शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बारावे प्रकल्पाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:37 IST

एप्रिलची डेडलाइन : २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने बारावे घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यात दररोज २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प एप्रिलपर्यंत बांधून पूर्ण करण्याची डेडलाइन घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिकेने तेथे प्रकल्प उभारला आहे. मात्र, दररोज ६४० मेट्रिक टन कचरा येत असल्याने प्रक्रिया क्षमता आणि दररोज येणारा कचरा, यात मोठा फरक आहे. त्यामुळे उंबर्डे, बारावे आणि मांडा प्रकल्प सुरू होत नाहीत, तोपर्यंत आधारवाडी डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करता येणार नाही. महापालिकेने डम्पिंग बंद करण्यासाठी व उंबर्डे, बारावे आणि मांडा प्रकल्पासाठी ६० कोटींच्या निविदा मागविल्या. मात्र, या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला नसल्याने कंत्राटदार सौराष्ट्र कंपनीला या प्रकल्पांची कामे सुरू करता आली नाहीत.

पर्यावरण विभागाकडून जून २०१८ मध्ये पर्यावरण ना-हरकत दाखला प्राप्त झाला. त्यानुसार उंबर्डे प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, बारावे परिसरातील ५२ सोसायट्यांनी नागरी वस्तीत प्रकल्प राबविण्यास विरोध केला. तसेच एका जागरूक नागरिकाने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिकेद्वारे प्रकल्पास हरकत घेतली. लवादाने प्रकल्पास एक महिन्यासाठी स्थगिती दिली. मात्र, त्यानंतर ती उठविली. तसेच हे प्रकरण पुन्हा राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे सुनावणीस पाठविले. त्यानुसार, सरकारने नेमलेल्या देवधर समितीने प्रकल्पाची पाहणी केली. जागरूक नागरिकाने दोन वेळा राज्य सरकार व लवादाकडे दाद मागितली.बारावे प्रकल्प हा घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीसंदर्भातील २०१६ च्या केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे, असे हरकत घेणाºया सोसायट्या व जागरूक नागरिकांचे म्हणणे होते.मात्र, देवधर समितीने हरित लवादास दिलेल्या अहवालानुसार पर्यावरण ना हरकत दाखला पाहता प्रकल्प राबविण्यास काहीच हरकत नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यानुसार, या महिन्यात बारावे प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. तेथे भरावभूमी विकसित केली जाणार आहे.दरम्यान, यापूर्वीच महापालिकेने तेथे गोदरेज कंपनीच्या १० कोटींच्या सीएसआर फंडातून प्लास्टिक कचºयापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच महापालिकेने ओल्या कचºयापासूनचा १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे.१० कोटी ७० लाखांचा खर्चच्मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केडीएमसीला भेट दिली. यावेळी बैठकीत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बारावे प्रकल्प सुरू करण्यासाठी एप्रिलची डेडलाइन दिली.च् त्यानुसार प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प तीन हेक्टरवर उभारला जाणार असून, त्यासाठी १० कोटी ७० लाख रुपये खर्च आहे. सौराष्ट्र कंपनीद्वारे या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे