शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम ठप्प, भुयारी गटाराच्या कामानंतरच रस्त्याला मुहूर्त

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2024 17:34 IST

६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी आलेला ६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून आहे. गटारीच्या कामानंतरच रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी दिली आहे.

 उल्हासनगराच्या मधून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने, काही वर्षांपूर्वी रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणात ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाली असून त्यापैकी १५०पेक्षा जास्त दुकाने पूर्णतः बाधित झाली. बाधित झालेले बहुतांश दुकानदार पर्यायी जागेच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने, आजही १० ते १२ बांधकामे रस्त्याला अडथळा ठरली आहे. रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटीचा निधी मंजूर केला. दरम्यान संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून नव्याने गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्त्या खालील भुयारी गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येणार असल्याने, रस्ता पुनर्बांधणीपूर्वी भुयारी गटारीचे काम त्वरित करा. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी महापालिकेला लेखी सुचविले. 

महापालिका व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक होऊन भुयारी गटारीचे काम जलद करण्याचा निर्णय झाला. भुयारी गटारीचे काम झाल्यानंतरच रस्ताचे काम सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र गेल्या तीन महिन्यापासून गटारीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. असेच काम सुरू राहिल्यास, पावसाळ्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होण्याची संकेत महापालिका व बांधकाम विभागाचे अधिकारी खाजगीत बोलतांना देत आहेत. शहरातील भुयारी गटारीच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रस्ते व गटारीच्या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र भुयारी गटारीसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, शहराचे धुळीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

गटारीच्या कामानंतर रस्त्याला मुहूर्त

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. ही वर्दळ कमी करण्यासाठी रस्त्यावर ६५५ कोटीच्या निधीतून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. तर भुयारी गटारीच्या कामानंतरच ६८ कोटीच्या निधीतून रस्त्याच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर