शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

२७ गावांतील पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम ...

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेत योजनेबाबत समन्वय नसल्याने कामाला गती नसल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केला.

आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी आयुक्तांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेसाठी २८ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारायच्या आहेत. २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर आहे. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये १० गावे समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी टाक्याच्या जागांसाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे पाठविलेल्या प्रस्तावात जागा गुगल मॅपद्वारे मार्क केल्या आहेत. या प्रकरणी एमएमआरडीने उत्तर दिलेले नाही. तसेच प्रस्तावाची प्रतही दिलेली नाही. योजना केंद्राची असली तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत त्याचे काम केले जात आहे. जिल्हा अधिकारी, एमएमआरडीए, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी महापालिकेचा समन्वय नसल्याने योजनेच्या कामाला गती नाही.

याशिवाय रिंगरोड प्रकल्पातील ८५० आणि ९० फुटी रस्त्यातील सहा बाधितांचे पुनर्वसन करावे. डोंबिवली नांदीवली मठाकडील रस्त्याचे काम मार्गी लावावे. मालमत्ता कराच्या थकबाकीवर महापालिकेने आकारलेल्या शास्तीत शंभर टक्के सूट देण्यात यावी. महापालिकेत समाविष्ट असलेल्या ९ गावांमधील मालमत्ताधारकांना महापालिकेने मालमत्तेची सुधारित बिले पाठवावीत. या मागण्या आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे चर्चेदरम्यान केल्या. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आयुक्तांनी आश्वासित केल्याचे पाटील यांनी सांगितले.

----------------------

(फोटो आहे)