शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - मुंडे

By admin | Updated: July 18, 2016 00:08 IST

कोर्टाने ताशेरे ओढले असताना पण सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ - कोर्टाने ताशेरे ओढले असतानासुद्धा सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे. गंभीर आरोप असताना चौकशा सुरू असताना मंत्रिमंडळात समावेश करून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा कडेलोटचं केला आहे, असा घाणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कापर्डी गावात निर्भया प्रकरणालाही लाजवेल, अशी हत्या घडलीय. या घटनेनं पुरोगामी राज्याची लाज वेशीवर टांगली गेली आहे. गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भेट तर दिली नाहीच, पण गृहराज्यमंत्री देखील गेले नाहीत, पालकमंत्री दोन दिवसांनी गेले.

आरोपी संतोष भवाळ याचा फेसबुकवर पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत. आरोपीच जर मंत्र्यांच्या सोबत दिसत असेल तर कारवाई कशी होणार. प्रकरण दाबणाऱ्या अधिका-यांवर कारवाई व्हावी, उच्चस्तरीय चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे.

मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - सरकारने केंद्राकडून 66 रूपयांनी डाळ विकत घेतली. पण विक्री मात्र 120 रुपये किलोनं सुरू आहे. मधले 54 रूपये कुठं जातात हे उघड करू. भाजपपुरस्कृत सावकारांची मुजोरी वाढलीय, हे राज्य शेतकरी आणि शेतमजुरांचे नाही, तर सावकारांचे आहे.

शेतकरी फसल पीक विमा योजना लागू केली, पण 14 जिल्ह्यांना विमा कंपनी भेटलीच नाही, हे दुर्दैव.

जमीनप्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला. पण एसीबीनं क्लीन चिट दिली. मग जे पुरावे एसीबी देत होते ते कुठे दडले ?

अनेक मंत्र्यांविरोधात गंभीर आरोप दाखल असताना मंत्रिपदावर घेतले हेच का तुमचे झिरो, टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन..?

सरकारने १०० टक्के बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पण काहीही झालं नाही. पैसा नाही म्हणून शेतक-यांनी जीवन संपवलं आहे. दीड वर्षांत या युती सरकारने जे केलं,  त्याचा निषेध करतो.

दीड वर्षाच्या काळात आठ मंत्र्यांचे घोटाळे समोर आले. सभागृहात पुराव्यानिशी विषय मांडले. पोषण आहाराचा विषय सभागृहात मांडला.