शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

रिंगरोड प्रकल्पाचे काम भूसंपादनापूर्वीच सुरू, रस्ता अडचणीत येण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:20 IST

कल्याण-डोंबिवली शहरातील रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही. असे असतानाही एमएमआरडीएने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही. असे असतानाही एमएमआरडीएने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात ज्यांची जमीन बाधित होणार आहे, त्यांच्याकडून जमीन देण्यास नकार दिला जाऊ शकतो किंवा जास्तीचा मोबदला मागितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करणे अडचणीचे ठरू शकते.कल्याण-डोंबिवलीत ३२ किलोमीटरचा रिंग रोड प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चून तयार केला जाणार आहे. त्यासाठी १२४ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यात २४ गावांची जमीन बाधित होणार आहे. आतापर्यंत २१ गावांतील जमिनीची मोजणी पार पडली आहे.हा रस्ता हेदूटणे ते शीळ, शीळ ते मोठागाव, मोठा गाव ते दुर्गाडी, दुर्गाडी ते गांधारे, गांधारे ते बारावे आणि बारावे ते टिटवाळा या सहा टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. त्यापैकी दुर्गाडी ते गंधारे या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदार नेमला आहे. त्यानंतर गांधारे ते बारावे, बारावे ते टिटवाळा या दोन टप्प्यांना हात घातला जाणार आहे. दुर्गाडी ते टिटवाळा पर्यंत २५० कोटी रुपये खर्चाचे काम आहे. पहिल्या टप्यातील रिंगरोडच्या कामासाठी ७० टक्केच जमीन संपादित करून झालेली आहे, असे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून सांगण्यात आले. एकूण प्रकल्पासाठी १२४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी केवळ ४० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. उर्वरित ६० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया बाकी आहे.महापालिकेने भूसंपादनाचे काम ठोकपागारी कंत्राटी कामगारांना दिले आहे. महापालिकेच्या भूसंपादन विभागाने रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी १ हजार ४५३ जणांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. अनेकांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. अनेकांना नोटिसा पाठविताना त्यांचे पत्ते नीट नाहीत. त्यामुळे नोटीस योग्य पत्त्यावर योग्य बाधित व्यक्तीलाच गेली आहे की नाही, याची हमी मिळत नाही. त्यामुळे नोटिसा मिळूनही काही जणांकडून थंड प्रतिसाद आहे. त्यापैकी काही जणांना टीडीआर हवा आहे. त्यांनी त्यांचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले आहे. काहींना टीडीआर नको आहे, त्यांनी तसे कळविले आहे.प्रकल्पासाठी संपादन कराव्या लागणाºया एकूण १२४ हेक्टर जागेपैकी ३३ हेक्टर जागा ही सीआरझेडमध्ये येत होती. राज्य सरकारने सीआरझेडमधील जागा संपादित करण्याचा मार्ग मोकळा करून त्याचा एक अध्यादेश १४ मार्च २०१७ मध्ये काढला आहे. एखाद्या सीआरझेडमधील जमीन मालकाने भूसंपादनास सहमती दर्शविल्यास त्याला एक हजार मीटर जागेच्या बदल्यात एक हजार मीटर जागेचा टीडीआर दिला जाणार आहे. त्यामुळे सीआरझेडचा मुद्दाही निकाली निघाला आहे. भूसंपादन न करता प्रकल्पाचे काम सुरू केल्याने ज्यांना जमीन द्यायची इच्छा नाही, अशांकडून जादा मोबदल्याची मागणी केली जाऊ शकते. त्यासाठी प्रकल्पाची अडवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यातील निविदा काढताना पहिल्या टप्प्याचा मार्ग हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचºयाखाली गाडला गेलेला आहे. त्यावर १२ लाख मेट्रीक टन कचरा आहे. तो दूर केल्याशिवाय प्रकल्पाची वाट मोकळी होऊ शकत नाही.>आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा : रवी पाटीलशिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, एमएमआरडीएचे रिंगरोड प्रकल्पाच्या कामाचे नियोजन नाही. आधी जमीन संपादन करण्याऐवजी जमीन ताब्यात नसताना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढून घाई गडबडीत कामाला सुरुवात केली आहे. काही जमीन मालकांनी स्वत:हून पुढे येऊन जमीन देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यांचे प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना खात्याकडे पडून आहे. त्यावर आयुक्तांकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. टीडीआर प्रस्ताव निकाली काढले जात नाही. टीडीआरच्या फाइल्स कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाकडे पडून आहेत. त्यावर आयुक्त पी. वेलरासू यांनी तातडीने निर्णय घ्यावा. त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका