शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

२७ गावांतील पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम ...

कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेत योजनेबाबत समन्वय नसल्याने कामाला गती नसल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केला.

आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी आयुक्तांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेसाठी २८ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारायच्या आहेत. २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर आहे. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये १० गावे समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी टाक्याच्या जागांसाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे पाठविलेल्या प्रस्तावात जागा गुगल मॅपद्वारे मार्क केल्या आहेत. या प्रकरणी एमएमआरडीने उत्तर दिलेले नाही. तसेच प्रस्तावाची प्रतही दिलेली नाही. योजना केंद्राची असली तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत त्याचे काम केले जात आहे. जिल्हा अधिकारी, एमएमआरडीए, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी महापालिकेचा समन्वय नसल्याने योजनेच्या कामाला गती नाही.

याशिवाय रिंगरोड प्रकल्पातील ८५० आणि ९० फुटी रस्त्यातील सहा बाधितांचे पुनर्वसन करावे. डोंबिवली नांदीवली मठाकडील रस्त्याचे काम मार्गी लावावे. मालमत्ता कराच्या थकबाकीवर महापालिकेने आकारलेल्या शास्तीत शंभर टक्के सूट देण्यात यावी. महापालिकेत समाविष्ट असलेल्या ९ गावांमधील मालमत्ताधारकांना महापालिकेने मालमत्तेची सुधारित बिले पाठवावीत. या मागण्या आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे चर्चेदरम्यान केल्या. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आयुक्तांनी आश्वासित केल्याचे पाटील यांनी सांगितले.

----------------------

(फोटो आहे)