शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्याबाबत कार्यशाळा, २००५ पूर्वीचे अवैध बांधकामे होणार नियमित

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2023 20:27 IST

त्यानंतरच्या अवैध बांधकामाला क्लस्टर व एसआरए योजना होणार लागू.

उल्हासनगर : महापालिका सभागृहात सन-२००५ च्या सुधारित अध्यादेशानुसार अनियमित बांधकामे नियमित करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मंगळवारी दुपारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. सुधारित अध्यादेशनुसार दंड कमी करण्यात आला असून ४ ऐवजी ६.४ बांधकाम चटईक्षेत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन शासनाने खास उल्हासनगर साठी सन-२००६ साली अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. मात्र अध्यादेशात अटी-शर्ती जाचक तर दंड जास्त असल्याने, नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान गेल्या काही वर्षात धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकल्यावर शासन सन-२०२२ मध्ये त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत. सुधारित अध्यादेशात शहरातील धोकादायक इमारतीचा समावेश करण्यात आला. अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व माहिती देण्यासाठी आयुक्तांनी महासभा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. आयुक्त अजीज शेख, नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी सुधारित अध्यादेशा बाबत माहिती देऊन, यासाठी एका एजन्सी नियुक्तीची माहिती दिली. तसेच एजन्सी नियुक्तीपर्यंत नागरिक ऑनलाइन व ऑफलाईन बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना आयुक्त अजीज शेख यांनी केले.

या अध्यादेशनुसार सन -२००५ पूर्वीचेच अवैध बांधकामे नियमित होणार असून त्यांना २२०० रुपये स्केअर मीटर दंड आकारला जाणार आहेत. तसेच ४ ऐवजी ६.४ एफएसआय मिळणार असल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. सन-२००५ नंतरच्या अवैध बांधकामाला क्लस्टर व एसआरए योजने अंतर्गत विकास करण्यात येणार असल्याची माहिती नगररचनाकारांनी दिली. बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने काय काय उपाययोजना केल्या आहेत. याबाबतची माहिती कार्यशाळेत दिली असून नागरिकांनी बांधकाम नियमित करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी क्लस्टर किंवा एसआरए योजने अंतर्गत विकास करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. यामध्ये शासन जमिनीला किती दंड आकारण्यात येईल. याबाबीचा माहिती नमूद केले नसल्याने नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

जुने अर्जाचा होणार विचारज्या नागरिकांनी बांधकामे नियमित करण्यासाठी यापूर्वी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज सादर केले. त्या अर्जाचा विचार केला जाणार असल्याची माहिती नगररचनाकार मुळे यांनी दिली. ५ हजार पेक्षा जास्त जुने अर्ज महापालिका तज्ञ समितीकडे पडून आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर