शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

ठाणे जिल्ह्यातील तब्बल २२५ गृहप्रकल्पांचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

ठाणे : रेराकडे नोंदणी केल्यानुसार निर्धारित वेळेत गृहप्रकल्प पूर्ण न करणाऱ्या राज्यातील तब्बल ६४४ गृहप्रकल्पांची कामे जवळपास ठप्प ...

ठाणे : रेराकडे नोंदणी केल्यानुसार निर्धारित वेळेत गृहप्रकल्प पूर्ण न करणाऱ्या राज्यातील तब्बल ६४४ गृहप्रकल्पांची कामे जवळपास ठप्प झाली आहेत. त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील तब्बल २२५ प्रकल्पांना बसला आहे. हे प्रकल्प महारेराने काळ्या यादीत टाकले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पांतील ८० टक्के घरे विकासकांनी विकली आहेत. प्रकल्प पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या या विकासकांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करणेही शक्य होत नाही. त्यामुळे गृहखरेदीदार मोठ्या संकटात सापडले आहेत. या प्रकल्पांमध्ये आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी येथील घरांच्या विक्रीवर महारेराने बंदी आणली आहे.

गृहनिर्माण क्षेत्रातील व्यवहारांना शिस्त लावण्यासाठी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यात १ मे २०१७ पासून रेरा कायदा अस्तित्वात आला. प्रत्येक गृहप्रकल्पाची नोंदणी करून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे बंधन या कायद्यामुळे विकासकांवर आले. त्यात हलगर्जी झाली, तर गुंतवणूकदारांना विलंब कालावधीसाठी व्याज, नोंदणी रद्द करायची असेल, तर गुंतवलेल्या रकमेचा व्याजासह परतावा मिळविण्यासारखे अनेक अधिकार प्राप्त झाले. विकासक या आदेशांचे पालन करीत नसेल, तर त्याची मालमत्ता विकून देणी अदा करण्याची तरतूदही या कायद्यात आहे; परंतु या सर्व आदेशानंतरही काही प्रकल्पांतील गृहखरेदीदारांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. ते प्रकल्प काळ्या यादीत टाकून, नव्याने घरांची विक्री करण्यास महारेराने बंदी घातली आहे.

ॲनरॉक प्रॉपर्टीज या सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ६४४ प्रकल्प काळ्या यादीत गेले आहेत. त्यातील २२५ प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. काळ्या यादीतल्या प्रकल्पांपैकी ८५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातील ८० टक्के प्रकल्पांतील घरांची विक्री यापूर्वीच झालेली आहे. ६४४ पैकी १६ टक्के प्रकल्प २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. उर्वरित ८४ टक्के प्रकल्प २०१८ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र, या मुदतीपेक्षा अडीच ते तीन वर्षे जास्त लोटली असली, तरी विकासक हे प्रकल्प पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांतील कोणत्याही घराची नव्याने विक्री करण्यास विकासकांना बंदी करण्यात आली आहे.

.....

सर्वाधिक फटका ठाणे शहराला

ठाणे जिल्ह्यातील २२५ प्रकल्प काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून, या प्रकल्पांवर आता गंडांतर येणार आहे. यात ठाण्यातील सर्वाधिक ७५ प्रकल्पांचा समावेश आहे. त्याखालोखाल अंबरनाथ ६७, कल्याण ४६, भिवंडी १६, शहापूर १५, उल्हासनगर २ आणि मुरबाडमधील २ प्रकल्पांना फटका बसला आहे.