शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - मुंडे

By admin | Updated: July 18, 2016 00:08 IST

कोर्टाने ताशेरे ओढले असताना पण सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ - कोर्टाने ताशेरे ओढले असतानासुद्धा सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे. गंभीर आरोप असताना चौकशा सुरू असताना मंत्रिमंडळात समावेश करून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा कडेलोटचं केला आहे, असा घाणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कापर्डी गावात निर्भया प्रकरणालाही लाजवेल, अशी हत्या घडलीय. या घटनेनं पुरोगामी राज्याची लाज वेशीवर टांगली गेली आहे. गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भेट तर दिली नाहीच, पण गृहराज्यमंत्री देखील गेले नाहीत, पालकमंत्री दोन दिवसांनी गेले.

आरोपी संतोष भवाळ याचा फेसबुकवर पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत. आरोपीच जर मंत्र्यांच्या सोबत दिसत असेल तर कारवाई कशी होणार. प्रकरण दाबणाऱ्या अधिका-यांवर कारवाई व्हावी, उच्चस्तरीय चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे.

मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - सरकारने केंद्राकडून 66 रूपयांनी डाळ विकत घेतली. पण विक्री मात्र 120 रुपये किलोनं सुरू आहे. मधले 54 रूपये कुठं जातात हे उघड करू. भाजपपुरस्कृत सावकारांची मुजोरी वाढलीय, हे राज्य शेतकरी आणि शेतमजुरांचे नाही, तर सावकारांचे आहे.

शेतकरी फसल पीक विमा योजना लागू केली, पण 14 जिल्ह्यांना विमा कंपनी भेटलीच नाही, हे दुर्दैव.

जमीनप्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला. पण एसीबीनं क्लीन चिट दिली. मग जे पुरावे एसीबी देत होते ते कुठे दडले ?

अनेक मंत्र्यांविरोधात गंभीर आरोप दाखल असताना मंत्रिपदावर घेतले हेच का तुमचे झिरो, टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन..?

सरकारने १०० टक्के बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पण काहीही झालं नाही. पैसा नाही म्हणून शेतक-यांनी जीवन संपवलं आहे. दीड वर्षांत या युती सरकारने जे केलं,  त्याचा निषेध करतो.

दीड वर्षाच्या काळात आठ मंत्र्यांचे घोटाळे समोर आले. सभागृहात पुराव्यानिशी विषय मांडले. पोषण आहाराचा विषय सभागृहात मांडला.