शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसणे चिंताजनक - राज्यपाल

By admin | Updated: March 22, 2016 02:16 IST

महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात.

ठाणे : महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. त्यातही ५० टक्के महिला असतात. परंतु, त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याने त्यांची कुचंबणा होते. परिणामी, त्यांच्यात मूत्रमार्गाचे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे क्लेशकारक असल्याची खंतही त्यांंनी व्यक्त केली.उत्तन येथे पार पडलेल्या युवा भारत पॉलिसी पार्लमेंटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नवी दिल्लीच्या पब्लिक पॉलिसी रिसर्च सेंटर व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे हा कार्यक्रम झाला. त्याचा समारोप राज्यपालांच्या हस्ते झाला. राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळी घेण्याचा तसेच पावसाचे पाणी अडवून साठवण्याचा चांगला उपक्र म हाती घेतला आहे. परंतु, आपली खेडी सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय स्वच्छ भारत अभियानाला फारसा अर्थ राहणार नाही. युवकांनी महात्मा गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या मंत्राचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत राव यांनी मांडले. जलसंवर्धन आणि पाणी साठवण्याचा उपक्र म स्वच्छ भारत अभियानाशी जोडल्यास हे अभियान अधिक व्यापक होईल. याचप्रमाणे सार्वजनिक, खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन या अभियानास गती देण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.मेक इन महाराष्ट्र, कृषी विद्यापीठांतील संशोधन, राज्याला असलेली नामांकित संशोधन संस्थेची गरज यासारख्या विषयांकडे राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. लवकरच सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांची एक बैठक बोलावण्यात येणार असून त्यात राजकीय नेते, मंत्र्यांनादेखील आमंत्रित करण्यात येऊन विद्यापीठांच्या संशोधनांवर चर्चा करण्यात येईल, असे सांगून राज्यपाल म्हणाले, राज्यात पडणारा दुष्काळ, हवामानाशी संबंधित अनियमितता यावर या कृषी विद्यापीठांनी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. शेतक ऱ्यांना अधिक चांगल्या संशोधनांचा लाभ पदरी पडावा, यासाठी कंपन्या आणि आपल्या कृषी संशोधन संस्था यांनी संयुक्तरीत्या एक व्यासपीठ स्थापावे, अशी सूचनाही त्यांनी केली. परभणी येथील कृषी विद्यापीठाने तयार केलेली मळणी, नांगरणी पेरणी ही यंत्रे विशेषत: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.