शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम ठप्प, भुयारी गटाराच्या कामानंतरच रस्त्याला मुहूर्त

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2024 17:34 IST

६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी आलेला ६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून आहे. गटारीच्या कामानंतरच रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी दिली आहे.

 उल्हासनगराच्या मधून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने, काही वर्षांपूर्वी रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणात ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाली असून त्यापैकी १५०पेक्षा जास्त दुकाने पूर्णतः बाधित झाली. बाधित झालेले बहुतांश दुकानदार पर्यायी जागेच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने, आजही १० ते १२ बांधकामे रस्त्याला अडथळा ठरली आहे. रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटीचा निधी मंजूर केला. दरम्यान संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून नव्याने गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्त्या खालील भुयारी गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येणार असल्याने, रस्ता पुनर्बांधणीपूर्वी भुयारी गटारीचे काम त्वरित करा. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी महापालिकेला लेखी सुचविले. 

महापालिका व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक होऊन भुयारी गटारीचे काम जलद करण्याचा निर्णय झाला. भुयारी गटारीचे काम झाल्यानंतरच रस्ताचे काम सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र गेल्या तीन महिन्यापासून गटारीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. असेच काम सुरू राहिल्यास, पावसाळ्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होण्याची संकेत महापालिका व बांधकाम विभागाचे अधिकारी खाजगीत बोलतांना देत आहेत. शहरातील भुयारी गटारीच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रस्ते व गटारीच्या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र भुयारी गटारीसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, शहराचे धुळीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

गटारीच्या कामानंतर रस्त्याला मुहूर्त

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. ही वर्दळ कमी करण्यासाठी रस्त्यावर ६५५ कोटीच्या निधीतून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. तर भुयारी गटारीच्या कामानंतरच ६८ कोटीच्या निधीतून रस्त्याच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर