शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

लिखाणाकडे करिअर म्हणून पाहिले जात नाही

By admin | Updated: May 30, 2017 05:24 IST

परदेशात लेखकांना एका पुस्तकाकरिता १० लाख डॉलरचेही मानधन दिले जाते. अशी स्थिती आपल्याकडे नाही. शेतकऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : परदेशात लेखकांना एका पुस्तकाकरिता १० लाख डॉलरचेही मानधन दिले जाते. अशी स्थिती आपल्याकडे नाही. शेतकऱ्याला काही नाही मिळाले तरी चालेल, पण अन्नधान्य स्वस्त मिळाले पाहिजे. त्याच धर्तीवर लेखकाला काही मिळाले नाही तरी चालेल, पण पुस्तके स्वस्त मिळाली पाहिजेत, अशी वृत्ती असल्याने लेखनाकडे करिअर म्हणून कुणी पाहत नाही, अशी खंत सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केली आहे. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यातर्फे सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांचा सत्कार आणि मुलाखतीचे आयोजन क रण्यात आले होते. अस्मिता सावंत यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गवाणकर म्हणाल्या की, लेखनात पैसा नाही. त्यामुळे कुणी करिअर करायला जात नाही. ‘लेखक’ ही पदवी नावापुढे लागण्याकरिता खूपजण उत्सुक असतात. लेखक कुणीही होऊ शकतो. किमान एखादे आत्मचरित्र तरी कुणीही लिहू शकते. काही लेखक स्वत: पैसे देऊन पुस्तके छापतात. एखादा लेखक एक पुस्तकतीन वर्षे लिहीत असेल, तर त्याचा पगार कसा काय ठरवणार. पुस्तकांची रॉयल्टी पुस्तक खपल्यावर मिळणार. परदेशात मात्र वेगळी परिस्थिती असते. एक आवृत्ती १० लाखांची असते. त्यामुळे लेखकाला किमान १० लाख डॉलर मिळतात. आजची पिढी ब्लॉग लिहू लागली आहे. ही बाब समाधानकारक असली तरी त्याला व्यापकता नाही.गवाणकर म्हणाल्या की, माझे शिक्षण खेडेगावात झाले. त्या खेड्यातील शाळेत छोट्याछोट्या पुस्तकपेट्या होत्या. त्यातील पुस्तके वाचायला लागले. ज्या गावात जायचे, तेथे प्रथम वाचनालय शोधत असे. त्या काळात वि.स. खांडेकर, फडके वाचले नाही, पण रियासती, बखरी, प्रवासवर्णने खूप वाचली आहेत. कादंबरीपेक्षा चरित्र वाचायला आवडते. लायब्ररीत नोकरीला लागल्यावर आपण केवळ साक्षर आहोत, हे लक्षात आले. मग चार वर्षांत वाचनाचा सपाटा लावला. ज्ञानाचा केवढा प्रचंड विस्तार असतो, हे मला समजले. आत्मचरित्र वाचल्यावर त्यातून माणूस आपल्याला समजू शकतो. मी शेतात कधीच गेले नाही. वडील फौजदार असल्याने गावात आमच्या घराला खूप मान होता. शेतीचा अभ्यास वाचनातून केला. कार्व्हरच्या सगळ्या थेअरी मला समजल्या नाही, पण त्याचा प्रवास हा दारिद्रयातून वर जाताना डोळसपणे प्रयत्न करणारा आहे, हे समजले. आपल्याकडे स्त्रिया संशोधक का नाही, कुटुंबीयांनी त्यांना पूरक वातावरण निर्माण करून द्यावे. स्त्रियांनी संशोधन करणे म्हणजे संसार न करणे, असा समज आहे. संसार व शास्त्रज्ञ या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा साध्य होणार, असा समाजाचा दृष्टिकोन आहे. पण, स्त्रियांना संधी दिल्यावर त्या काय करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत. आपण संकुचितपणे आयुष्याकडे बघतो. त्याकडे विस्तृतपणे पाहिले पाहिजे. म्हणून, आपण लेखन केल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ची ताकद ओळखणे, तिचा पुरेपूर कस लावणे आणि तडजोड न करणे, या लेखकाकरिता खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असे नमूद करून गवाणकर म्हणाल्या की, याचा प्रत्येकाने जीवनात अवलंब केला पाहिजे. ‘एक होता कार्व्हर’ही काल्पनिक कादंबरी असती, तर तुमच्या मनाला ती भावली नसती. ते वास्तव आहे, म्हटल्यावर तुम्हीही ते इतरांना वाचण्याची शिफारस करता. कादंबरीला मी कमी लेखत नाही. पण, चरित्र वाचकांना अधिक प्रेरित व आकर्षित करतात. वाचनाची सवय लावापालकांचा मुलांशी संवाद कमी झाल्याबद्दल खंत व्यक्त करत गवाणकर म्हणाल्या की, पालक मुलांना किती वेळ देतात, हे महत्त्वाचे आहे.वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. घरात पुस्तके असतील, तर मुले लवकर वाचायला लागतील. आजीआजोबाचे काम मुलांना वाचायला लावणे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.