शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात

By सदानंद नाईक | Updated: January 2, 2023 17:38 IST

धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे. 

उल्हासनगर : धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिमकडे नागरिक व वाहनाना वालधुनी नदीवरील जुन्या पुलावरून जावे लागत होते. मात्र पूल उंचीने लहान असल्याने, पावसाळ्यात पुलावरून पाणी जात होते. अश्या धोकादायक पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधण्याची मागणी विविध राजकीय पक्षासह स्थानिक माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे, टोनी सिरवानी, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी महापालिकेकडे केली. टोनी सिरवानी हे स्थायी समिती सभापती पदी असताना पूल पुनर्बांधणीला मंजुरी दिली. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन महापालिकेने दिले. जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाचे भूमिपूजन विविध पक्षाचे नेते व महापालिका अधिकारी यांच्या गेल्या काही महिन्यापूर्वी हस्ते झाले. दरम्यान जुन्या पुला शेजारून गेलेल्या जलवाहिनीचे स्थलांतर केल्यावर नवीन पुलाचे काम सुरू होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पुलाच्या कामाला मुहूर्त लागला नाही.

 वालधुनी नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मात्र जो पर्यंत पुला शेजारील जलवाहिनीचे स्थलांतर होणार नाही. तोपर्यंत पुलाच्या कामाला मुहूर्त लागणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांना पुलाच्या प्रगती बाबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

पूर्वीपासूनच रस्ते बांधणी बाबत वादात सापडलेले बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांच्यावर शहरातून टीकेची झोळ उडाली आहे. वालधुनीवरील पुलाचे काम रखडल्यास पावसाळ्यात रेल्वे स्टेशनकडे जाणार कसे? असा प्रश्न शिवाजी रगडे यांनी महापालिका आयुक्तांना केला. पुलाचे काम सुरू केले नाहींतर, गेल्या वेळी प्रमाणे आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनेसह शिवाजी रंगडे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे