शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात

By सदानंद नाईक | Updated: January 2, 2023 17:38 IST

धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे. 

उल्हासनगर : धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिमकडे नागरिक व वाहनाना वालधुनी नदीवरील जुन्या पुलावरून जावे लागत होते. मात्र पूल उंचीने लहान असल्याने, पावसाळ्यात पुलावरून पाणी जात होते. अश्या धोकादायक पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधण्याची मागणी विविध राजकीय पक्षासह स्थानिक माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे, टोनी सिरवानी, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी महापालिकेकडे केली. टोनी सिरवानी हे स्थायी समिती सभापती पदी असताना पूल पुनर्बांधणीला मंजुरी दिली. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन महापालिकेने दिले. जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाचे भूमिपूजन विविध पक्षाचे नेते व महापालिका अधिकारी यांच्या गेल्या काही महिन्यापूर्वी हस्ते झाले. दरम्यान जुन्या पुला शेजारून गेलेल्या जलवाहिनीचे स्थलांतर केल्यावर नवीन पुलाचे काम सुरू होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पुलाच्या कामाला मुहूर्त लागला नाही.

 वालधुनी नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मात्र जो पर्यंत पुला शेजारील जलवाहिनीचे स्थलांतर होणार नाही. तोपर्यंत पुलाच्या कामाला मुहूर्त लागणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांना पुलाच्या प्रगती बाबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

पूर्वीपासूनच रस्ते बांधणी बाबत वादात सापडलेले बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांच्यावर शहरातून टीकेची झोळ उडाली आहे. वालधुनीवरील पुलाचे काम रखडल्यास पावसाळ्यात रेल्वे स्टेशनकडे जाणार कसे? असा प्रश्न शिवाजी रगडे यांनी महापालिका आयुक्तांना केला. पुलाचे काम सुरू केले नाहींतर, गेल्या वेळी प्रमाणे आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनेसह शिवाजी रंगडे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे