शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - मुंडे

By admin | Updated: July 18, 2016 00:08 IST

कोर्टाने ताशेरे ओढले असताना पण सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ - कोर्टाने ताशेरे ओढले असतानासुद्धा सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे. गंभीर आरोप असताना चौकशा सुरू असताना मंत्रिमंडळात समावेश करून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा कडेलोटचं केला आहे, असा घाणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कापर्डी गावात निर्भया प्रकरणालाही लाजवेल, अशी हत्या घडलीय. या घटनेनं पुरोगामी राज्याची लाज वेशीवर टांगली गेली आहे. गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भेट तर दिली नाहीच, पण गृहराज्यमंत्री देखील गेले नाहीत, पालकमंत्री दोन दिवसांनी गेले.

आरोपी संतोष भवाळ याचा फेसबुकवर पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत. आरोपीच जर मंत्र्यांच्या सोबत दिसत असेल तर कारवाई कशी होणार. प्रकरण दाबणाऱ्या अधिका-यांवर कारवाई व्हावी, उच्चस्तरीय चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे.

मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - सरकारने केंद्राकडून 66 रूपयांनी डाळ विकत घेतली. पण विक्री मात्र 120 रुपये किलोनं सुरू आहे. मधले 54 रूपये कुठं जातात हे उघड करू. भाजपपुरस्कृत सावकारांची मुजोरी वाढलीय, हे राज्य शेतकरी आणि शेतमजुरांचे नाही, तर सावकारांचे आहे.

शेतकरी फसल पीक विमा योजना लागू केली, पण 14 जिल्ह्यांना विमा कंपनी भेटलीच नाही, हे दुर्दैव.

जमीनप्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला. पण एसीबीनं क्लीन चिट दिली. मग जे पुरावे एसीबी देत होते ते कुठे दडले ?

अनेक मंत्र्यांविरोधात गंभीर आरोप दाखल असताना मंत्रिपदावर घेतले हेच का तुमचे झिरो, टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन..?

सरकारने १०० टक्के बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पण काहीही झालं नाही. पैसा नाही म्हणून शेतक-यांनी जीवन संपवलं आहे. दीड वर्षांत या युती सरकारने जे केलं,  त्याचा निषेध करतो.

दीड वर्षाच्या काळात आठ मंत्र्यांचे घोटाळे समोर आले. सभागृहात पुराव्यानिशी विषय मांडले. पोषण आहाराचा विषय सभागृहात मांडला.