शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसापूर्वी नालेसफाई करण्याचेच आव्हान

By admin | Updated: May 13, 2016 01:57 IST

यंदाची पावसाळापूर्व नालेसफाई केवळ ५० लाखांत अशक्य असल्याचा दावा करीत आरोग्य विभागाने त्यात आणखी एक कोटीची वाढ मिळावी, यासाठी स्थायीला साकडे घातले आहे.

भार्इंदर : यंदाची पावसाळापूर्व नालेसफाई केवळ ५० लाखांत अशक्य असल्याचा दावा करीत आरोग्य विभागाने त्यात आणखी एक कोटीची वाढ मिळावी, यासाठी स्थायीला साकडे घातले आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने समितीच्या बैठकीलाच गालबोट लागले आहे. परिणामी, बैठक आयोजनाला मंजुरी मिळण्यासाठी विभागाने थेट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाच गळ घातली आहे. शहरात १५५ लहानमोठे नाले असून पावसाळ्यात त्यातील पाण्याच्या निचऱ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पालिका पावसाळापूर्व नालेसफाई करते. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच यंत्रसामग्रीचा खर्च सुमारे दीड कोटी इतका जात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. विभागाच्या अंदाजपत्रकानुसार दोन वर्षांपासून नालेसफाईला दीड कोटी मंजूर केले होते. यंदा मात्र त्याच्या खर्चात कपात करून तो थेट ५० लाखांवर आणण्यात आला आहे. त्याला स्थायीने मंजुरीही दिली. मात्र, या खर्चात नालेसफाई कशी उरकणार, असा आरोग्य विभागाचा सवाल आहे. नालेसफाईसाठी पोकलेन, जेसीबी, फ्लोटिंग बोट, सुमारे ३०० सफाई कामगार या यंत्रणेला दिवसाकाठी लाखोंचा खर्च येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ५० लाखांचा निधी १५५ नालेसफाईसाठी अपुरा आहे. या खर्चात नालेसफाई होणे अशक्य असल्याचा दावाही विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पुरेशा निधीअभावी कशी पूर्ण करायची, असा यक्षप्रश्न आरोग्य विभागापुढे उभा ठाकला आहे. वाढीव निधीला मंजुरी मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने स्थायी समितीलाच बैठक आयोजित करण्याचे साकडे घातले आहे. आचारसंहितेच्या काळात बैठक आयोजित करणे उल्लंघन करणारे ठरत असल्याने स्थायीने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे विभागाने बैठक आयोजनाला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळावी, यासाठी थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाच विनंती केली आहे. तसे पत्र ७ मे रोजीच धाडण्यात आले असून निवडणूक प्रशासनाने अद्याप त्यावर दिलेले नाही. त्यामुळे विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अद्याप नालेसफाईला सुरुवातच केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने शहरात कोणतीही विकासकामे करणे शक्य नाही. त्यामुळे नालेसफाईची कामेही रखडली आहेत. आचारसंहिता लागू होणार असल्याची कल्पना पालिका प्रशासनाला असतानाही रस्त्यांची डागडुजी आणि नालेसफाईच्या कामांचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे आता नालेसफाईला विलंब होणार आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच नालेसफाई करता येणार आहे. मागील वर्षीही १८ मेपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे नालेसफाई रखडली होती. यंदा १० मे उलटून गेल्यावरही शहरातील नालेसफाईला सुरु वात झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे. बदलापुरात कात्रप, शिरगाव, जुवेली, खरवई, बॅरेज रोड, हेंद्रेपाडा, बेलवली, मांजर्ली, स्टेशन रोड, रेल्वे लाइनला लागून असलेल्या परिसरातून शहरातील मुख्य नाले वाहतात. आचारसंहितेतून नालेसफाईचे काम वगळावे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.