शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

भुयारी मार्गाचे काम होणार एप्रिलमध्ये पूर्ण?

By admin | Updated: January 11, 2017 07:16 IST

शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि उड्डाणपुलाला पर्याय म्हणून रेल्वे मार्गाखालून बांधल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

राजू काळे / भार्इंदर शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि उड्डाणपुलाला पर्याय म्हणून रेल्वे मार्गाखालून बांधल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल साडेसात वर्षे रखडलेले या पुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.वाहतुक कोंडी फोडण्यासाठी २००९ मध्ये या भुयारी मार्गाला मंजुरी दिली. तत्पूर्वी शहरातील पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकाचा एकमेव आधार होता. पालिकेने २००५ मध्ये इंदिरा गांधी उड्डाणपूल बांधला. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाले. वाहनांची संख्या वाढत गेल्यावर या उड्डाणपुलावर ताण पडू लागला आणि कोंडी वाढू लागली. पुलाशिवाय पर्यायी वाहतुक मार्ग नसल्याने वाहनचालकांना खास करून भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेहून पश्चिमेला जायचे झाल्यास पाच कि.मी.चे अंतर कापावे लागते. त्यामुळे उड्डाणपुलालाही पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला आणि त्यातून रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्गाला २००९ मध्ये मंजुरी दिली. सुरुवातीला हा मार्ग बॉक्स पुशिंग पद्धतीने बांधण्याचे ठरविले. त्यासाठी सुमारे साडे नऊ कोटींची तरतूद केली. त्याच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने सल्लागारांच्या सुचनेनुसार आयआयटीमार्फत प्रकल्पाच्या जागेची तपासणी केली. प्रकल्पाच्या जागेत दलदल असल्याने बॉक्स पुशिंगऐवजी मायक्रो टनेल ट्रेन्चलेस पद्धतीचा वापर करण्याची सूचना करण्यात आली. पालिकेने त्यासाठी सुमारे ४३ कोटी ७६ लाखांच्या खर्चाची तरतुद केली. सुमारे ७० मीटर लांबी व १० मीटर रुंदीचा भुयारी वाहतुक मार्ग बांधण्याचे कंत्राट २५ मे २०११ रोजी घई कन्स्ट्रक्शनला दिले. मार्ग पूर्ण करण्याची मुदत मे २०१४ पर्यंत होती. रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवून पश्चिमेस नवीन यार्ड बांधल्याने भुयारी मार्ग सहा मीटर खाली नेण्याची सूचना पश्चिम रेल्वने केली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने २०१४ मध्ये महासभेने १७ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. रेल्वेने प्रकल्पाचे काम सुरु करण्यास तब्बल वर्षाने मंजुरी दिल्याने कामाला उशीरा सुरुवात झाली. शिवाय रेल्वेच्या जागेचा वापर केल्यापोटी रेल्वेने पालिकेकडे सात कोटींच्या लेव्हिएबल चार्जेसची मागणी केली. ही रक्कम पालिकेने न भरल्याने रेल्वेने प्रकल्पाचे काम २०१४ पासून बंद पाडले. तब्बल ८ महिने ते बंद होते. अखेर पालिकेने गेल्या वर्षी जानेवारीत रेल्वेकडे तीन कोटी भरल्यानंतर काम सुरु झाले. वाढलेल्या खर्चासाठी पालिकेने २०१५ च्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद केली. या मार्गाच्या पश्चिमेकडील निर्गमनाच्या दिशेत शहीद भगतसिंग उद्यानाचा अडसर असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेने हे उद्यान जमिनदोस्त केले. हे काम एप्रिलमध्ये पूर्ण होणार असल्याचे पालिका सांगते. (प्रतिनिधी)