शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
4
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
7
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
8
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
9
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
10
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
11
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
12
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
13
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
14
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
15
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
16
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
17
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
18
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
19
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
20
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Daily Top 2Weekly Top 5

कविता अशी लिहा, ज्यातून प्रबोधन झाले पाहिजे - जयदेव भटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी - कविता लिहिताना अशी कविता जन्माला घाला की, त्या कवितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. महामानवांच्या कार्याची महती आपल्या कवितेच्या माध्यमातून उमटणे भविष्यात गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी जयदेव भटू यांनी भिवंडीत व्यक्त केले.

शहरातील काप आळी, आंबेडकर नगर येथील चंद्रमणी बुद्ध विहार येथे रविवारी सायंकाळी वर्षावास कार्यक्रमानिमित्त कवी संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बौद्धजन पंचायत शाखा क्रं. २८३ यांच्या वतीने संमेलन आयोजिले होते. कार्यक्रमाचे उदघाटन गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले.

यावेळी जेष्ठ कवी, गायक राजरत्न राजगुरू, कवी विजयकुमार भोईर, कवी नवनाथ रणखांबे, कवी नरेश जाधव, कवी मिलिंद जाधव, कवी दिनेश भोईर, कवी शाम बैसाणे, कवयित्री सुरेखा गायकवाड, कवयित्री मनिषा मेश्राम यांनी विविध विषयांवर कविता सादर करत प्रबोधन केले. यावेळी बौद्धजन पंचायत क्रं. २८३ शाखेच्या अध्यक्षा माया शेलार, माजी अध्यक्ष मिलिंद शेलार, अँड. गुलाब खंदारे उपस्थित होते.