शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसणे चिंताजनक - राज्यपाल

By admin | Updated: March 22, 2016 02:16 IST

महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात.

ठाणे : महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. त्यातही ५० टक्के महिला असतात. परंतु, त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याने त्यांची कुचंबणा होते. परिणामी, त्यांच्यात मूत्रमार्गाचे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे क्लेशकारक असल्याची खंतही त्यांंनी व्यक्त केली.उत्तन येथे पार पडलेल्या युवा भारत पॉलिसी पार्लमेंटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नवी दिल्लीच्या पब्लिक पॉलिसी रिसर्च सेंटर व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे हा कार्यक्रम झाला. त्याचा समारोप राज्यपालांच्या हस्ते झाला. राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळी घेण्याचा तसेच पावसाचे पाणी अडवून साठवण्याचा चांगला उपक्र म हाती घेतला आहे. परंतु, आपली खेडी सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय स्वच्छ भारत अभियानाला फारसा अर्थ राहणार नाही. युवकांनी महात्मा गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या मंत्राचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत राव यांनी मांडले. जलसंवर्धन आणि पाणी साठवण्याचा उपक्र म स्वच्छ भारत अभियानाशी जोडल्यास हे अभियान अधिक व्यापक होईल. याचप्रमाणे सार्वजनिक, खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन या अभियानास गती देण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.मेक इन महाराष्ट्र, कृषी विद्यापीठांतील संशोधन, राज्याला असलेली नामांकित संशोधन संस्थेची गरज यासारख्या विषयांकडे राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. लवकरच सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांची एक बैठक बोलावण्यात येणार असून त्यात राजकीय नेते, मंत्र्यांनादेखील आमंत्रित करण्यात येऊन विद्यापीठांच्या संशोधनांवर चर्चा करण्यात येईल, असे सांगून राज्यपाल म्हणाले, राज्यात पडणारा दुष्काळ, हवामानाशी संबंधित अनियमितता यावर या कृषी विद्यापीठांनी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. शेतक ऱ्यांना अधिक चांगल्या संशोधनांचा लाभ पदरी पडावा, यासाठी कंपन्या आणि आपल्या कृषी संशोधन संस्था यांनी संयुक्तरीत्या एक व्यासपीठ स्थापावे, अशी सूचनाही त्यांनी केली. परभणी येथील कृषी विद्यापीठाने तयार केलेली मळणी, नांगरणी पेरणी ही यंत्रे विशेषत: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.