शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्याबाबत कार्यशाळा, २००५ पूर्वीचे अवैध बांधकामे होणार नियमित

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2023 20:27 IST

त्यानंतरच्या अवैध बांधकामाला क्लस्टर व एसआरए योजना होणार लागू.

उल्हासनगर : महापालिका सभागृहात सन-२००५ च्या सुधारित अध्यादेशानुसार अनियमित बांधकामे नियमित करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मंगळवारी दुपारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. सुधारित अध्यादेशनुसार दंड कमी करण्यात आला असून ४ ऐवजी ६.४ बांधकाम चटईक्षेत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन शासनाने खास उल्हासनगर साठी सन-२००६ साली अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. मात्र अध्यादेशात अटी-शर्ती जाचक तर दंड जास्त असल्याने, नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान गेल्या काही वर्षात धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकल्यावर शासन सन-२०२२ मध्ये त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत. सुधारित अध्यादेशात शहरातील धोकादायक इमारतीचा समावेश करण्यात आला. अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व माहिती देण्यासाठी आयुक्तांनी महासभा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. आयुक्त अजीज शेख, नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी सुधारित अध्यादेशा बाबत माहिती देऊन, यासाठी एका एजन्सी नियुक्तीची माहिती दिली. तसेच एजन्सी नियुक्तीपर्यंत नागरिक ऑनलाइन व ऑफलाईन बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना आयुक्त अजीज शेख यांनी केले.

या अध्यादेशनुसार सन -२००५ पूर्वीचेच अवैध बांधकामे नियमित होणार असून त्यांना २२०० रुपये स्केअर मीटर दंड आकारला जाणार आहेत. तसेच ४ ऐवजी ६.४ एफएसआय मिळणार असल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. सन-२००५ नंतरच्या अवैध बांधकामाला क्लस्टर व एसआरए योजने अंतर्गत विकास करण्यात येणार असल्याची माहिती नगररचनाकारांनी दिली. बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने काय काय उपाययोजना केल्या आहेत. याबाबतची माहिती कार्यशाळेत दिली असून नागरिकांनी बांधकाम नियमित करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी क्लस्टर किंवा एसआरए योजने अंतर्गत विकास करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. यामध्ये शासन जमिनीला किती दंड आकारण्यात येईल. याबाबीचा माहिती नमूद केले नसल्याने नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

जुने अर्जाचा होणार विचारज्या नागरिकांनी बांधकामे नियमित करण्यासाठी यापूर्वी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज सादर केले. त्या अर्जाचा विचार केला जाणार असल्याची माहिती नगररचनाकार मुळे यांनी दिली. ५ हजार पेक्षा जास्त जुने अर्ज महापालिका तज्ञ समितीकडे पडून आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर