शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम ठप्प, भुयारी गटाराच्या कामानंतरच रस्त्याला मुहूर्त

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2024 17:34 IST

६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी आलेला ६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून आहे. गटारीच्या कामानंतरच रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी दिली आहे.

 उल्हासनगराच्या मधून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने, काही वर्षांपूर्वी रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणात ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाली असून त्यापैकी १५०पेक्षा जास्त दुकाने पूर्णतः बाधित झाली. बाधित झालेले बहुतांश दुकानदार पर्यायी जागेच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने, आजही १० ते १२ बांधकामे रस्त्याला अडथळा ठरली आहे. रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटीचा निधी मंजूर केला. दरम्यान संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून नव्याने गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्त्या खालील भुयारी गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येणार असल्याने, रस्ता पुनर्बांधणीपूर्वी भुयारी गटारीचे काम त्वरित करा. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी महापालिकेला लेखी सुचविले. 

महापालिका व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक होऊन भुयारी गटारीचे काम जलद करण्याचा निर्णय झाला. भुयारी गटारीचे काम झाल्यानंतरच रस्ताचे काम सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र गेल्या तीन महिन्यापासून गटारीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. असेच काम सुरू राहिल्यास, पावसाळ्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होण्याची संकेत महापालिका व बांधकाम विभागाचे अधिकारी खाजगीत बोलतांना देत आहेत. शहरातील भुयारी गटारीच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रस्ते व गटारीच्या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र भुयारी गटारीसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, शहराचे धुळीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

गटारीच्या कामानंतर रस्त्याला मुहूर्त

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. ही वर्दळ कमी करण्यासाठी रस्त्यावर ६५५ कोटीच्या निधीतून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. तर भुयारी गटारीच्या कामानंतरच ६८ कोटीच्या निधीतून रस्त्याच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर