शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरीचा पालघरला मोर्चा

By admin | Updated: May 30, 2017 05:08 IST

ग्रामसभेला गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू मानून १९९६ साली मंजूर करण्यात आलेल्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी

हितेन नाईक/लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : ग्रामसभेला गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू मानून १९९६ साली मंजूर करण्यात आलेल्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने नियम बनविण्यात मोठा कालावधी घालविला. आणि आता नियम बनविल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने हयगय केल्याच्या निषेधार्थ आज कष्टकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.पालघर जिल्ह्यातील अनेक भागात शासन विनाशकारी प्रकल्प राबविताना त्यांचे प्रशासन ग्रामसभांचा सल्ला न घेता आपल्या मर्जी प्रमाणे भूसंपादनाचे निर्णय घेत असल्याने संतापलेल्या शेकडो मोर्चेकऱ्यांनी रणरणते ऊन असताना आणि घामाच्या धारा वाहत असतांनाही आज शेकडोच्या संख्येने रस्त्यावर येत शासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला. एक,दो, एक दो बुलेट ट्रेन को फेक दो, जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत ‘आज नी उद्या मरायचे मग कशाला मागे सरायच’ अशा गगनभेदी घोषणा देत हे मोर्चेकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. दुपारी १२ वाजता पालघरच्या हुतात्मा स्तंभावरून ह्या मोर्चाला सुरुवात करण्यात आल्या नंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर हा मोर्चा अडविला. ह्या मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात ब्रायन लोबो ह्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करून त्यांचा विकास घडविण्याचे अधिकार पेसा अंतर्गत ग्रामसभेला देण्यात आले आहेत. परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने नियम बनविण्याकरीता १८ वर्षाचा कालावधी लावल्याचे सांगितले. पाड्या, वस्त्यांना स्वतंत्र पेसा गाव म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून सादर केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात प्रशासन टाळाटाळ करीत आहे.ह्यावरून प्रशासनाला सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकांच्या हातात सत्ता द्यायची नसल्याचे दिसते. पाड्याच्यास्तरावर ग्रामसभास्तरावर एकत्र येऊन निधीवर देखरेख करून योग्य नियोजन करू शकत असल्याने ५ टक्के निधी ग्रामसभा कोषात न जाता ग्राम पाडा कोषात जायला हवा असे सांगून पाड्यांना पेसा गाव घोषित केल्या शिवाय हे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामसभेला न विचारता प्रशासन त्यांच्याच मर्जीप्रमाणे भूसंपादनाचा निर्णय घेते.एका लहान क्षेत्रात बुलेट ट्रेन ,रेल्वे कॉरिडॉर, वाढवणं बंदर ई. सारखे अनेक विनाशकारी प्रकल्प राबवून आदिवासी गावांची नैसिर्गक साधनसंपत्ती, समाज, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर दुसरी कडे स्थानिकांच्या जमिनीवर धरणे बांधून त्यांना व त्यांच्या जमिनी पाण्यावाचून ठेवून त्यांच्या हक्काचे पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर, मुंबईला पळवून नेले जात आहे. अशा वेळी आदिवासी समाजाची नैसर्गिक साधनसंपत्ती, रूढी, परंपरा जोपासणे ही पेसा कायद्याची उद्दिष्टे फोल ठरत आहेत. तर वन हक्क कायद्याची उलटी अंमलबजावणी होत असून सहा वर्षापूर्वी ग्रामसभेने केलेल्या शिफारशी न मानता प्रशासन त्यांच्याच मर्जी प्रमाणे आदिवासींचे दावे अमान्य करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.तसेच पेसा कायद्यानुसार ग्रामसभेच्या सहभागाने आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतर थांबविण्यास कोणत्याही उपाय योजना आखल्या जात नसून ग्रामसभाना डावलून खोटे अभिलेख तयार केले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी स्व-घोषित केलेली सर्व गावे स्वतंत्र पेसा गावं म्हणून मंजूर करावीत, ग्रामसभेच्या संमती शिवाय अनुसूचित क्षेत्रामध्ये विनाशकारी प्रकल्प राबवू नयेत, वनहक्क कायद्यांतर्गत ग्रामसभेच्या शिफारशी नुसार सर्व प्रलंबित दावे व अपील प्रकरणे मंजूर करण्यात यावीत, मनरेगा अंतर्गत थकीत मजुरी व बेरोजगार भत्ता मजुरांना त्वरित द्यावा, सर्व नळपाणी योजना पूर्ण करून ग्रामसभेच्या ताब्यात द्याव्यात आदी मागण्या केल्या गेल्या.जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चामागण्या चे निवेदन देऊन कष्टकरीचे लोबो, मधू धोडी, शिवाजी गोडे, नरेश गहला, सुनील मलावकर, प्रदीप प्रभू, अजय भोईर, भगवान कचरे, रामदास बरफ, नाथा गभाले, ई.नी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.