शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

लिखाणाकडे करिअर म्हणून पाहिले जात नाही

By admin | Updated: May 30, 2017 05:24 IST

परदेशात लेखकांना एका पुस्तकाकरिता १० लाख डॉलरचेही मानधन दिले जाते. अशी स्थिती आपल्याकडे नाही. शेतकऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : परदेशात लेखकांना एका पुस्तकाकरिता १० लाख डॉलरचेही मानधन दिले जाते. अशी स्थिती आपल्याकडे नाही. शेतकऱ्याला काही नाही मिळाले तरी चालेल, पण अन्नधान्य स्वस्त मिळाले पाहिजे. त्याच धर्तीवर लेखकाला काही मिळाले नाही तरी चालेल, पण पुस्तके स्वस्त मिळाली पाहिजेत, अशी वृत्ती असल्याने लेखनाकडे करिअर म्हणून कुणी पाहत नाही, अशी खंत सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केली आहे. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यातर्फे सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांचा सत्कार आणि मुलाखतीचे आयोजन क रण्यात आले होते. अस्मिता सावंत यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गवाणकर म्हणाल्या की, लेखनात पैसा नाही. त्यामुळे कुणी करिअर करायला जात नाही. ‘लेखक’ ही पदवी नावापुढे लागण्याकरिता खूपजण उत्सुक असतात. लेखक कुणीही होऊ शकतो. किमान एखादे आत्मचरित्र तरी कुणीही लिहू शकते. काही लेखक स्वत: पैसे देऊन पुस्तके छापतात. एखादा लेखक एक पुस्तकतीन वर्षे लिहीत असेल, तर त्याचा पगार कसा काय ठरवणार. पुस्तकांची रॉयल्टी पुस्तक खपल्यावर मिळणार. परदेशात मात्र वेगळी परिस्थिती असते. एक आवृत्ती १० लाखांची असते. त्यामुळे लेखकाला किमान १० लाख डॉलर मिळतात. आजची पिढी ब्लॉग लिहू लागली आहे. ही बाब समाधानकारक असली तरी त्याला व्यापकता नाही.गवाणकर म्हणाल्या की, माझे शिक्षण खेडेगावात झाले. त्या खेड्यातील शाळेत छोट्याछोट्या पुस्तकपेट्या होत्या. त्यातील पुस्तके वाचायला लागले. ज्या गावात जायचे, तेथे प्रथम वाचनालय शोधत असे. त्या काळात वि.स. खांडेकर, फडके वाचले नाही, पण रियासती, बखरी, प्रवासवर्णने खूप वाचली आहेत. कादंबरीपेक्षा चरित्र वाचायला आवडते. लायब्ररीत नोकरीला लागल्यावर आपण केवळ साक्षर आहोत, हे लक्षात आले. मग चार वर्षांत वाचनाचा सपाटा लावला. ज्ञानाचा केवढा प्रचंड विस्तार असतो, हे मला समजले. आत्मचरित्र वाचल्यावर त्यातून माणूस आपल्याला समजू शकतो. मी शेतात कधीच गेले नाही. वडील फौजदार असल्याने गावात आमच्या घराला खूप मान होता. शेतीचा अभ्यास वाचनातून केला. कार्व्हरच्या सगळ्या थेअरी मला समजल्या नाही, पण त्याचा प्रवास हा दारिद्रयातून वर जाताना डोळसपणे प्रयत्न करणारा आहे, हे समजले. आपल्याकडे स्त्रिया संशोधक का नाही, कुटुंबीयांनी त्यांना पूरक वातावरण निर्माण करून द्यावे. स्त्रियांनी संशोधन करणे म्हणजे संसार न करणे, असा समज आहे. संसार व शास्त्रज्ञ या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा साध्य होणार, असा समाजाचा दृष्टिकोन आहे. पण, स्त्रियांना संधी दिल्यावर त्या काय करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत. आपण संकुचितपणे आयुष्याकडे बघतो. त्याकडे विस्तृतपणे पाहिले पाहिजे. म्हणून, आपण लेखन केल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ची ताकद ओळखणे, तिचा पुरेपूर कस लावणे आणि तडजोड न करणे, या लेखकाकरिता खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असे नमूद करून गवाणकर म्हणाल्या की, याचा प्रत्येकाने जीवनात अवलंब केला पाहिजे. ‘एक होता कार्व्हर’ही काल्पनिक कादंबरी असती, तर तुमच्या मनाला ती भावली नसती. ते वास्तव आहे, म्हटल्यावर तुम्हीही ते इतरांना वाचण्याची शिफारस करता. कादंबरीला मी कमी लेखत नाही. पण, चरित्र वाचकांना अधिक प्रेरित व आकर्षित करतात. वाचनाची सवय लावापालकांचा मुलांशी संवाद कमी झाल्याबद्दल खंत व्यक्त करत गवाणकर म्हणाल्या की, पालक मुलांना किती वेळ देतात, हे महत्त्वाचे आहे.वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. घरात पुस्तके असतील, तर मुले लवकर वाचायला लागतील. आजीआजोबाचे काम मुलांना वाचायला लावणे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.