शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांतील पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम ...

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेत योजनेबाबत समन्वय नसल्याने कामाला गती नसल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केला.

आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी आयुक्तांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेसाठी २८ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारायच्या आहेत. २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर आहे. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये १० गावे समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी टाक्याच्या जागांसाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे पाठविलेल्या प्रस्तावात जागा गुगल मॅपद्वारे मार्क केल्या आहेत. या प्रकरणी एमएमआरडीने उत्तर दिलेले नाही. तसेच प्रस्तावाची प्रतही दिलेली नाही. योजना केंद्राची असली तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत त्याचे काम केले जात आहे. जिल्हा अधिकारी, एमएमआरडीए, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी महापालिकेचा समन्वय नसल्याने योजनेच्या कामाला गती नाही.

याशिवाय रिंगरोड प्रकल्पातील ८५० आणि ९० फुटी रस्त्यातील सहा बाधितांचे पुनर्वसन करावे. डोंबिवली नांदीवली मठाकडील रस्त्याचे काम मार्गी लावावे. मालमत्ता कराच्या थकबाकीवर महापालिकेने आकारलेल्या शास्तीत शंभर टक्के सूट देण्यात यावी. महापालिकेत समाविष्ट असलेल्या ९ गावांमधील मालमत्ताधारकांना महापालिकेने मालमत्तेची सुधारित बिले पाठवावीत. या मागण्या आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे चर्चेदरम्यान केल्या. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आयुक्तांनी आश्वासित केल्याचे पाटील यांनी सांगितले.

----------------------

(फोटो आहे)