याचे आश्वासन महासभेत दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होणार?, असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी महापालिका प्रशासनाकडे केला आहे.चौधरी म्हणाले, ‘प्रशासनातील अधिकाऱ्यांची कामे करण्याची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळेच शहरातील एकही समस्या सुटत नाही. डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाला हटाव भूमिकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत आहे. मात्र, प्रशासन ढिले पडत आहे. आम्ही गेलो की, फेरिवाल्यांची धावपळ होते. प्रशासनातील कर्मचारी-अधिकारी गेले की मात्र सारे काही आलबेल असते. हे कसं आणि का शक्य होते? त्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडत आहे.’ चौधरी आणि काही शिवसैनिकांनी बुधवारी रात्री पाटकर रोड, उर्सेकर वाडी, डॉ. राथ रोड आणि बाजार परिसरात पाहणी केली. त्यावेळी फेरीवाले जैसे थे असल्याचे आढळून आले. फेरीवाल्यांविरोधात कारवाई होत नसल्याने त्यांचा संताप झाला. प्रशासनालाच शिस्त, स्वच्छता नको आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच नागरिकांची गैरसोय हवी असेल तर कोण काय करणार? फेरीवाल्यांसोबतच प्रशासनातील मुजोरी कमी व्हायलाच हवी. सातत्याने पर्यायांबाबत चर्चा करूनही कोणताच तोडगा निघत नाही. महासभेपुरता केवळ बोलाची कढी अन् बोलाचा भात. मात्र, प्रत्यक्षात काहीही होत नाही. नागरिकही रोज मरे त्याला कोण रडे, असे म्हणत दिवस ढकलत आहेत. डॉ. राथ रोडवरील वळणावरील दोन-चार गाळे तोडून रुंदीकरण करण्यात आले. ते कोणासाठी फेरीवाल्यांसाठीच का? असा सवालही त्यांनी केला. नागरिकांना सुविधा मिळवून द्यायला शिवसैनिक सज्ज आहेत. फेरीवाले बसणार नाहीत, याची काळजी शिवसैनिक घेतील. टाटा पॉवर लाइनखालील मोकळ््या जागेत फेरीवाल्यांनी व्यवसाय करावा. त्यामुळे स्थानक परिसर मोकळा राहील, असे चौधरी म्हणाले.फेरीवाल्यांविरोधातील कारवाईसाठी बाऊन्सर नेमण्यासंर्भात बेजट काढले आहे. त्याची फाइल तयार झाली असून लेखा विभागाकडे पाठवली आहे. त्यानंतर नवे आयुक्त, स्थायी समिती अशा पद्धतीने तांत्रिक सोपस्कार त्यावर केले जातील. त्याच अवधीत टेंडरींग होण्याची शक्यता आहे. साधारण महिना-दीड महिन्यात त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. - संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, केडीएमसी